शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

भुसावल पुणे दरम्यान आज मेमू ट्रेन धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

गाडी क्रमांक (०११३५) ही गाडी १५ आणि २९ रोजी भुसावळहून सकाळी ६:१५ वाजता सुटून पुण्याला सायंकाळी ...

गाडी क्रमांक (०११३५) ही गाडी १५ आणि २९ रोजी भुसावळहून सकाळी ६:१५ वाजता सुटून पुण्याला सायंकाळी पावणे पाच वाजता पोहचणार आहे. तर परतीला (क्रमांक ०११३६) ही गाडी १६ आणि ३० एप्रिल रोजी पुण्याहुन सकाळी ११: ३० वाजता सुटून जळगावला रात्री पावणेनऊ वाजता पोहचणार आहे. पूर्वीच्या हुतात्मा एक्स्प्रेस प्रमाणे ही गाडी असून, या गाडीला सर्व ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. तसेच या गाडीलाही आरक्षण सक्तीचे करण्यात आले असल्याने रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

विनामास्क प्रवाशांवर कारवाईची मागणी

जळगाव : सध्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही अनेक प्रवासी विनामास्क रेल्वेत प्रवास करतांना दिसून येत आहेत.यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तरी रेल्वे प्रशासनाने या बेजबाबदार प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी

जळगाव जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. यामुळे जनरल बोगींना अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.तरी रेल्वे प्रशासनाने मुंबई गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

नवीन बस स्थानकातील पाणपोई बंद

जळगाव : शहरातील एका सामाजिक संस्थेने गेल्या वर्षी नवीन बस स्थानकात बसविलेली पाणपोई वर्षभरातच बंद पडली आहे. थंड पाण्याची सोय असलेली ही पाणपोई संबंधित सामाजिक संस्थेने लक्ष न दिल्यामुळे बंद पडली असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.

रेल्वे स्थानकावर थंड पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय

जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावर सध्या उन्हाळा सुरू असतांनाही प्रवाशांना स्टेशनवरील पिण्याच्या टाक्यांमधून साध्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने तत्काळ या टाक्यांमधील थंड पाण्याचे कुलर चालू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

जुन्या बस स्थानकात पथदिवे बसविण्याची मागणी

जळगाव : शहरातील जुन्या बस स्थानकातून गेल्या आठवड्यापासून बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील बसेस या आगारातून सोडण्यात येत असल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मात्र,आगारात रात्रीच्या वेळी पुरेसे पथदिवे नसल्यामुळे अनेक ठिकाणी अंधार पसरलेला असतो.त्यामुळे आगार प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.