शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मेश्राम यांच्या संकल्पनेतील ‘लॅब टू लॅण्ड’चा खान्देशातील शेतकऱ्यांना झाला सर्वाधिक लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:16 IST

जळगाव : ‘प्रयोगशाळा ते जमीन’ उपक्रमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची एक वेगळीच ओळख निर्माण ...

जळगाव : ‘प्रयोगशाळा ते जमीन’ उपक्रमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची एक वेगळीच ओळख निर्माण करणारे माजी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम (६५) यांचे सोमवारी नागपूर येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. झोपडपट्टीतून उगवलेला ज्ञानसूर्य मावळल्याची भावना व्यक्त करीत त्यांना शिक्षण क्षेत्रातून आदरांजली वाहण्यात आली आहे.

तत्कालीन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांनी ८ सप्टेंबर २०११ ते ७ सप्टेंबर २०१६ या कालावधीत काम केले. ते या विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नागपूरच्या अवंती रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल होते. सोमवारी रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी प्रा. ज्योत्स्ना मेश्राम आणि एक मुलगा, सून व नातवंड असा परिवार आहे.

अनेक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू

प्रा. सुधीर मेश्राम यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासात मोठे योगदान दिले. त्यांच्या काळात नॅक पूनर्मूल्यांकनाच्या तिसऱ्या साखळीत विद्यापीठाला ‘अ’श्रेणी मिळाली. ‘प्रयोगशाळा ते जमीन’ या त्यांच्या अभिनव उपक्रमात खान्देशातील शेतकऱ्यांना शाश्वत जैवतंत्रज्ञानाद्वारे कमी खर्चात शेतीचे उत्पादन कसे वाढवता येईल याचे मार्गदर्शन तर मिळालेच परंतु शेतकऱ्यांना त्याचा फायदाही झाला. विद्यापीठात त्यांच्या काळात विचारधारा प्रशाळेला प्रारंभ झाला. अनेक रोजगाराभिमुख अभ्यासक्रमदेखील सुरू झाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थाशी सामंजस्य करार झाले. इंडिया टुडे, करिअर ३६० या नियतकालिकांनी केलेल्या सर्वेक्षणात उमविला देशात अनुक्रमे ४० वे व २७ वे स्थान प्राप्त झाले.

अन् विद्यापीठात माजी राष्ट्रपती डॉ़ ए.पी.जे.अब्दुल कलामांचे आगमन

नंदुरबार येथे आदिवासी अकादमी स्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडून प्राप्त केलेली २५ एकर जमीन ही त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाची नमूद करण्यासारखी बाब आहे. मजूर पाल्य योजनादेखील विद्यापीठात त्यांनी राबविली. धुळे येथील महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्र आणि अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे नूतनीकरण त्यांच्या कार्यकाळात झाले. विद्यार्थ्यांसाठीदेखील त्यांनी अनेक निर्णय घेतले़ त्यामध्ये वसतिगृहात इंटरनेट सुविधा, कमवा व शिका योजनेतील मानधनात वाढ, होस्टेल डे अशा काही उपक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभासाठी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, निती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद यांना प्रमुख अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले. याशिवाय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन, हरितक्रांतीचे जनक प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांना डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली.

मेश्राम यांना श्रद्धांजली अर्पण

सोमवारी विद्यापीठात प्रा. सुधीर मेश्राम यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा. ए. एम. महाजन, प्रा. आर. जे. रामटेके, अरुण सपकाळे, भालचंद्र सामुद्रे यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनीदेखील आपला शोकसंदेश पाठविला. दरम्यान, माजी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या निधनामुळे मंगळवार, १६ मार्च रोजी विद्यापीठाचे कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे़