शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

व्यापारी संकुल पुन्हा गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:06 IST

जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील व्यापारी संकुल बुधवार, ५ आॅगस्टपासून पुन्हा उघडून थेट ग्राहकांसाठी खुले ...

जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील व्यापारी संकुल बुधवार, ५ आॅगस्टपासून पुन्हा उघडून थेट ग्राहकांसाठी खुले झाले. यामुळे साडे चार महिन्यांपासूनची तसेच १५ दिवसांपासून केवळ आॅनलाईन व्यवसायाच्या परवानगीची चिंता दूर झाली आहे. तब्बल १३६ दिवसांनतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. व्यापारी संकुल सुरू होताच ग्राहकांचीही खरेदीसाठी लगबग दिसून आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून शहरातील व्यापारी संकुले बंद असल्याने व्यापाऱ्यांसमोर संकट उभे राहण्यासह अर्थचक्रही मंदावले. चार महिन्यांच्या काळात महत्त्वाचे सण, उत्सव निघून गेल्याने माल भरून ठेवला असतानाही व्यवसाय करू शकत नसल्याने व्यापारी बांधव हतबल झाले होते. इतर व्यवसायांना परवानगी मिळत असताना केवळ संकुलातील दुकाने बंद असल्याने यासाठी संकुलांमधील व्यापारी बांधवांसह विविध व्यापारी संघटनांनी ही संकुले सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले.दुकाने सुरू होण्यासाठी पाठपुरावागेल्या अनेक दिवसांपासून व्यापारी संकुलांना परवानगी मिळत नव्हती. त्यात २० जुलैपासून काही निर्बंधांसह ही संकुले सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यात लहान संकुलांमधील दुकाने सम-विषम प्रमाणे उघडण्यात आली. मात्र मोठ्या मार्केटमधील दुकानांना केवळ दुपारी १२ ते ४ दरम्यान, होम डिलिव्हरी किंवा आॅनलाईन व्यवसायाची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता तब्बल १३६ दिवसांनंतर थेट ग्राहकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.अर्थचक्राला येणार गतीशहरातील बहुतांश व्यापार हा व्यापारी संकुलांमध्ये असल्याने ते सुरू झाल्याने आता शहराच्या अर्थचक्रालाही अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.तीन दिवस बंद, मार्ग निघणारव्यापारी संकुल सुरू झाले, याचे समाधान आहे. मात्र ते सप्ताहातील तीन दिवस बंद राहणार असल्याने याचीही चिंता आहे, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे. मात्र यावरही तोडगा निघेल, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.ग्राहक देवो भव:.... बुधवार, ५ आॅगस्ट रोजी व्यापारी संकुल सुरू झाल्यानंतर व्यावसायिकांनी भगवंताचे नामस्मरण करीत शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा होऊन असे संकट पुन्हा न येवो, अशी प्रार्थना केली. दुपारी ग्राहकांचीही खरेदीसाठी लगबग असल्याचे दिसून आले. दुकानांमध्ये ग्राहक येताच अनेक दुकानदारांनी ‘ग्राहक देवो भव:’च्या उक्तीप्रमाणे त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव