शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारलं, RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल; अखेरच्या क्षणी शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
4
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
5
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
6
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
7
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
8
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
9
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
10
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
11
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
12
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
13
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
14
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
15
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
16
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
17
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
18
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
19
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
20
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
Daily Top 2Weekly Top 5

दया... करणे जे पुत्रासी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:49 IST

अध्यात्माचा उपदेश करता करताच संतानी प्रपंचाविषयी काही मौलिक उपदेश समाजाला केला आहे. मानवता धर्माला अनुसरून सामाजिक आणि धार्मिक गोष्टींना ...

अध्यात्माचा उपदेश करता करताच संतानी प्रपंचाविषयी काही मौलिक उपदेश समाजाला केला आहे. मानवता धर्माला अनुसरून सामाजिक आणि धार्मिक गोष्टींना अध्यात्माच्या कोंदणात बसवून नैतिकतेचा संदेश दिला आहे. दया, क्षमा, शांती आणि प्रेम या सद्गुणांची रूजवात समाजमनावर होण्यासाठी संतांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आज जगात हिंसेचे थैमान सर्वत्र सुरू आहे. एखाद्याच्या मृत्यूबाबत हळहळ वाटण्याऐवजी त्या अपघाताचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यामागे भुतदयेची भावना होती की अत्यंत बिभत्स अशी विकृतीची भावना होती? हे आपण सहज ओळखू शकतो. संवेदना बोथट झाल्याच्या या खुणा आहेत. माणसाला आपल्या माणुसपणाचे भान नव्याने करून देण्यासाठी मानवाचे दानवाच्या दिशेने होणारे हे पतन थांबवण्यासाठी आणि देवत्वाकडे उत्थान होण्यासाठी आज संत वाड;मयाची आवश्यकता आहे.‘दया’ या शब्दाचा अर्थच काळाच्या ओघात बदलून गेला आहे. दया म्हणजे एखाद्याबद्दल वाटणारी कीव, दीन- दुखिता विषयीची कणव असा अर्थ आपण घेतो. दया शब्दाचा मुळ अर्थ आहे प्रेम. आत्यंतिक जिव्हाळा, संत वाड;मयात याच अर्थाने हा शब्द आला आहे. ‘दया करणे जे पुत्रासी’ याचा अर्थ पुत्रप्रेम असा होतो. म्हणून भुतदया म्हणजे प्राणिमात्रांबाबतचे निरपेक्ष प्रेम. आत्यंतिक माया असे प्रेम हृदयात असले तर हिंसेचा विचार ही मनाला शिवणार नाही. पर्यावरण रक्षणासाठी वाघापासून मुंगीपर्यंतचे पर्यावरण साखळीतले सर्व जीव महत्वाचे आहेत. या वन्यजीवांना वाचवण्यासाठी व्यापक मोहिमांचे नियोजन सुरू आहे. तुकोबाराय सहजपणे सांगून जातात. ‘मुंगी आणि राव आम्हा स्तरिखाची जीव’ मुंगीला ही जीव आहे. तिलाही वेदना होऊ शकतात. शिष्यांना उपदेश देऊन महानुभाव संतांनी केला तो यामुळेच. मग प्राण्यांची शिकार करणे, मांस खाणे, हिंसा करणे या गोष्टी दुरच.निसर्ग आपले संतुलन आपण राखेल. आपण भुतदया म्हणजे प्राणीमात्रांबद्दल प्रेम बाळगावे. गायींचे पालन करावे. गोसेवा करावी. गोरक्षणासाठी हातात शस्त्र घेण्याची गरज नाही. क्षमा शस्त्र जया नराचिये हाती । दूष्ट तया प्रती काय करी? हा तुकोबांचा सवाल आहे. वन्य जीवांची तहान भागण्यासाठी रानातच पाण्याचे साठे असले पाहिजेत. तान्हेल्या जीवन वनामायी, रानात अन्न आणि पाणी मिळाले. सुरक्षीत अधिवास मिळाला तर हे वन्यजीव मानवी वस्तीत कशाला येतील? किती महत्वाचा आणि दूरदृष्टीचा विचार संतांनी दिला आहे.- प्रा. सी.एस.पाटील, धरणगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव