शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून बाजार फुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:36 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार बंदचे आदेश दिले होते. मात्र अमळनेरात हे आदेश धुडकावून तुफान गर्दीचा हप्ता सुरू आहे.

ठळक मुद्देपालिका व प्रशासनाकडून कारवाई शून्य, ढिम्म प्रशासनामुळे नागरिकही बेफिकीर

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलून आठवडी बाजार बंदचे आदेश दिले होते. मात्र अमळनेरात हे आदेश धुडकावून तुफान गर्दीचा हप्ता सुरू आहे. लोकप्रतिनिधी, नागरिक व प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे ही बाब कोरोनाच्या वाढीस निश्चित कारणीभूत ठरू शकते.

कोरोनावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर स्थानिक प्रशासनाने काही व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शनिवारी अमळनेर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ठराविक व्यापारी बोलावण्यात आल्याचा आरोप इतर व्यापाऱ्यांनी केला. प्रशासनाने ५० व्यक्तींच्या  मर्यादेचा नियम दाखवत सारवासारव केली. परंतु त्याचे दुष्परिणाम असे झाले की, सोमवारच्या आठवडी बाजाराबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

सकाळी संभ्रमामुळे गर्दी कमी होती; पण सायंकाळी बाजार सुरू झाल्याचे समजताच गर्दी वाढली. एरव्ही रोज पालिका आणि पोलिसांतर्फे कारवाई होत असताना सोमवारी मात्र कारवाई शून्य होती. त्यामुळे गर्दी नियंत्रित नव्हती. अनेकजण बिनामास्क बाजारात फिरत होते. प्रशासनाने लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधून निर्णय व अंमलबाजवणीत एकवाक्यता आणावी, अशी मागणी होत आहे.

स्थानिक प्रशासनाने जागृतीच केली नाही

शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस सलग बंदमुळे मोठे नुकसान होईल, म्हणून आणि आठवडा बाजार बंदबाबत स्थानिक प्रशासनाने जनजागृती केली नाही. त्यामुळे शेतकरी, भाजीपाला विक्रेत्यांनी तसेच शेती साहित्य, घरगुती साहित्य विक्रेते आपला माल घेऊन बाजारात आले होते. 

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरcorona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार