शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

बोरीला आलेल्या पुराने अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST

पारोळा : तामसवाडी, ता. पारोळा येथील बोरी नदीवरील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळदार पाऊस झाल्याने बोरी धरणाने दिनांक ...

पारोळा : तामसवाडी, ता. पारोळा येथील बोरी नदीवरील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळदार पाऊस झाल्याने बोरी धरणाने दिनांक ५ रोजी धोक्याची पाणी पातळी ओलांडल्याने रात्री धरणाचे सर्व १५ चे १५ गेट उघडण्यात आले.

१३ हजारांचा वर क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. यामुळे बोरी धरणाला मोठा पूर आला होता. पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

पुराच्या या गावांना बसला फटका

करमाड बु., ता. पारोळा या गावाला धरणाच्या बँक वॉटरचा सर्वात मोठा फटका बसला. बँक वॉटरचे पाणी या गावातील काही घरांत घुसून त्यांचे नुकसान झाले. या १० ते १२ घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. रात्री पावसाचा असाच जोर कायम राहिला असता तर करमाड बु. गावात अनेकांच्या खळवाडीत, गोठ्यात व घरांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले असते. सुदैवाने पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला व करमाड बु. ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. धरणाची निर्मिती झाल्यानंतर बोरी धरणाच्या बँक वॉटरचा या करमाड बु. गावाला मोठा धोका पोहोचू शकतो. हे गृहीत धरून प्रशासनाने या गावचे सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते; पण या गावाच्या काहींना हे स्थलांतर रुचले नाही. मग काही लोकांनी प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांनी स्वतःहून स्थलांतर करून घेत करमाड खु. या गावात राहणे पसंत केले. मग जे राहून गेले ते करमाड बु. गावात आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या करमाड बु. गावाला जर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला तर येथील ग्रामस्थांसाठी धोक्याची घंटा नेहमी वाजत असते. रात्री बँक वॉटरमुळे तालुक्याशी संपर्क असलेली संपर्क फरशीदेखील पाण्याखाली आली होती. या गावाचा चौफेर संपर्क यामुळे तुटला होता. एक भीतीचे वातावरण रात्रभर ग्रामस्थांच्या मनात होते.

बोरी नदीवरील सर्व केटिवेअर हाऊसफुल

बोरी नदीवर माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत अनेक केटिवेअर केले. त्यात तामसवाडी गावानजीक नाथबुवा मंदिराजवळ, टोळी गावानजीक, मोंढाळे पिंप्री गावानजीक, असे मोठमोठे केटिवेअर बांधले होते. हे सर्व केटिवेअर पूर्ण भरले आहेत. यामुळे भविष्यात याचा मोठा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास निश्चित मदत होईल. याशिवाय बहादरपूर, महाळपूर, भिलाली येथील ही केटिवेअर फुल झाली आहेत.

टोळी येथे प्राचीन संरक्षण भिंत पुरामुळे खचली

बोरी नदीच्या काठाला वसलेल्या टोळी गावाला या बोरी नदीच्या पुराचा फटका बसला. नदीच्या पुराच्या पाण्यापासून गावाचे नुकसान होऊ नये यासाठी नदीकाठाला प्राचीन अशी संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. ती भिंत या पुराच्या पाण्यामुळे खचली आहे. मराठी शाळेच्या इमारतीकडून बाजूच्या वस्तीत पाणी शिरले आहे. टोळी गावाला संरक्षण भिंत ही ब्रिटिशकालीन आहे. ती नदीच्या पुरामुळे पडली असून संरक्षण भिंतीला लागून अंगणवाडी आहे. तिचाही काही भाग खचल्याने ती पडण्याची शक्यता आहे. केटिवेअरच्या दोन्ही बाजूंचा मातीचा भराव पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. बंधाऱ्याचा साइड भरावसुद्धा वाहून गेला.