शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जळगावचा मालधक्का शिरसोली येथे होणार - पालकमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:37 IST

जळगाव :  जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का पाळधी येथे स्थलांतरीत होणार होता, मात्र हा केंद्र शासनाचा विषय असल्याने हा ...

जळगावजळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का पाळधी येथे स्थलांतरीत होणार होता, मात्र हा केंद्र शासनाचा विषय असल्याने हा धक्का आता माझ्याच मतदारसंघात असणाऱ्या शिरसोली येथे लवकरच स्थलांतरीत होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जळगावच्या मालधक्क्यामुळे समस्या निर्माण झाल्या होत्या. येथे होणारी वाहतूक समस्या, पिंप्राळा रेल्वे गेटजवळ होणारी वाहतूक कोंडी यामुळे अपघात देखील होत होते. अनेकदा निष्पाप नागरिकांचे बळी जात होते. त्यामुळे शहरवासीयांची सुटका व्हावी याकरिता हा रेल्वे धक्का पाळधी येथे स्थलांतरीत करण्यात येणार होता. त्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन हे दिल्लीत जाऊन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी जाऊन चर्चा करून आले होते. यावेळी खासदार उन्मेष पाटील होते. चर्चेत मालधक्क्याला येणाऱ्या अडचणी व त्याबाबतचे पर्याय याविषयी चर्चा झाली होती. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यावर सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र मालधक्का हलविण्याचा विषय केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी नामंजूर केला होता. रविवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली. सदर मालधक्क्याचा विषय हा केंद्र सरकारचा आहे, त्यात कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे सूरत रेल्वे लाईनवर असलेल्या पाळधीला स्थलांतरीत होत असलेला मालधक्का हा आता मुंबई रेल्वे लाईनवर असलेल्या शिरसोली येथे स्थलांतरीत होत आहे. दोन्हीकडील भाग हे माझ्याच मतदारसंघात येतात. त्याचा आनंद असून त्यामुळे शिरसोली येथे मालधक्का आल्यावर त्याचा विकास केला जाईल अशी माहिती देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. मालधक्का लवकरच शिरसोली येथे स्थलांतरीत होणार असल्याने शहरवासीयांची वाहतूक कोंडी, अपघात या मालिकेतून आगामी काळात सुटका होणार आहे.

जळगावच्या कृषी व औद्योगिक विकासामध्ये मालधक्क्याचे महत्व आहे. जळगाव शहरात वाहतुकीची अडचण पाहता हा मालधक्का*पाळधी ऐवजी आता शिरसोली येथे होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

- पालकमंत्री गुलाबराव पाटील

 

टॅग्स :Jalgaonजळगाव