शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावल पुणे दरम्यान आज मेमू ट्रेन धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

गाडी क्रमांक (०११३५) ही गाडी १५ आणि २९ रोजी भुसावळहून सकाळी ६:१५ वाजता सुटून पुण्याला सायंकाळी ...

गाडी क्रमांक (०११३५) ही गाडी १५ आणि २९ रोजी भुसावळहून सकाळी ६:१५ वाजता सुटून पुण्याला सायंकाळी पावणे पाच वाजता पोहचणार आहे. तर परतीला (क्रमांक ०११३६) ही गाडी १६ आणि ३० एप्रिल रोजी पुण्याहुन सकाळी ११: ३० वाजता सुटून जळगावला रात्री पावणेनऊ वाजता पोहचणार आहे. पूर्वीच्या हुतात्मा एक्स्प्रेस प्रमाणे ही गाडी असून, या गाडीला सर्व ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. तसेच या गाडीलाही आरक्षण सक्तीचे करण्यात आले असल्याने रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

विनामास्क प्रवाशांवर कारवाईची मागणी

जळगाव : सध्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही अनेक प्रवासी विनामास्क रेल्वेत प्रवास करतांना दिसून येत आहेत.यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तरी रेल्वे प्रशासनाने या बेजबाबदार प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी

जळगाव जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. यामुळे जनरल बोगींना अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.तरी रेल्वे प्रशासनाने मुंबई गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

नवीन बस स्थानकातील पाणपोई बंद

जळगाव : शहरातील एका सामाजिक संस्थेने गेल्या वर्षी नवीन बस स्थानकात बसविलेली पाणपोई वर्षभरातच बंद पडली आहे. थंड पाण्याची सोय असलेली ही पाणपोई संबंधित सामाजिक संस्थेने लक्ष न दिल्यामुळे बंद पडली असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.

रेल्वे स्थानकावर थंड पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय

जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावर सध्या उन्हाळा सुरू असतांनाही प्रवाशांना स्टेशनवरील पिण्याच्या टाक्यांमधून साध्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने तत्काळ या टाक्यांमधील थंड पाण्याचे कुलर चालू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

जुन्या बस स्थानकात पथदिवे बसविण्याची मागणी

जळगाव : शहरातील जुन्या बस स्थानकातून गेल्या आठवड्यापासून बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील बसेस या आगारातून सोडण्यात येत असल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मात्र,आगारात रात्रीच्या वेळी पुरेसे पथदिवे नसल्यामुळे अनेक ठिकाणी अंधार पसरलेला असतो.त्यामुळे आगार प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.