शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

दया... करणे जे पुत्रासी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:49 IST

अध्यात्माचा उपदेश करता करताच संतानी प्रपंचाविषयी काही मौलिक उपदेश समाजाला केला आहे. मानवता धर्माला अनुसरून सामाजिक आणि धार्मिक गोष्टींना ...

अध्यात्माचा उपदेश करता करताच संतानी प्रपंचाविषयी काही मौलिक उपदेश समाजाला केला आहे. मानवता धर्माला अनुसरून सामाजिक आणि धार्मिक गोष्टींना अध्यात्माच्या कोंदणात बसवून नैतिकतेचा संदेश दिला आहे. दया, क्षमा, शांती आणि प्रेम या सद्गुणांची रूजवात समाजमनावर होण्यासाठी संतांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आज जगात हिंसेचे थैमान सर्वत्र सुरू आहे. एखाद्याच्या मृत्यूबाबत हळहळ वाटण्याऐवजी त्या अपघाताचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यामागे भुतदयेची भावना होती की अत्यंत बिभत्स अशी विकृतीची भावना होती? हे आपण सहज ओळखू शकतो. संवेदना बोथट झाल्याच्या या खुणा आहेत. माणसाला आपल्या माणुसपणाचे भान नव्याने करून देण्यासाठी मानवाचे दानवाच्या दिशेने होणारे हे पतन थांबवण्यासाठी आणि देवत्वाकडे उत्थान होण्यासाठी आज संत वाड;मयाची आवश्यकता आहे.‘दया’ या शब्दाचा अर्थच काळाच्या ओघात बदलून गेला आहे. दया म्हणजे एखाद्याबद्दल वाटणारी कीव, दीन- दुखिता विषयीची कणव असा अर्थ आपण घेतो. दया शब्दाचा मुळ अर्थ आहे प्रेम. आत्यंतिक जिव्हाळा, संत वाड;मयात याच अर्थाने हा शब्द आला आहे. ‘दया करणे जे पुत्रासी’ याचा अर्थ पुत्रप्रेम असा होतो. म्हणून भुतदया म्हणजे प्राणिमात्रांबाबतचे निरपेक्ष प्रेम. आत्यंतिक माया असे प्रेम हृदयात असले तर हिंसेचा विचार ही मनाला शिवणार नाही. पर्यावरण रक्षणासाठी वाघापासून मुंगीपर्यंतचे पर्यावरण साखळीतले सर्व जीव महत्वाचे आहेत. या वन्यजीवांना वाचवण्यासाठी व्यापक मोहिमांचे नियोजन सुरू आहे. तुकोबाराय सहजपणे सांगून जातात. ‘मुंगी आणि राव आम्हा स्तरिखाची जीव’ मुंगीला ही जीव आहे. तिलाही वेदना होऊ शकतात. शिष्यांना उपदेश देऊन महानुभाव संतांनी केला तो यामुळेच. मग प्राण्यांची शिकार करणे, मांस खाणे, हिंसा करणे या गोष्टी दुरच.निसर्ग आपले संतुलन आपण राखेल. आपण भुतदया म्हणजे प्राणीमात्रांबद्दल प्रेम बाळगावे. गायींचे पालन करावे. गोसेवा करावी. गोरक्षणासाठी हातात शस्त्र घेण्याची गरज नाही. क्षमा शस्त्र जया नराचिये हाती । दूष्ट तया प्रती काय करी? हा तुकोबांचा सवाल आहे. वन्य जीवांची तहान भागण्यासाठी रानातच पाण्याचे साठे असले पाहिजेत. तान्हेल्या जीवन वनामायी, रानात अन्न आणि पाणी मिळाले. सुरक्षीत अधिवास मिळाला तर हे वन्यजीव मानवी वस्तीत कशाला येतील? किती महत्वाचा आणि दूरदृष्टीचा विचार संतांनी दिला आहे.- प्रा. सी.एस.पाटील, धरणगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव