शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

रसायनांमुळे आंबा ठरतोय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:27 IST

पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याच्या तक्रारी

जळगाव : आंबे पिकविण्यासाठी मानवी आरोग्यास हानीकारक असलेल्या कॅल्शियम कार्बाइडचा (कारपेट) वापर सर्रासपणे सुरू असल्याचे तसेच हे कारपेट बाजारात सहजपणे उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. त्यामुळे रसायनाच्या वापरामुळे आंबा घातक ठरत असून कृत्रिमरित्या आंबा पिकविला जात असल्याने त्यातील रसाचेही प्रमाण कमी होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.एरव्ही आंब्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर त्या वेळी कार्बाईडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. आता हा हंगाम संपत आला तरी कॅल्शियम कार्बाइडचा वापर सुरूच असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग वेल्डिंग व इतर कामांसाठी होत असल्याने त्याच्या विक्रीवर बंदी नाही. त्यामुळे ते सहज उपलब्ध होते. मात्र आंब्याच्या मोसमात उगीच नसती झंझट नको म्हणून विक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बाइड विक्रीबाबत खबरदारी घेतली जाते.अनोळखी व्यक्तीने चौकशी केल्यास कॅल्शियम कार्बाइड नसल्याचे सांगितले जाते. मात्र नेहमीचे फळ व्यावसायिक आल्यास मात्र पद्धतशीरपणे त्यांना कॅल्शियम कार्बाइड उपलब्ध करून दिले जात आहे.कॅल्शियम कार्बाइड हे स्फटीक स्वरूपात असते. ते पुडीत बांधून आंब्यांमध्ये ठेवले व हवा लागू दिली नाही तर त्यातून प्रचंड उष्णता निर्माण होऊन त्याचे राखेत रूपांतर होते. निर्माण झालेल्या उष्णतेतून आंबे पिकतात. अनेकदा ट्रकमधून माल येतानाच त्यात विशिष्ट झाडाच्या पानात कॅल्शियम कार्बाइडच्या पुड्या बांधून टाकल्या जातात. त्यामुळे माल पोहोचेपर्यंत निम्मा पिकून जातो. जो माल पिकणे बाकी असतो, त्यावर स्थानिक व्यापारी पुन्हा कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकविण्याची प्रक्रिया करतात.इथेलॉन वापरास मुभाआंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करू नये, अशा सूचना आंब्याच्या हंगाम सुरू झाला त्याच वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाने विक्रेत्यांना दिल्या होत्या. त्या संदर्भात बैठक घेऊन कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. मात्र तरीदेखील कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत आहे. कॅल्शियम कार्बाइडचा वापर न करता इथेलॉनचा वापर आंबे पिकविण्यासाठी करावा, अशी मुभा विक्रेत्यांना देण्यात आली. त्यामुळे शहरात कोठे कॅल्शियम कार्बाइडचा वापर झाल्याचे आढळून आले नाही, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे म्हणणे आहे.पचन प्रक्रिया बिघडतेजर फळ पिकविताना कॅल्शियम कार्बाइडचा वापर अधिक झाल्यास ते फळ खाणाऱ्यास मळमळ, उलटी, पचन प्रकिया बिघडणे, जुलाब इत्यादी त्रास सुरू होतो.चार नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षाआंबे पिकविण्यासाठी कार्बाइडचा वापर केल्या जात असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधून चार नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. गेल्या वर्षी आंबे विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याने या वर्षी कार्बाइडचा वापर करण्यास विक्रेते धजावत नसल्याचा दावा अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने करण्यात आला....तर ६ महिने कारावासकॅल्शियम कार्बाइड मानवी आरोग्यास हानिकारक आहे. त्याच्या सेवनाने कॅन्सरसारखा दुर्धर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र वेल्डिंगसाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत असल्याने बाजारात ते सहज उपलब्ध होते. मानवी आरोग्यास हानीकारक असल्याने फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केल्याप्रकरणी संबंधीतांवर न्यायालयात खटला दाखल केला जाऊ शकतो. अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार खाद्यपदार्थात मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या पदार्थाचा अंश आढळून आल्यास दोषींवर सहा महिन्यांपासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तसेच दोन ते दहा लाख रुपये दंडाची तरतूद आहे.असे वापरले जाते कार्बाइडआंबे पिकण्यापूर्वीच झाडावरून उतरविले जातात. कारण पिकल्यावर आंबा मार्केटमध्ये आणायचा ठरविला तर तो सडण्याची भीती असते. त्यामुळे हा कच्चा, अर्धवट पिकलेला आंबा व्यापारी विकत घेतात. बाजारात पाकिटात मिळत असलेली पावडर दोन-तीन चमचे प्रमाणे घेऊन कागदाच्या पुड्या करून आंब्याच्या ढीगात वेगवेगळ्या कोपºयात दोन-दोन फुटांच्या अंतरावर ठेवून दिल्या जातात. या पावडरच्या उष्णतेमुळेच परिणाम होऊन आंबे लवकर पिकतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव