शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भुसावल पुणे दरम्यान आज मेमू ट्रेन धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

गाडी क्रमांक (०११३५) ही गाडी १५ आणि २९ रोजी भुसावळहून सकाळी ६:१५ वाजता सुटून पुण्याला सायंकाळी ...

गाडी क्रमांक (०११३५) ही गाडी १५ आणि २९ रोजी भुसावळहून सकाळी ६:१५ वाजता सुटून पुण्याला सायंकाळी पावणे पाच वाजता पोहचणार आहे. तर परतीला (क्रमांक ०११३६) ही गाडी १६ आणि ३० एप्रिल रोजी पुण्याहुन सकाळी ११: ३० वाजता सुटून जळगावला रात्री पावणेनऊ वाजता पोहचणार आहे. पूर्वीच्या हुतात्मा एक्स्प्रेस प्रमाणे ही गाडी असून, या गाडीला सर्व ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. तसेच या गाडीलाही आरक्षण सक्तीचे करण्यात आले असल्याने रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

विनामास्क प्रवाशांवर कारवाईची मागणी

जळगाव : सध्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही अनेक प्रवासी विनामास्क रेल्वेत प्रवास करतांना दिसून येत आहेत.यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तरी रेल्वे प्रशासनाने या बेजबाबदार प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी

जळगाव जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. यामुळे जनरल बोगींना अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.तरी रेल्वे प्रशासनाने मुंबई गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

नवीन बस स्थानकातील पाणपोई बंद

जळगाव : शहरातील एका सामाजिक संस्थेने गेल्या वर्षी नवीन बस स्थानकात बसविलेली पाणपोई वर्षभरातच बंद पडली आहे. थंड पाण्याची सोय असलेली ही पाणपोई संबंधित सामाजिक संस्थेने लक्ष न दिल्यामुळे बंद पडली असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.

रेल्वे स्थानकावर थंड पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय

जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावर सध्या उन्हाळा सुरू असतांनाही प्रवाशांना स्टेशनवरील पिण्याच्या टाक्यांमधून साध्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने तत्काळ या टाक्यांमधील थंड पाण्याचे कुलर चालू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

जुन्या बस स्थानकात पथदिवे बसविण्याची मागणी

जळगाव : शहरातील जुन्या बस स्थानकातून गेल्या आठवड्यापासून बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील बसेस या आगारातून सोडण्यात येत असल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मात्र,आगारात रात्रीच्या वेळी पुरेसे पथदिवे नसल्यामुळे अनेक ठिकाणी अंधार पसरलेला असतो.त्यामुळे आगार प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.