शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

महिलांप्रमाणे पुरुषांनाही कायद्याचे संरक्षण द्यावे - जळगावात ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 13:02 IST

पुरुष हक्क समितीच्या अधिवेशात ४ महत्त्वपूर्ण ठराव

जळगाव : महिलांना ज्या प्रमाणे कायद्याचे संरक्षण आहे, त्याच प्रमाणे पुरुषांनाही देण्यात यावे, पुरुषांनाही पोटगी मिळावी, पुरुषांचा तेजोभंग झाल्यास स्त्रियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पुरुष आयोग स्थापन करावा असे चार महत्त्वपूर्ण ठराव पुरुष हक्क संरक्षण समितीच्या २१ व्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आले. हे ठराव सराकारनेही मंजूर करावेत, यासाठी पाठपुरावा करण्याचेही ठरले.जळगावात आयोजित दोन दिवसीय अधिवेशाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. राज्यअध्यक्ष डॉ. सुनिल घाडगे, सचिव अ‍ॅड. धर्मेद्र चव्हाण (नाशिक), समन्वयक अ‍ॅड.बाळासाहेब पाटील (सांगली), जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. जयेश भावसार , अ‍ॅड. मधुकर भिसे (धुळे) आदिंची मुख्य उपस्थिती होती.अधिवेशनात मंजूर झालेले ठरावठराव क्रमांक १- पुरुषाचा तेजोभंग या कलमाचा अंतर्भाव करावाअलिकडच्या काळात अनेक स्त्रियांच्या राहणीमानात बदल झाला आहे. पुरुषांच्या लैंगिक भावना चाळवतील इतके अध:पतन त्यांच्या वेशभूषेत झाले आहे. यामुळे पुरुषांचा वारंवार तेजोभंग होतो. मात्र याबाबत कोणतेही कलम नाही. स्त्रिचा विनयभंग झाला तर ३४५ चा अंतर्भाव आहे. त्याचप्रमाणे पुरुषांचा तेजोभंग झाल्यास स्त्रियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ३५४- अ असे कलम निर्माण करावे.ठराव क्रमांक २- .... तर पुरुषालाही मिळवी पोटगीपुरुषाने पत्नीचा विनाकारण त्याग केल्यास कलम १२५ अन्वये पत्नीला पोटगी द्यावी लागते. दरम्यान अलिकडे काही स्त्रिया या पुरुषांना कोणतेही कारण नसताना मुलाबाळांसहीत परित्याग करतात. वैवाहिक सुख देण्यास नकार देतात. अशा स्त्रियांना चपराक बसण्यासाठी त्या पुरुषाचे पुन्हा लग्न होईपर्यंत त्यास अशा पत्नीकडून पोटगी मिळावी यासाठी १२५- अ या कलमाची निर्मिती करावी.ठराव क्रमांक ३- घरगुती हिंसाचार कायद्यात दुरुस्ती करावीघरगुती हिंसाचार कायद्यातील काही कलमांमुळे पुरुषांवर अन्याय होण्याची भिती अधिक आहे. या कायद्यात पुरुषांना आपली बाजू मांडण्यास वाव नाही. यामुळे काही चारित्र्यहीन, अहंकारी स्त्रिया या कायद्याचा दुरुपयोग करीत आहेत.त्यामुळे या कायद्यात दुरुस्ती करावी.ठराव क्रमांक ४- पुरुष आयोग नेमावामहिलेस अबला मानून महिला आयोग, महिला दक्षता समिती, मोफत कायदा सल्ला आदींचे पाठबळ त्यांना देण्यात आले. परंतु आता महिला शिक्षणामुळे व आर्थिक स्थितीमुळे अबला राहिल्या नसून बऱ्याचदा कायद्याचा दुरुपयोग पुरुषांविरुद्ध त्या करतात. यामुळे पुरुषांना न्याय देण्यासाठी पुरुष आयोग स्थापन करुन जिल्हास्तरावर पुरुष दक्षता समित्यांची स्थापना करण्यात यावी.पुरुषमित्र पुरस्काराने गौरवचांगले कार्य केल्याबद्दल नारायण मोरे (नाशिक), विलास देवरकर (गणपतीपुळे), रवींद्र दरक (नागपूर) यांना यंदाचा पुरुषमित्र पुरस्कार देण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव