शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

आरक्षण व भाषेचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:04 IST

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शहा यांनी नुकतीच बांगला देशात भेट दिली. भेटीवर आधारित प्रवास वर्णनात्मक लेखमालेचा आठवा भाग ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत...

बांगला देशातील आमचा हा प्रवास खूप पूर्वनियोजन न करता केला. जिथली भाषा मला अजिबात येत नाही अशा अगदी अनोळखी प्रदेशात गेलो होतो, तेही एकटा. मात्र सोबत होते ते तिथले लोक. या सगळ्यात बांगला देशातल्या रोटरीच्या सभासदांची मदत झाली हे आवर्जून नमूद करायला हवे.सर्व देशभर विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात संघर्षाचे खटके उडत होते. सरकारने एका मंत्रिमहोदयांना विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घ्यायला पाठवले. ‘सरकार तुमच्या विरोधात नाही आणि तुमच्या मागणीतील सत्यता मान्य करते आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याविषयी धोरण जाहीर करू’, असे त्यांनी आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी ते मान्य करून बहिष्कार मागे घेतला. पण दरम्यान दुसऱ्या दोन मंत्र्यांनी काहीतरी उलटसुलट बोलून उचापत करून ठेवली. (याची लागण मात्र सगळीकडे सारखीच!). विद्यार्थी पुन्हा भडकले. सगळ्या वृत्तमाध्यमातून विद्यार्थी आणि प्रशासन यांचे खटके आणि संघर्ष जोरात दिसू लागला. देशभर रास्ता रोकोने कळस गाठला. शेवटी १२ एप्रिल २०१८ ला पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातील सरकारी नोकºयातील आरक्षण-कोटा पद्धत सरसकट बंद करण्याची घोषणा केली.लोकांना या आरक्षण आणि कोटा पद्धत रद्द केल्याबद्दल काय वाटते याची भेटलेल्यांकडे चौकशी केली. ड्रायव्हर ते व्यापारी अशा पाच-सहा प्रकारच्या लोकांना तोच प्रश्न विचारला. सगळ्यांचे एकजात उत्तर होते ‘उत्तम झाले’. त्याचे काही उलट सुलट परिणाम होतील हेदेखील सगळेच सांगत होते. पण कुणीही त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. आता तेथे फक्त अपंगांसाठीचे आरक्षण आहे. पंतप्रधान शेख हसीना लोकांना म्हणतात, ‘भरपूर मेहनत करा आणि भरपूर पैसे कमवा. सरकारच्या भरवशावर सगळे होऊ शकत नाही.’आपल्या शेजारच्या छोट्याशा देशाने मोठा आदर्श घालून दिला. माझ्या राकट आणि कणखर देशाला हे केव्हा कळेल? आपल्या देशात तर एका पिढीच्या डोळ्यादेखत ‘माझी जमात किती श्रेष्ठ’पासून आता ‘माझी जमात किती मागासलेली’ हे पटवून देण्याची धडपड चालणे, अगदी घुमजाव म्हणता येईल इतके स्थित्यंतर आपण एका पिढीच्या वयातच पाहतो आहोत.ढाक्का शेजारील नारायणगंजजवळच्या अगदी छोट्या फटूल्लाह गावात एक साधारण साठीचे गृहस्थ भेटले. रस्त्यात नवीन माणसे गावात दिसली आणि भारतातून आलोय असे दिसल्यावर ते जवळ आले आणि उत्साहात बोलत थांबले. आपल्याकडेही सगळ्या लहान गावात माणसे अशीच मोकळी-ढाकळी असतात आणि बोलताना त्यांच्यात कोणताही संकोच आणि कृत्रिमपणा नसतो. दुसºया दिवशी ते ‘उमराह’साठी मक्केला जाणार होते. इस्लामिक कॅलेंडरप्रमाणे त्यातला शेवटचा महिना आणि त्यातले आठवा ते बारावा दिवस यादरम्यान मक्केची यात्रा म्हणजे ‘हज’ची यात्रा. इतर कोणत्याही वेळी केलेली यात्रा म्हणजे ‘उमराह’.मी त्या ‘उमराह’ला जाणाºया बाबांना विचारले, सरकार तुम्हाला ‘हज’साठी काही मदत करते का? माझ्या प्रश्नाने त्यांच्या चेहºयावर ‘असा काय चमत्कारिक प्रश्न विचारता?’ असे भाव उमटले. मी विचारले, माझा प्रश्न काही चुकला काय किंवा मी नीट विचारले नाही काय? कारण भाषेचा अडसर मला सतावत होताच.त्यावर त्यांचा पटकन प्रतिप्रश्न होता, ‘अहो यात्रा मी करणार, त्यासाठी सरकार कशी काय मदत करणार?’ त्यांना माझी कीव आली असावी हे दिसतच होते. माझ्या डोक्यात मात्र त्यांच्या प्रतिप्रश्नाने काहूर उठवले.ढाक्का शहरात फिरताना १ फेब्रुवारी २०१९ ला ढाक्का विद्यापीठाच्या परिसरात पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते एका राष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्याच विद्यापीठ परिसरात एक सुंदर मोठा चौक आहे. तेथे खूप तरुण जमलेले दिसले. एका व्यासपीठावर काही तरुण गाणी म्हणत होते. तेथे मी थांबलो. मी काय सुरू आहे याची चौकशी केली. त्यावर माझ्यासोबत होते. त्यांनी सांगितले की, हा चौक आणि तेथे केलेले बांधकाम हे ‘बांगला भाषेचे राष्ट्रीय स्मारक’ आहे, ‘शहीद मिनार’. (बंउ ‘शोहीद’ मिनार) तेथे पुष्पचक्रे वाहिलेली होती. ‘भाषेचे राष्ट्रीय स्मारक’ या शब्दांनी माझी उत्सुकता चाळवली. (क्रमश:)-सी.ए. अनिलकुमार शहा, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव