शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

४२ कोटींच्या प्रस्तावात निघाल्या अनेक त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:59 IST

महिनाभरात दोनवेळा परत आला प्रस्ताव

जळगाव : महानगरपालिकेला नगरोत्थानतंर्गत मिळालेल्या १०० कोटींपैकी ४२ कोटींच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढल्या आहेत. मात्र, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या कामांना अद्यापही अंतीम मंजुरी मिळू शकली नसून, दीड महिन्यात विविध त्रुटी निघाल्याने ४२ कोटींच्या कामांचे प्रस्ताव परत आले आहेत.आता बांधकाम विभागाने तिसऱ्यांदा पुन्हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.महापालिका प्रशासन व मनपातील सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे महापालिकेला निधी मिळाल्यावरही त्या निधीतून होणाºया कामांच्या उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. तीन वर्षात महापालिकेला २५ कोटींचा निधी खर्च करता आलेला नाही. त्यातच गेल्या आठवड्यात २५ कोटींपैकी १५ कोटींचा अखर्चित निधी शासनाकडे परत गेला. दोन महिन्यांपासून बंद असलेली वसुलीची प्रक्रिया मनपाने सुरु केली आहे. मात्र, सध्या धनादेश व आॅनलाईन पध्दतीनेच भरणा सुरु आहे. दरम्यान, शासनाकडून मिळणारी जीएसटीची रक्कमदेखील मिळाली नसल्याने महापालिकेसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. अशा काळात मनपाकडे असलेल्या खर्चाचे नियोजन करणे गरजेचे असताना निधी अखर्चित राहिल्याने तो शासनाकडे परत पाठविण्याची वेळ मनपावर आली आहे.मनपाच्या हिस्स्याची रक्कम देण्याची अडचण१०० कोटींचा निधी मिळून आता २२ महिन्यांचा काळ झाला आहे. मात्र, या निधीतून एक रुपयाचाही खर्च सत्ताधाºयांना करता आलेला नाही. डिसेंबर महिन्यात या निधीवर राज्य शासनाने स्थगिती दिल्यामुळे शहरातील विकासकामांचा प्रश्न निर्माण झाला होता.एप्रिल महिन्यात निविदा प्रक्रिया झालेल्या ४२ कोटींच्या कामांवरील स्थगिती शासनाने उठविल्यानंतर मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. ४२ कोटींच्या निधीतून शहरातील १३० कामे प्रस्तावित करण्यात आले आहे. ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहेत. नगरोत्थानतंर्गत मिळालेल्या निधीत मनपाला काही रक्कम द्यावी लागणार आहे. ४२ कोटींच्या निधी खर्चासाठी ५ कोटींची रक्कम मनपाला द्यावी लागणार आहे. मात्र, मनपाच्या हिश्श्याची रक्कम न दिल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाने काही त्रुटी काढल्या होत्या. त्यामुळे दोनवेळा प्रस्ताव परत आले आहेत...तर रस्त्यांचा प्रश्न होईल बिकटशहरातील रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. पावसाळ्यात तर शहरातील रस्त्यांवर पायी चालणेही कठीण होत आहे. मनपाकडून साधी दुरुस्तीही केली जात नाही. अशा परिस्थितीत ४२ कोटीतून होणाºया कामांना उशीर होत असल्याने रस्त्यांचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी मनपा फंडातून ५० कोटींच्या रस्त्यांचे नियोजन महापौरांनी केले होते. मात्र, मनपाच्या तिजोरीत खडखडाट असताना या निधीतून रस्त्यांचे नियोजन सध्यातरी होताना दिसून येत नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव