शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

जळगाव शहराचा पारा ४० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन दिवसांत शहराच्या तापमानात झपाट्याने वाढ होत असून, रविवारी शहराचा पारा ४० अंशांपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दोन दिवसांत शहराच्या तापमानात झपाट्याने वाढ होत असून, रविवारी शहराचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला होता. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच तापमानात मोठी वाढ होत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पारा ४० अंशांपर्यंत गेला असल्याने यंदाचा उन्हाळा जळगावकरांना चांगलाच चटका देणारा ठरेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

जागतिक हवामान बदलामुळे ऋतुमानावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून, जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाच्या सरासरीत ३० टक्क्यांची वाढ, तर थंडीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात घट झालेली जाणवत आहे. यंदा पंधरा दिवसअगोदरच उन्हाची चाहूल लागली आहे, तसेच यंदाचा उन्हाळा जूनपर्यंत लांबण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढूू नये म्हणून प्रशासनाने तीन दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच राहणे बंधनकारक आहे. मात्र, एकीकडे घरात राहण्याशिवाय पर्याय नसताना दुसरीकडे तापमानाचा पारा वाढत जात आहे. जळगाव शहराच्या तापमानाने चाळिशी पार केली. अशा परिस्थितीत घरात थांबणेही कठीण झाले आहे. त्यातच गारवा मिळावा म्हणून नागरिक कूलर व इतर साधनांचा वापर करीत असतात. मात्र, लॉकडाऊनमुळे कूलर व इतर साहित्यही खरेदी करता येत नसल्याने नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

रात्री ते दिवसाच्या तापमानात तब्बल २५ अंशांचा फरक

दिवसाच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दिवसा नागरिकांना उन्हाच्या अक्षरश: झळा बसत आहेत. मात्र, रात्रीचे तापमान १५ अंशांपर्यंत खाली घसरल्याने काही प्रमाणात वातावरणात गारवा कायम असतो. शहराच्या कमाल व किमान तापमानात तब्बल २५ अंशांचा फरक असल्याने या दुहेरी वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसताना दिसत आहे. दिवसा प्रचंड तापमान व रात्री गारवा अशा वातावरणामुळे सर्दी व तापेच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एकीकडे शहरात कोरोनाने थैमान घातले असताना दुसरीकडे दुहेरी वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरदेखील मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येत आहे, तसेच ताप व सर्दी वाढल्याने अनेकदा कोरोना झाल्याची भीती नागरिकांमध्ये पसरत आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात सरासरी तापमानात एक अंशांची वाढ होण्याची शक्यता

वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील ऋतुमानावर मोठा परिणाम झालेला असून, यंदाच्या उन्हाळ्यात सरासरी तापमानात एक अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांत जळगाव शहराच्या कमाल तापमानाची सरासरी हे ४३ अंश असते. मात्र, यंदा ही सरासरी ४४ ते ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ अंशांची वाढ झाली होती, तर यंदा उन्हाळ्यातदेखील ही सरासरी वाढण्याची शक्यता आहे.

अजून पाच दिवस उष्णतेची लाट ?

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे काही प्रमाणात तापमानात घट झाली होती. मात्र, पश्चिमेकडून येणारे उष्ण वारे पुन्हा सक्रिय झाल्याने आगामी पाच दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे पारा ४२ ते ४३ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, किमान तापमानात फार काही वाढ होण्याची शक्यता नाही.

आगामी पाच दिवसांचे तापमान

तारीख - कमाल - किमान

२९ मार्च - ४० - १७

३० मार्च - ४१ - १८

३१ मार्च - ४२ - १९

१ एप्रिल - ४१ - १८

२ एप्रिल - ४२ - १९