शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रेल्वेत झाडू मारुन मोबाईलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:28 IST

२०० मोबाईल लांबविले

ठळक मुद्देगुन्हेगारास अटक

जळगाव : कोपरगाव ते भुसावळ या दरम्यान एक्सप्रेस गाड्यांमध्ये झाडू मारण्याचा बहाणा करुन मोबाईल व पाकीट मारणाऱ्या गणेश नारायण काळे (वय २०, रा.जवळका, ता. कोपरगाव, जि.अहमदनगर, मुळ रा. सैलानी, जि.बुलडाणा) या अट्टल गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी कोपरगाव येथून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्याने आतापर्यंत दोनशेच्यावर मोबाईल लांबविले आहेत.रामानंद नगर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेश याला अटक केली आहे. अजय अशोक देशमुख (वय ३०, रा.शिवकॉलनी) या तरुणाचा ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल, ८०० रुपये रोख व एटीएम कार्ड ३ आॅगस्ट २०१८ रोजी घरातून लांबविण्यात आले होते.या गुन्ह्याचा तपास सुरु असताना हा मोबाईल कोपरगाव येथे गणेश काळे याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांना स्वतंत्र पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रोहोम यांनी हेडकॉन्स्टेबल अनिल इंगळे, रमेश चौधरी, संतोष मायकल, मिलिंद सोनवणे यांचे एक तर विजय शामराव पाटील, प्रवीण हिवराळे, विजय पाटील, चंद्रकांत पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर व रवींद्र गिरासे यांचे दुसरे पथक तयार केले होते.१४ वर्षाचा असताना पहिली चोरीगणेश याच्याविरुध्द जळगाव शहर, रामानंद नगर, नाशिक, जिल्हा पेठ, भुसावळ येथे सात मोबाईल व सोने चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सात वर्षापूर्वी रमेश चौधरी यांनीच त्याला भुसावळ येथे पकडले होते. तेव्हा त्याच्याविरुध्द पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो सराईत गुन्हेगार झाला. जळगावमध्येच त्याच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. रेल्वेत मोबाईल व पैसे वगळता तो इतर कोणतीच वस्तू चोरत नाही, हे त्याचे खास वैशिष्टे आहे.पोलीस स्टेशनमधून पळाल्याने दोन पोलीस निलंबितगणेश काळे याला २०१६ मध्ये मध्यरात्री चोरी करताना विद्युत कॉलनीतील लोकांनी रंगेहाथ पकडले होते. तेव्हा इमारतीवरुन उडी घेऊन तो पसार झाला होता, मात्र पाठलाग करुन लोंकानी त्याला पकडलेच होते. त्यानंतर रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तेव्हा पोलिसांची नजर चुकवून तो पहाटेच्या सुमारास पळून गेला होता. या प्रकारामुळे तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांना निलंबित केले होते.अटक झाल्याने पत्नीने सोडलेभुसावळ येथे चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्यामुळे पत्नीने त्याला सोडून दुसºयाशी संसार थाटला होता. आता त्याने कोपरगाव येथे नात्यातीलच मुलीशी विवाह केला आहे. पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले तेव्हा पत्नीने गोंधळ घालून त्याला घेऊन जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने तिला न जुमानता थेट जळगावात आणले.

टॅग्स :Thiefचोर