शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
6
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
7
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
8
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
9
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
10
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
11
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
12
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
13
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
14
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
15
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
16
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
17
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
18
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणं; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
19
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
20
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
Daily Top 2Weekly Top 5

दया... करणे जे पुत्रासी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:49 IST

अध्यात्माचा उपदेश करता करताच संतानी प्रपंचाविषयी काही मौलिक उपदेश समाजाला केला आहे. मानवता धर्माला अनुसरून सामाजिक आणि धार्मिक गोष्टींना ...

अध्यात्माचा उपदेश करता करताच संतानी प्रपंचाविषयी काही मौलिक उपदेश समाजाला केला आहे. मानवता धर्माला अनुसरून सामाजिक आणि धार्मिक गोष्टींना अध्यात्माच्या कोंदणात बसवून नैतिकतेचा संदेश दिला आहे. दया, क्षमा, शांती आणि प्रेम या सद्गुणांची रूजवात समाजमनावर होण्यासाठी संतांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आज जगात हिंसेचे थैमान सर्वत्र सुरू आहे. एखाद्याच्या मृत्यूबाबत हळहळ वाटण्याऐवजी त्या अपघाताचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यामागे भुतदयेची भावना होती की अत्यंत बिभत्स अशी विकृतीची भावना होती? हे आपण सहज ओळखू शकतो. संवेदना बोथट झाल्याच्या या खुणा आहेत. माणसाला आपल्या माणुसपणाचे भान नव्याने करून देण्यासाठी मानवाचे दानवाच्या दिशेने होणारे हे पतन थांबवण्यासाठी आणि देवत्वाकडे उत्थान होण्यासाठी आज संत वाड;मयाची आवश्यकता आहे.‘दया’ या शब्दाचा अर्थच काळाच्या ओघात बदलून गेला आहे. दया म्हणजे एखाद्याबद्दल वाटणारी कीव, दीन- दुखिता विषयीची कणव असा अर्थ आपण घेतो. दया शब्दाचा मुळ अर्थ आहे प्रेम. आत्यंतिक जिव्हाळा, संत वाड;मयात याच अर्थाने हा शब्द आला आहे. ‘दया करणे जे पुत्रासी’ याचा अर्थ पुत्रप्रेम असा होतो. म्हणून भुतदया म्हणजे प्राणिमात्रांबाबतचे निरपेक्ष प्रेम. आत्यंतिक माया असे प्रेम हृदयात असले तर हिंसेचा विचार ही मनाला शिवणार नाही. पर्यावरण रक्षणासाठी वाघापासून मुंगीपर्यंतचे पर्यावरण साखळीतले सर्व जीव महत्वाचे आहेत. या वन्यजीवांना वाचवण्यासाठी व्यापक मोहिमांचे नियोजन सुरू आहे. तुकोबाराय सहजपणे सांगून जातात. ‘मुंगी आणि राव आम्हा स्तरिखाची जीव’ मुंगीला ही जीव आहे. तिलाही वेदना होऊ शकतात. शिष्यांना उपदेश देऊन महानुभाव संतांनी केला तो यामुळेच. मग प्राण्यांची शिकार करणे, मांस खाणे, हिंसा करणे या गोष्टी दुरच.निसर्ग आपले संतुलन आपण राखेल. आपण भुतदया म्हणजे प्राणीमात्रांबद्दल प्रेम बाळगावे. गायींचे पालन करावे. गोसेवा करावी. गोरक्षणासाठी हातात शस्त्र घेण्याची गरज नाही. क्षमा शस्त्र जया नराचिये हाती । दूष्ट तया प्रती काय करी? हा तुकोबांचा सवाल आहे. वन्य जीवांची तहान भागण्यासाठी रानातच पाण्याचे साठे असले पाहिजेत. तान्हेल्या जीवन वनामायी, रानात अन्न आणि पाणी मिळाले. सुरक्षीत अधिवास मिळाला तर हे वन्यजीव मानवी वस्तीत कशाला येतील? किती महत्वाचा आणि दूरदृष्टीचा विचार संतांनी दिला आहे.- प्रा. सी.एस.पाटील, धरणगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव