शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

हरभरा पिकाचे आधुनिक पद्धतीने उत्पादन

By ram.jadhav | Updated: November 1, 2017 00:42 IST

रब्बी हंगामातील महत्त्वाच्या पिकातील हरभरा हे कडधान्य पीक बागायतीसह कोरडवाहू क्षेत्रातीलही शेतकºयांसाठी उत्पन्नाचे चांगले साधन आहे़

ठळक मुद्देसुधारित वाणांची निवड करावीबीजप्रक्रिया गरजेचीचजमिनीची निवड

राम जाधवआॅनलाईन लोकमत दि़ १ जळगाव : रब्बी हंगामातील महत्त्वाच्या पिकातील हरभरा हे कडधान्य पीक बागायतीसह कोरडवाहू क्षेत्रातीलही शेतकºयांसाठी उत्पन्नाचे चांगले साधन आहे़ हरभरा डाळीचे मानवी आहारातही अनन्यसाधारण महत्त्व आहे़ या पिकातही आधुनिक पद्धतीचा वापर करून विक्रमी उत्पादन घेता येते़ यावर्षी पाण्याचे प्रमाण कमी असल्याने रब्बी हंगामात शेतकºयांना हरभरा पिकाचे उत्पादन एक चांगला पर्याय आहे़पेरणीची वेळ महत्त्वाचीकोरडवाहू क्षेत्रामध्ये जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वीच हरभºयाची लागवड करावी़ तर बागायती हरभरा २० आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन मिळते़ डिसेंबरनंतर पेरणी केल्यास उत्पादन कमी येते़ काबुली हरभºयाची पेरणी सिंचनाची सोय असेल तर करावी, अन्यथा उत्पादनात मोठी घट येते़चांगल्या उत्पादनासाठी सुधारित वाणांची निवड करावी़ बाजारात विजय, दिग्विजय, जॅकी, विराट, विशाल, पीक़े़ व्ही़-२, ४, कृपा अशी अनेक प्रकारचे सुधारित बियाण्यांचे वाण उपलब्ध आहेत़ ही वाण मर रोगाला प्रतिकारकक्षम असतात, तर खते व पाण्याचा वापर केल्यास उत्पादनात चांगला प्रतिसादही देतात़हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचºयाची जमीन निवडावी़ हलकी अथवा बरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये़ दोन ओळीतील अंतर ३० सें़मी़ व दोन रोपातील १० सें़मी़ अंतरावर टोकन पद्धतीने लागवड करावी़ हेक्टरी ७० ते १०० किलो हरभºयाचे बियाणे पडायला हवे़पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास २ गॅ्रम थायरम, २ गॅ्रम बाविस्टीन किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया करावी़ यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम प्रती १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे व तासभर सुकवून मग पेरावे़ यामुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते़ तसेच मुळावरील नत्रांच्या ग्रंथी वाढून पिकांची वाढ चांगली होते़खतांची मात्रापेरणीवेळी हरभºयाला एकरी ५० किलो डीएपी आणि २० किलो पोटॅश द्यावे़ पीक फुलोºयात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये २ टक्के युरियाची फवारणी करावी़ वेळोवेळी कोळपणी व खुरपणी करावी़ ज्यामुळे पीक तणविरहीत राहून चांगले उत्पादन मिळेल़ पेरणीच्यावेळी वापशावर फ्ल्युक्लोरॅलिन हे तणनाशक गरजेनुसार वापरता येईल़हरभरा पिकास पाणी मर्यादेतच दिले जावे़ यातही तुषार सिंचनाचा सुरुवातीपासूनचा केल्यास जमीन कायम वाफसा अवस्थेत राहत असल्याने उत्पादनात चांगली वाढ होते़ तसेच तणही जास्त वाढत नाही व मुळकुज रोगही लागत नाही़ हरभºयावरील घाटेअळी या प्रमुख किडीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या तिसºया आठवड्यापासून निंबोळी अर्क, रासायनिक कीडनाशकांचा वापर करता येईल़ तसेच पक्षी थांबे व कामगंध सापळे लावूनही एकात्मिक पद्धतीने या अळींचे चांगले नियत्रंण करावे़