शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आई आणि आकाशवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:36 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात जळगाव येथील साहित्यिक किशोर कुलकर्णी यांनी आपल्या लेखनामागील सांगितलेली प्रेरणा.

माझ्या लेखन प्रेरणेचा खरा ऊर्जास्त्रोत माझी आई आणि आकाशवाणी आहे. माझी आई भारती कुळकर्णी माझ्या जन्माच्याही आधीपासून लेखन करत आली आहे. लेख, कथा, कविता, स्फूट लेखन ती लिहित असते. तिचा लेखनाचा गुण माझ्यात आला आहे. मला आठवतं, मी १९९० मध्ये अमळनेरच्या प्रताप कॉलेजला बीएच्या पहिल्या वर्षाला होतो. त्यावेळी कॉलेजमध्ये जळगाव आकाशवाणी केंद्राचे काही अधिकारी आले होते. त्यांनी युवा लेखक, कवींना आकाशवाणीच्या युववाणी कार्यक्रमासाठी लेखन करावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार मी त्याग ही लघुकथा लिहिली.लेखाची वा कथेची पहिली वाचक आईच असते. तिने माझी पहिली कथा वाचली. काही दुरुस्त्या सूचविल्या. विशेष महत्त्वाचं म्हणजे ही कथा मी आकाशवाणी या श्राव्य माध्यमासाठी लिहितो आहे, हे ध्यानात घेऊन ग्रंथ वा पुस्तकी भाषा तसंच बोलीभाषा यात खूप फरक असतो. आकाशवाणीच्या लेखनासाठी बोलीभाषेतून लेखन हवं, असं तिनं सांगितलं. मी संपूर्ण कथा बोलीभाषेतून लिहिली आणि ती युववाणीच्या ‘अक्षरवेल’साठी मंजूर झाली. नोव्हेंबर १९९० ला माझी पहिली कथा प्रसारीत झाली. माझी जन्मदात्री आणि आकाशवाणी माझी लेखन प्रेरणा म्हणता येईल. महाविद्यालयात असताना मिलिंद कुलकर्णी यांचे ‘लोकमत’मध्ये कॉलेजच्या बातम्या संकलन असलेलं ‘महाविद्यालयाच्या परिसरातून’ हे सदर चालवायचे. त्यात कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून मी अमळनेरच्या प्रताप कॉलेजच्या बातम्या पाठवित असे. तेव्हापासूनच लेखन माझ्या जीवनाचं अविभाज्य अंग बनलं. १९९५ ला नाशिकला पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकलो. उपसंपादक म्हणून काम करू लागलो. लेखन हेच माझं ब्रेड अ‍ॅण्ड बटर बनलं. नाशिकला असताना सुप्रसिद्ध साहित्यिक तात्यासाहेब वि.वा. शिरवाडकर, ज्येष्ठ साहित्यिक वसंतराव कानेटकर यांच्या संपर्कात आलो. त्यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यांच्यासोबत जळगावचा प्रवास म्हणजे साहित्यिक मेजवानीच होती. जळगाव येथे १९९७ ला आल्यावर जळगावची पत्रकारिता अनुभवली. २००१ मध्ये जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागात संधी मिळाली. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या संपर्कात आलो. त्यांचे लेखन कौशल्य होतेच. आजची समाज रचना... हे पुस्तक त्यांचे प्रसिद्ध झाले होते. त्यांच्याशी लेखक म्हणूनदेखील अनेकदा चर्चा व्हायच्या. ज्यांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली अशा जोडप्यांची माहिती असलेलं अर्धशतकी लग्नगाठ वर्षभर चालविलं. त्याचं ‘अर्धशतकी लग्नगाठ’ हे पुस्तक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रेरणेने झालं. लेखक म्हणून बिरुदावली लागली. ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’, ‘घडावा सुंदर अक्षर’, ‘ज्ञानवाणी’, ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’ असे पाहता पाहता पाच पुस्तकं नावावर झाले. शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय घेऊन ‘ह्या जन्मावर’ चित्रपटाचं कथा व पटकथा लेखनही केलं. या कार्याचा मला आनंदच आहे.