शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील वैद्यकीय महाविद्यालयाचा तीन कोटींचा निधी गेला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 12:55 IST

ग्रंथालय इमारतीचाही निधी परत

जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्यावतीने जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षासाठी विविध वार्षिक योजनांसाठी देण्यात आलेल्या ३०१ कोटी रुपयांच्या निधीपैकी १५ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी परत गेला आहे. यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालय परिसरात विविध सुविधांसाठीचा ३ कोटी रुपयांचा निधी तसेच जिल्हा ग्रंथालयाचाही २ कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी योजनांना खीळ बसण्याची चिन्हे आहे.दरम्यान, जि.प.ने २०१५ ते २०१८ या तीन वर्षात खर्च न केलेला तब्बल ३३ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी जि.प.तील विविध विभागांकडे पडून असून त्यांनी तो परतदेखील केलेला नाही.पालकमंत्र्यांकडे असलेल्या खात्याचाच निधी परतजळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मंजुरी मिळाल्यानंतर त्याची सुरुवात जिल्हा रुग्णालयातून झाली. यासाठी तेथे आवश्यक विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले व बहुतांश काम झाले. यात २०१८-१९ या वर्षासाठीच्या निधीपैकी ३ कोटी रुपयांचा निधी खर्चच झाला नाही. त्यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाविद्यालयाच निधी परत गेला आहे.ग्रंथालयाच्या जागा बदलातून निधी परतजिल्हा ग्रंथालयाच्या इमारतीसाठी असलेल्या निधीतील २ कोटी रुपये परत गेले आहेत. इमारतीसाठी जागेच्या प्रश्नावरून काम रखडल्याने हा निधी परत गेल्याची माहिती मिळाली.२८६ कोटी रुपये खर्चजिल्हा नियोजन समितीच्यावतीने विविध विभागांना वार्षिक योजनांसाठी ३०१ कोटी रुपयांच्या निधी देण्यात आला होता. त्या पैकी २८६ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला तर १५ कोटी ३० लाख रुपयांचा निधी परत गेला. यामध्ये मृदसंधारण विभागाचा ३ कोटी २५ लाख रुपये, कौशल्य विकास विभागाचा ३ कोटी रुपये, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचा अडीच कोटी रुपये, जिल्हा ग्रंथालयाचा २ कोटी रुपये, पशू संवर्धन विभाग (उपायुक्त) एक कोटी ४५ लाख रुपये, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा ३ कोटी रुपयांचा निधी खर्च न झाल्याने हा सर्व निधी परत गेला.यंदाचा ४५२ कोटींचा आराखडाआता २०१९-२० या वर्षासाठी ४५२ कोटी रुपयांच्या वार्षिक योजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये ३०८ कोटी रुपयांचा सर्वसाधारण योजना, ५५ कोटी रुपयांचा निधी आदिवासी घटक कार्यक्रमासाठी आणि ८९ कोटी रुपये समाजकल्याण विभागासाठीच्या आराखड्याचा समावेश आहे.तीन वर्षांचा निधी पडूनवार्षिक योजनांचा निधी परत जात असताना जि.प.ने तर त्यांच्याकडील २०१५पासूनचा अखर्चिक निधी परतदेखील केलेला नाही. यामध्ये सर्वसाधारण उपाययोजनांसाठी २०१५-१६ या वर्षासाठी जि.प.ला १२७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यापैकी १४ कोटी खर्चच झाले नाही. २०१६-१७ या वर्षात जि.प.ला १२३ कोटी मिळाले, त्या पैकी ५ कोटी शिल्लक राहिले. २०१७-१८ या वर्षात जि.प.ला १२० कोटी रुपये मिळाले, त्यापैकी १० कोटी शिल्लक राहिले. अशाच प्रकारे आदिवासी विकास उपाययोजनांसाठी २०१५-१६मध्ये १९ कोटी पैकी १ कोटी ४० लाख खर्च झाले नाही. २०१६-१७मध्ये २३ कोटीपैकी २ कोटी १२ लाख आणि २०१७-१८ मध्ये मिळालेल्या १५ कोटी ३० लाखापैकी १ कोटी २० लाखाचा निधी खर्चच झाला नाही.हा अखर्चिक निधी जि.प.ने परतदेखील केलेला नसून तो तसाच जि.प.कडे पडून आहे. विशेष म्हणजे इतर योजनांसाठी निधी कमतरता भासते आणि दुसरीकडे जि.प.चे विविध विभाग आपल्याकडील निधी शासनाला परत न करता तसाच पडू देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव