शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

जिल्ह्यात पुढील महिन्यातच होणार मका, गहू खरेदीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -जिल्ह्यात रब्बीचे जवळजवळ १०० टक्के पीक काढण्यात आले असून, अनेक शेतकऱ्यांनी आपला माल विक्री करण्यासदेखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -जिल्ह्यात रब्बीचे जवळजवळ १०० टक्के पीक काढण्यात आले असून, अनेक शेतकऱ्यांनी आपला माल विक्री करण्यासदेखील सुरुवात केली आहे. मात्र दरवर्षाप्रमाणे यंदाही शासकीय खरेदीला आतापर्यंत सुरुवात झालेले नाही. नाफेड तर्फे धान्य खरेदीबाबत नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, ३० एप्रिलपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे. मात्र दरवर्षी उशिराने सुरू होणाऱ्या शासकीय खरेदीमुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना हा माल विक्री करावा लागत आहे.

जिल्ह्यात गहू, दादर व मका खरेदीला पुढील महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. नाफेडतर्फे जिल्ह्यातील १७ केंद्रांवर धान्य खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. हरभऱ्याच्या खरेदीला जिल्ह्यात सुरुवात झाली असून जिल्ह्यातील १४ केंद्रांवर आतापर्यंत ४० हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एन. मगर यांनी दिली आहे. दरम्यान, हरभरा खरेदीसाठी राज्य शासनाकडून २५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता शासनाने हरभरा खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ दिली असून आता २५ मे पर्यंत जिल्ह्यात हरभऱ्याची खरेदी सुरू राहणार असल्याची ही माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडूनच होते मालाची विक्री

दरवर्षी शासनाकडून रब्बी पिकांचा खरेदीला उशीर केला जात असतो, त्यातच यावर्षी कोरोनामुळे राज्य शासनाकडून लॉकडाऊन जाहीर केले जाणार असल्याचे गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. यामुळे शेतकऱ्यांना माल विक्री करता येणार नाही. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी रब्बीचे पीक निघाल्यानंतर काही दिवसाचा आतच मिळेल त्या भावाने व्यापाऱ्यांना आपला माल विक्री करून दिला. रब्बी हंगामाच्या काढणीला सुरुवात झाल्यानंतर जर शासनाने खरेदीला सुरुवात केली तर शेतकरी आपला माल थेट शासकीय खरेदी केंद्रावर आणू शकले असते. दरवर्षी हा प्रकार सुरू असून याबाबत शासन किंवा प्रशासन देखील कोणतेही लक्ष घालायला तयार नाही. जर रब्बी हंगाम काढायला सुरुवात झाली तेव्हाच शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले तर अशा प्रकारांना आळा बसू शकतो. आतादेखील जिल्ह्यातील ५० टक्के शेतकऱ्यांनी आपल्याकडील गहू, दादर हे पिके व्यापाऱ्यांना विक्री करून दिली आहेत. ठरावीक शेतकऱ्यांकडे आता माल शिल्लक आहे. शासकीय खरेदी सुरुवात झाल्यानंतर अनेक व्यापारी शेतकऱ्यांचा सातबारा घेऊन नोंदणी करतात व शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कमी भावाच्या मालाला शासकीय खरेदी केंद्रावर जास्त भावात विक्री करतात. ही साखळी अनेक वर्षांपासून सुरू असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

मका खरेदीचे एकदा उद्दिष्ट स्पष्ट नाही

१. मका खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र शासनाकडून अद्यापही मका खरेदीबाबत कोणतेही उद्दिष्ट जाहीर झालेले नाही. शासनाकडून उद्दिष्ट जाहीर झाल्यानंतर तेवढी खरेदी होऊन शासकीय खरेदी केंद्र बंद केले जातात.

२. गेल्या वर्षी देखील २० हजार शेतकऱ्यांची नोंदणी झालेले असताना केवळ चार हजार शेतकऱ्यांकडून माल घेण्यात आला होता.यामुळे तब्बल १६ हजार शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांकडे कमी भावात विक्री करावा लागला होता. या वर्षी तरी ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शासनाने सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून माल खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

३. सध्या दादरला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३१०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव निश्चित केला आहे. मात्र हा भाव निश्चित केला असला तरी बाजार समितीमध्ये दादरला केवळ २२०० ते २३०० रुपये इतका दर मिळत असून, त्यातही कट्टी कापून घेतली जात आहे.