शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

श्रावण महिन्याने दिला शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST

कजगाव, ता. भडगाव : दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा मोठा चिंतेत सापडला होता. मात्र, पावसाने गेल्या ...

कजगाव, ता. भडगाव : दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा मोठा चिंतेत सापडला होता. मात्र, पावसाने गेल्या दीड ते दोन महिने दांडी मारल्यानंतर लागोपाठ चार ते पाच दिवस कधी हलका कधी रिमझिम बरसल्याने शेतकरी राजा समाधानी झाल्याचे चित्र दिसत आहे.

पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पिके मोठ्या संकटात सापडली होती. शेतातील विहिरींची पाणीपातळीही खूप कमी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, श्रावण महिन्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे आणि तब्बल वर्षभराच्या कालखंडानंतर, तसेच पावसाळा अर्धा संपल्यानंतर तितूर नदीला थोडे पाणी आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. तितूरला जेमतेम आलेल्या पाण्यामुळे शेतातील विहिरींच्या जलपातळ्यांत थोडी वाढ झाली आहे.

पाऊस जरी पडला असला, तरी विहिरींची पाणीपातळी अजूनही वाढलेली नाही. त्यामुळे बळीराजा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जोरदार पाऊस पडला, तर तितूर नदीही मोठ्या प्रवाहाने वाहेल. पाणीपातळी वाढून शेतकऱ्यांना आगामी काळात फायदा होईल. पावसाच्या आगमनाने शेती कामांना वेग आला आहे व मजुरांचीही कामाची चिंता दूर झाली आहे. पावसाच्या आगमनाने मजुरांना कामे मिळाली असल्याने मजुरांनीही समाधान व्यक्त केले आहे

चाराटंचाईची शक्यता

दरम्यान, पावसाने तब्बल दोन महिने दांडी मारल्याने, शेतकऱ्यांचे नियोजन मोठ्या प्रमाणावर कोलमडले आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात पावसाने दांडी मारल्याने पशुपालकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, पावसाच्या दांडीने भविष्यातील चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उत्पन्नावर होणार परिणाम

तब्बल दीड महिन्याच्या वरुणराजाच्या दांडीमुळे बरड भागातील, तसेच कोरडवाहू जमिनीच्या पिकावर मोठा परिणाम झाला आहे. बऱ्याच क्षेत्रात पिकाने ऊन पकडल्यामुळे पिके सुकू लागली होती. अनेक पिकांनी मान टाकल्या होत्या. लागोपाठ पाच दिवस पडलेल्या पावसाने काही पिकांनी तग धरला आहे, तर काही पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. यात ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन या पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होईल, अशी चर्चा शेतकरी वर्गात आहे.

फोटो कॅप्शन

240821\img-20210823-wa0040.jpg~240821\24jal_4_24082021_12.jpg

थोडया प्रमाणावर आलेल्या पाण्यामुळे वाहणारी कजगाव ची तितुर नदी~अर्ध्या पावसाळ्यानंतर काही प्रमाणात वाहणारी तितूर नदी.