शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आई आणि आकाशवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:36 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात जळगाव येथील साहित्यिक किशोर कुलकर्णी यांनी आपल्या लेखनामागील सांगितलेली प्रेरणा.

माझ्या लेखन प्रेरणेचा खरा ऊर्जास्त्रोत माझी आई आणि आकाशवाणी आहे. माझी आई भारती कुळकर्णी माझ्या जन्माच्याही आधीपासून लेखन करत आली आहे. लेख, कथा, कविता, स्फूट लेखन ती लिहित असते. तिचा लेखनाचा गुण माझ्यात आला आहे. मला आठवतं, मी १९९० मध्ये अमळनेरच्या प्रताप कॉलेजला बीएच्या पहिल्या वर्षाला होतो. त्यावेळी कॉलेजमध्ये जळगाव आकाशवाणी केंद्राचे काही अधिकारी आले होते. त्यांनी युवा लेखक, कवींना आकाशवाणीच्या युववाणी कार्यक्रमासाठी लेखन करावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार मी त्याग ही लघुकथा लिहिली.लेखाची वा कथेची पहिली वाचक आईच असते. तिने माझी पहिली कथा वाचली. काही दुरुस्त्या सूचविल्या. विशेष महत्त्वाचं म्हणजे ही कथा मी आकाशवाणी या श्राव्य माध्यमासाठी लिहितो आहे, हे ध्यानात घेऊन ग्रंथ वा पुस्तकी भाषा तसंच बोलीभाषा यात खूप फरक असतो. आकाशवाणीच्या लेखनासाठी बोलीभाषेतून लेखन हवं, असं तिनं सांगितलं. मी संपूर्ण कथा बोलीभाषेतून लिहिली आणि ती युववाणीच्या ‘अक्षरवेल’साठी मंजूर झाली. नोव्हेंबर १९९० ला माझी पहिली कथा प्रसारीत झाली. माझी जन्मदात्री आणि आकाशवाणी माझी लेखन प्रेरणा म्हणता येईल. महाविद्यालयात असताना मिलिंद कुलकर्णी यांचे ‘लोकमत’मध्ये कॉलेजच्या बातम्या संकलन असलेलं ‘महाविद्यालयाच्या परिसरातून’ हे सदर चालवायचे. त्यात कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून मी अमळनेरच्या प्रताप कॉलेजच्या बातम्या पाठवित असे. तेव्हापासूनच लेखन माझ्या जीवनाचं अविभाज्य अंग बनलं. १९९५ ला नाशिकला पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकलो. उपसंपादक म्हणून काम करू लागलो. लेखन हेच माझं ब्रेड अ‍ॅण्ड बटर बनलं. नाशिकला असताना सुप्रसिद्ध साहित्यिक तात्यासाहेब वि.वा. शिरवाडकर, ज्येष्ठ साहित्यिक वसंतराव कानेटकर यांच्या संपर्कात आलो. त्यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यांच्यासोबत जळगावचा प्रवास म्हणजे साहित्यिक मेजवानीच होती. जळगाव येथे १९९७ ला आल्यावर जळगावची पत्रकारिता अनुभवली. २००१ मध्ये जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागात संधी मिळाली. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या संपर्कात आलो. त्यांचे लेखन कौशल्य होतेच. आजची समाज रचना... हे पुस्तक त्यांचे प्रसिद्ध झाले होते. त्यांच्याशी लेखक म्हणूनदेखील अनेकदा चर्चा व्हायच्या. ज्यांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली अशा जोडप्यांची माहिती असलेलं अर्धशतकी लग्नगाठ वर्षभर चालविलं. त्याचं ‘अर्धशतकी लग्नगाठ’ हे पुस्तक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रेरणेने झालं. लेखक म्हणून बिरुदावली लागली. ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’, ‘घडावा सुंदर अक्षर’, ‘ज्ञानवाणी’, ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’ असे पाहता पाहता पाच पुस्तकं नावावर झाले. शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय घेऊन ‘ह्या जन्मावर’ चित्रपटाचं कथा व पटकथा लेखनही केलं. या कार्याचा मला आनंदच आहे.