शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

भुसावल पुणे दरम्यान आज मेमू ट्रेन धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

गाडी क्रमांक (०११३५) ही गाडी १५ आणि २९ रोजी भुसावळहून सकाळी ६:१५ वाजता सुटून पुण्याला सायंकाळी ...

गाडी क्रमांक (०११३५) ही गाडी १५ आणि २९ रोजी भुसावळहून सकाळी ६:१५ वाजता सुटून पुण्याला सायंकाळी पावणे पाच वाजता पोहचणार आहे. तर परतीला (क्रमांक ०११३६) ही गाडी १६ आणि ३० एप्रिल रोजी पुण्याहुन सकाळी ११: ३० वाजता सुटून जळगावला रात्री पावणेनऊ वाजता पोहचणार आहे. पूर्वीच्या हुतात्मा एक्स्प्रेस प्रमाणे ही गाडी असून, या गाडीला सर्व ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. तसेच या गाडीलाही आरक्षण सक्तीचे करण्यात आले असल्याने रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

विनामास्क प्रवाशांवर कारवाईची मागणी

जळगाव : सध्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही अनेक प्रवासी विनामास्क रेल्वेत प्रवास करतांना दिसून येत आहेत.यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तरी रेल्वे प्रशासनाने या बेजबाबदार प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी

जळगाव जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. यामुळे जनरल बोगींना अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.तरी रेल्वे प्रशासनाने मुंबई गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

नवीन बस स्थानकातील पाणपोई बंद

जळगाव : शहरातील एका सामाजिक संस्थेने गेल्या वर्षी नवीन बस स्थानकात बसविलेली पाणपोई वर्षभरातच बंद पडली आहे. थंड पाण्याची सोय असलेली ही पाणपोई संबंधित सामाजिक संस्थेने लक्ष न दिल्यामुळे बंद पडली असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.

रेल्वे स्थानकावर थंड पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय

जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावर सध्या उन्हाळा सुरू असतांनाही प्रवाशांना स्टेशनवरील पिण्याच्या टाक्यांमधून साध्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने तत्काळ या टाक्यांमधील थंड पाण्याचे कुलर चालू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

जुन्या बस स्थानकात पथदिवे बसविण्याची मागणी

जळगाव : शहरातील जुन्या बस स्थानकातून गेल्या आठवड्यापासून बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील बसेस या आगारातून सोडण्यात येत असल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मात्र,आगारात रात्रीच्या वेळी पुरेसे पथदिवे नसल्यामुळे अनेक ठिकाणी अंधार पसरलेला असतो.त्यामुळे आगार प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.