शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

सुवर्णनगरीतील सुवर्ण व्यवसायाला करोडोंचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:16 IST

जळगाव : जनता कर्फ्यूमुळे जळगावातील सर्वच व्यवहार ठप्प झाले असून यामध्ये सुवर्णनगरी अशी ख्याती असलेल्या येथील सुवर्ण व्यवसायालाही झळ ...

जळगाव : जनता कर्फ्यूमुळे जळगावातील सर्वच व्यवहार ठप्प झाले असून यामध्ये सुवर्णनगरी अशी ख्याती असलेल्या येथील सुवर्ण व्यवसायालाही झळ बसली असून दोन दिवसात १०० ते १२५ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनचे लॉकडाऊन, त्यानंतर शिथिलता मिळाली तरी संसर्ग वाढत असल्याने सुवर्ण व्यावसायिकांनी बंद ठेवलेला व्यवसाय, जुलै महिन्यातील सात दिवसांचे लॉकडाऊन या नंतर आता पुन्हा जनता कर्फ्यूमुळे व्यवसाय बंद ठेवावा लागल्याने पुन्हा संकट ओढावले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. येथील सुवर्ण व्यवसाय मोठा असून दररोज करोडो रुपयांची उलाढाल होते. मात्र वाढत्या कोरोनाने या व्यवसायाला पुन्हा फटका बसला आहे. जळगावात सुमारे २२५ ते २५० सराफ व्यावसायिक आहेत. जळगावात दररोज ५० ते ६० कोटी रुपयांची उलाढाल होते. जनता कर्फ्युमुळे दोन दिवसात १०० ते १२५ कोटींची उलाढाल ठप्प झाली असून रविवारीदेखील जनता कर्फ्यू राहणार असल्याने हा आकडा आणखी वाढणार आहे.