शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

व्यापारी संकुल पुन्हा गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:06 IST

जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील व्यापारी संकुल बुधवार, ५ आॅगस्टपासून पुन्हा उघडून थेट ग्राहकांसाठी खुले ...

जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील व्यापारी संकुल बुधवार, ५ आॅगस्टपासून पुन्हा उघडून थेट ग्राहकांसाठी खुले झाले. यामुळे साडे चार महिन्यांपासूनची तसेच १५ दिवसांपासून केवळ आॅनलाईन व्यवसायाच्या परवानगीची चिंता दूर झाली आहे. तब्बल १३६ दिवसांनतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. व्यापारी संकुल सुरू होताच ग्राहकांचीही खरेदीसाठी लगबग दिसून आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून शहरातील व्यापारी संकुले बंद असल्याने व्यापाऱ्यांसमोर संकट उभे राहण्यासह अर्थचक्रही मंदावले. चार महिन्यांच्या काळात महत्त्वाचे सण, उत्सव निघून गेल्याने माल भरून ठेवला असतानाही व्यवसाय करू शकत नसल्याने व्यापारी बांधव हतबल झाले होते. इतर व्यवसायांना परवानगी मिळत असताना केवळ संकुलातील दुकाने बंद असल्याने यासाठी संकुलांमधील व्यापारी बांधवांसह विविध व्यापारी संघटनांनी ही संकुले सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले.दुकाने सुरू होण्यासाठी पाठपुरावागेल्या अनेक दिवसांपासून व्यापारी संकुलांना परवानगी मिळत नव्हती. त्यात २० जुलैपासून काही निर्बंधांसह ही संकुले सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यात लहान संकुलांमधील दुकाने सम-विषम प्रमाणे उघडण्यात आली. मात्र मोठ्या मार्केटमधील दुकानांना केवळ दुपारी १२ ते ४ दरम्यान, होम डिलिव्हरी किंवा आॅनलाईन व्यवसायाची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता तब्बल १३६ दिवसांनंतर थेट ग्राहकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.अर्थचक्राला येणार गतीशहरातील बहुतांश व्यापार हा व्यापारी संकुलांमध्ये असल्याने ते सुरू झाल्याने आता शहराच्या अर्थचक्रालाही अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.तीन दिवस बंद, मार्ग निघणारव्यापारी संकुल सुरू झाले, याचे समाधान आहे. मात्र ते सप्ताहातील तीन दिवस बंद राहणार असल्याने याचीही चिंता आहे, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे. मात्र यावरही तोडगा निघेल, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.ग्राहक देवो भव:.... बुधवार, ५ आॅगस्ट रोजी व्यापारी संकुल सुरू झाल्यानंतर व्यावसायिकांनी भगवंताचे नामस्मरण करीत शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा होऊन असे संकट पुन्हा न येवो, अशी प्रार्थना केली. दुपारी ग्राहकांचीही खरेदीसाठी लगबग असल्याचे दिसून आले. दुकानांमध्ये ग्राहक येताच अनेक दुकानदारांनी ‘ग्राहक देवो भव:’च्या उक्तीप्रमाणे त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव