शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर बंद होऊन वर्षभरात मेमू ट्रेन धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:14 IST

२ आॅक्टोंबरपर्यंत सर्व रेल्वे स्टेशन होणार प्लॅस्टीकमुक्त

जळगाव : पॅसेंजर पेक्षा मेमू ट्रेनचा वेग जास्त आहे. या गाडीमध्ये प्रवासी बसण्याची क्षमताही जास्त आहे. ही गाडी सुुरु होण्यासाठी सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली असून, वर्षभरात सर्व मार्गावरच्या पॅसेंजर बंद होऊन मेमू ट्रेन धावतील, अशी माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी दिली. तसेच येत्या २ आॅक्टोंबरपर्यंत सर्व रेल्वे स्टेशन प्लास्टीकमुक्त करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. गुप्ता यांनी शुक्रवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत सीनिअर डीसीएम आर. के. शर्मा, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी व प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य गनी मेमन उपस्थित होते. गुप्ता यांनी सांगितले की, मध्य रेल्वे मार्गावरील भुसावळ हे महत्वाचे स्टेशन असून दिल्लीसह पश्चिम भारतात जाणाºया सर्व गाड्या याच मार्गावरुन धावतात. या मार्गावर २४ तास गाड्यांची वर्दळ असते. गेल्या काही वर्षात तिपटीने गाड्यांची संख्या वाढली आहे. कृती कार्यक्रमात बहुतांश प्रश्न मार्गी प्रवाशांना दर्जेदार सुविधा व सुरक्षततेसाठी जून ते आॅगस्ट दरम्यान १०० दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रत्येक स्टेशन वायफाय सुविधा व सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मेमूचा कारखाना भुसावळला मंजूर मेमू ट्रेनचे डबे बनविण्याचा कारखाना भुसावळला मंजूर झाला असून, २५ एकरावर हा कारखाना उभा राहणार आहे. महाराष्ट्रात फक्त भुसावळ व नागपूरला हा कारखाना सुरु होत असून, मेमू ट्रेनच्या डब्यापासून ते दुरुस्तीपर्यंत सर्व कामे या ठिकाणी होणार आहेत. विशेष म्हणजे यामुळे रोजगार निर्मिती वाढणार असून, वर्षभरात हा कारखाना सुुरु होईल. एलएचबी प्रकल्प उभारण्यासाठी जागा नाही रेल्वे मंत्रालयाने एलएचबी या अत्यानुधिक कोचेसचा प्रकल्प भुसावळला मंजुर केला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, या प्रकल्पासाठी १०० एकर एवढी जागा भुसावळला उपलब्ध नाही. यासाठी जागेचा शोध सुरु आहे.नुकतीच अकोला येथे या प्रकल्पासाठी जागेची पाहणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पाच वर्षांत सर्व २०० फाटक बंद करणार रेल्वे प्रशसनाने रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी पहिल्यादां भुसावळ विभागात असणारे सर्व २०० ठिकाणचे फाटक येत्या ५ वर्षांत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फाटकांच्या ठिकाणी उड्डाणपूल व शक्य तिथे भूयारी गटारी बांधण्यात येत आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत २५ ठिकाणचे फाटक बंद करणार असून, पुढील वर्षी ५० ठिकाणचे फाटक बंद करण्याचे नियोजन आहे. तर पाच वर्षांत सर्व ठिकाणचे २०० फाटक बंद होतील. स्टेशनवर सौर उर्जा प्रकल्प बसविणार रेल्वे मंत्रालयाने जास्तीत जास्त सौर उर्जेचा वापर करण्यावर भर दिला असून, सध्या भुसावळ स्टेशनवर सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्यामुळे रेल्वेची भविष्यात मोठी विजेची बचत होणार आहे. भुसावळनंतर जळगाव, नाशिक, मनमाड, अकोला या सर्व स्टेशन हा प्रकल्प बसविण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव