शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुन्हा भेटू या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 02:14 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात गेल्या ४० आठवड्यांपासून लिहीत होते धुळे येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा.अनिल सोनार. आज त्यांच्या लेखमालेचा शेवटचा भाग...

‘नाना, मी सदराचं लेखन थांबवतोय.’‘वा, वा, वा. उत्तम निर्णय! तुझे वाचक सुटकेचा नि:श्वास टाकतील. किती बरं वाटलं ऐकून मला. किडनी स्टोन निघून गेल्यानंतर जसं बरं वाटतं ना, तसं बरं वाटलं. तो स्टोन पास होत असताना वेदना होतात, पण पूर्ण निघून गेल्यावर कसं छान वाटतं. मग काय आम्हा वाचकांना ‘गुड बाय’ म्हणणार तर...’‘नाना, गुड फ्रेंडस् नेव्हर से गुड बाय, दे सिंपली से, सी यू अगेन’‘बापरे, म्हणजे तू पुन्हा कधीतरी आम्हाला छळण्याच्या तयारीत आहेस की काय?’‘त्याचं काय आहे नाना, जेव्हा लेखकाला कसं थांबवावं, हे संपादकांना कळत नाही, आणि आपण कुठे थांबावं हे लेखकाला कळत नाही, तिथे आणि तेव्हाच लेखनाला छळछावणीचं स्वरूप येतं आणि ज्यांच्यात ‘आता जातो’ असं स्वच्छेने म्हणण्याचं सौजन्य असतं, त्याचंच स्वागत ‘केव्हाही या, तुमचं स्वागतच आहे. ‘ह्या शब्दात होत असतं. नाना, मानवी जीवित असो की जीवित कार्य, ‘थांबल्या’च्या दु:खापेक्षा ‘चालू होतं’ ह्याचा आनंद मोठा असतो.‘तू काहीही म्हण, माणूस दृष्टिआड गेला की इतरांसाठी तो संपलेलाच असतो. तू आता आमच्यासाठी मेलेलाच असणार आहेस. म्हणून तर म्हणतोय, ‘गुड बाय’. मेल्यानंतर काय? ह्याचा तू विचार करून ठेव.’मी मिस्किल हसत म्हटलं, ‘नाना, मी तोही विचार करून ठेवला आहे. ऐक-भोकांडाला कमीच पसरा मी मेल्यावर,थोतांडाला थोडे विसरा मी मेल्यावर .श्रद्धांजलीचे निमित्त पुन्हा मिळाले तरी,माझ्यावरती कमीच घसरा मी मेल्यावर.‘हॅलो, लेखकू, भूतांवरचा लेख द्याल का’?‘अमावस्येला’ ‘घंटी’ मारा, मी मेल्यावर.’किती ग्रंथ मी तुमच्या कडूनी आणले होते,भूषवतील रद्दीभांडारा, मी मेल्यावर.ज्यांच्या इच्छा अपुऱ्या त्यांना मुक्ती नसते.इथेच भेटू, प्रतीक्षा करा, मी मेल्यावर.माझ्या ह्या खुर्चीची आशा ठेवू नका रे.चितेत नेईन, तिलाही विसरा, मी मेल्यावर.‘सोडणार नाही बच्चम्जी’ खुनी म्हणाला,दिले सोडून मला गटारां, मी मेल्यावर.भाडोत्री छाती पिटणारे लागतील की,फुकट न ढळतील अश्रूधारा मी मेल्यावर.गरजच नाही वाड्यावर ‘रामू’ काकाचीकंदील घेऊन मारीन चकरा मी मेल्यावरपळून गेली तीही त्या चोराच्या सोबत.हे जमले नसते का चोरा, मी मेल्यावर.माझी आजी कोणाला प्रेमाने आता,म्हणेल ‘मेल्या’ तिला विचारा, मी मेल्यावर.नुसती सर्दी होता कसले हुरळून जाता?आनंदोत्सव करा साजरा मी मेल्यावर.शिस्तीस माझ्या मानत आले कुटुंब सगळे,म्हणेल, ‘गो टू हेल, हिटलरा’ मी मेल्यावर.‘भविष्यवेधी’ कालोच्छेदी’ कविता लिहिली,रद्दीतही ती ठरेल कचरा मी मेल्यावर.- प्रा.अनिल सोनार, धुळे

टॅग्स :literatureसाहित्यDhuleधुळे