शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

४२ कोटींच्या प्रस्तावात निघाल्या अनेक त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:59 IST

महिनाभरात दोनवेळा परत आला प्रस्ताव

जळगाव : महानगरपालिकेला नगरोत्थानतंर्गत मिळालेल्या १०० कोटींपैकी ४२ कोटींच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढल्या आहेत. मात्र, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या कामांना अद्यापही अंतीम मंजुरी मिळू शकली नसून, दीड महिन्यात विविध त्रुटी निघाल्याने ४२ कोटींच्या कामांचे प्रस्ताव परत आले आहेत.आता बांधकाम विभागाने तिसऱ्यांदा पुन्हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.महापालिका प्रशासन व मनपातील सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे महापालिकेला निधी मिळाल्यावरही त्या निधीतून होणाºया कामांच्या उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. तीन वर्षात महापालिकेला २५ कोटींचा निधी खर्च करता आलेला नाही. त्यातच गेल्या आठवड्यात २५ कोटींपैकी १५ कोटींचा अखर्चित निधी शासनाकडे परत गेला. दोन महिन्यांपासून बंद असलेली वसुलीची प्रक्रिया मनपाने सुरु केली आहे. मात्र, सध्या धनादेश व आॅनलाईन पध्दतीनेच भरणा सुरु आहे. दरम्यान, शासनाकडून मिळणारी जीएसटीची रक्कमदेखील मिळाली नसल्याने महापालिकेसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. अशा काळात मनपाकडे असलेल्या खर्चाचे नियोजन करणे गरजेचे असताना निधी अखर्चित राहिल्याने तो शासनाकडे परत पाठविण्याची वेळ मनपावर आली आहे.मनपाच्या हिस्स्याची रक्कम देण्याची अडचण१०० कोटींचा निधी मिळून आता २२ महिन्यांचा काळ झाला आहे. मात्र, या निधीतून एक रुपयाचाही खर्च सत्ताधाºयांना करता आलेला नाही. डिसेंबर महिन्यात या निधीवर राज्य शासनाने स्थगिती दिल्यामुळे शहरातील विकासकामांचा प्रश्न निर्माण झाला होता.एप्रिल महिन्यात निविदा प्रक्रिया झालेल्या ४२ कोटींच्या कामांवरील स्थगिती शासनाने उठविल्यानंतर मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. ४२ कोटींच्या निधीतून शहरातील १३० कामे प्रस्तावित करण्यात आले आहे. ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहेत. नगरोत्थानतंर्गत मिळालेल्या निधीत मनपाला काही रक्कम द्यावी लागणार आहे. ४२ कोटींच्या निधी खर्चासाठी ५ कोटींची रक्कम मनपाला द्यावी लागणार आहे. मात्र, मनपाच्या हिश्श्याची रक्कम न दिल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाने काही त्रुटी काढल्या होत्या. त्यामुळे दोनवेळा प्रस्ताव परत आले आहेत...तर रस्त्यांचा प्रश्न होईल बिकटशहरातील रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. पावसाळ्यात तर शहरातील रस्त्यांवर पायी चालणेही कठीण होत आहे. मनपाकडून साधी दुरुस्तीही केली जात नाही. अशा परिस्थितीत ४२ कोटीतून होणाºया कामांना उशीर होत असल्याने रस्त्यांचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी मनपा फंडातून ५० कोटींच्या रस्त्यांचे नियोजन महापौरांनी केले होते. मात्र, मनपाच्या तिजोरीत खडखडाट असताना या निधीतून रस्त्यांचे नियोजन सध्यातरी होताना दिसून येत नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव