शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

रसायनांमुळे आंबा ठरतोय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:27 IST

पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याच्या तक्रारी

जळगाव : आंबे पिकविण्यासाठी मानवी आरोग्यास हानीकारक असलेल्या कॅल्शियम कार्बाइडचा (कारपेट) वापर सर्रासपणे सुरू असल्याचे तसेच हे कारपेट बाजारात सहजपणे उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. त्यामुळे रसायनाच्या वापरामुळे आंबा घातक ठरत असून कृत्रिमरित्या आंबा पिकविला जात असल्याने त्यातील रसाचेही प्रमाण कमी होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.एरव्ही आंब्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर त्या वेळी कार्बाईडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. आता हा हंगाम संपत आला तरी कॅल्शियम कार्बाइडचा वापर सुरूच असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग वेल्डिंग व इतर कामांसाठी होत असल्याने त्याच्या विक्रीवर बंदी नाही. त्यामुळे ते सहज उपलब्ध होते. मात्र आंब्याच्या मोसमात उगीच नसती झंझट नको म्हणून विक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बाइड विक्रीबाबत खबरदारी घेतली जाते.अनोळखी व्यक्तीने चौकशी केल्यास कॅल्शियम कार्बाइड नसल्याचे सांगितले जाते. मात्र नेहमीचे फळ व्यावसायिक आल्यास मात्र पद्धतशीरपणे त्यांना कॅल्शियम कार्बाइड उपलब्ध करून दिले जात आहे.कॅल्शियम कार्बाइड हे स्फटीक स्वरूपात असते. ते पुडीत बांधून आंब्यांमध्ये ठेवले व हवा लागू दिली नाही तर त्यातून प्रचंड उष्णता निर्माण होऊन त्याचे राखेत रूपांतर होते. निर्माण झालेल्या उष्णतेतून आंबे पिकतात. अनेकदा ट्रकमधून माल येतानाच त्यात विशिष्ट झाडाच्या पानात कॅल्शियम कार्बाइडच्या पुड्या बांधून टाकल्या जातात. त्यामुळे माल पोहोचेपर्यंत निम्मा पिकून जातो. जो माल पिकणे बाकी असतो, त्यावर स्थानिक व्यापारी पुन्हा कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकविण्याची प्रक्रिया करतात.इथेलॉन वापरास मुभाआंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करू नये, अशा सूचना आंब्याच्या हंगाम सुरू झाला त्याच वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाने विक्रेत्यांना दिल्या होत्या. त्या संदर्भात बैठक घेऊन कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. मात्र तरीदेखील कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत आहे. कॅल्शियम कार्बाइडचा वापर न करता इथेलॉनचा वापर आंबे पिकविण्यासाठी करावा, अशी मुभा विक्रेत्यांना देण्यात आली. त्यामुळे शहरात कोठे कॅल्शियम कार्बाइडचा वापर झाल्याचे आढळून आले नाही, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे म्हणणे आहे.पचन प्रक्रिया बिघडतेजर फळ पिकविताना कॅल्शियम कार्बाइडचा वापर अधिक झाल्यास ते फळ खाणाऱ्यास मळमळ, उलटी, पचन प्रकिया बिघडणे, जुलाब इत्यादी त्रास सुरू होतो.चार नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षाआंबे पिकविण्यासाठी कार्बाइडचा वापर केल्या जात असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधून चार नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. गेल्या वर्षी आंबे विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याने या वर्षी कार्बाइडचा वापर करण्यास विक्रेते धजावत नसल्याचा दावा अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने करण्यात आला....तर ६ महिने कारावासकॅल्शियम कार्बाइड मानवी आरोग्यास हानिकारक आहे. त्याच्या सेवनाने कॅन्सरसारखा दुर्धर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र वेल्डिंगसाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत असल्याने बाजारात ते सहज उपलब्ध होते. मानवी आरोग्यास हानीकारक असल्याने फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केल्याप्रकरणी संबंधीतांवर न्यायालयात खटला दाखल केला जाऊ शकतो. अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार खाद्यपदार्थात मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या पदार्थाचा अंश आढळून आल्यास दोषींवर सहा महिन्यांपासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तसेच दोन ते दहा लाख रुपये दंडाची तरतूद आहे.असे वापरले जाते कार्बाइडआंबे पिकण्यापूर्वीच झाडावरून उतरविले जातात. कारण पिकल्यावर आंबा मार्केटमध्ये आणायचा ठरविला तर तो सडण्याची भीती असते. त्यामुळे हा कच्चा, अर्धवट पिकलेला आंबा व्यापारी विकत घेतात. बाजारात पाकिटात मिळत असलेली पावडर दोन-तीन चमचे प्रमाणे घेऊन कागदाच्या पुड्या करून आंब्याच्या ढीगात वेगवेगळ्या कोपºयात दोन-दोन फुटांच्या अंतरावर ठेवून दिल्या जातात. या पावडरच्या उष्णतेमुळेच परिणाम होऊन आंबे लवकर पिकतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव