शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यात पुढील महिन्यातच होणार मका, गहू खरेदीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -जिल्ह्यात रब्बीचे जवळजवळ १०० टक्के पीक काढण्यात आले असून, अनेक शेतकऱ्यांनी आपला माल विक्री करण्यासदेखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -जिल्ह्यात रब्बीचे जवळजवळ १०० टक्के पीक काढण्यात आले असून, अनेक शेतकऱ्यांनी आपला माल विक्री करण्यासदेखील सुरुवात केली आहे. मात्र दरवर्षाप्रमाणे यंदाही शासकीय खरेदीला आतापर्यंत सुरुवात झालेले नाही. नाफेड तर्फे धान्य खरेदीबाबत नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, ३० एप्रिलपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे. मात्र दरवर्षी उशिराने सुरू होणाऱ्या शासकीय खरेदीमुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना हा माल विक्री करावा लागत आहे.

जिल्ह्यात गहू, दादर व मका खरेदीला पुढील महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. नाफेडतर्फे जिल्ह्यातील १७ केंद्रांवर धान्य खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. हरभऱ्याच्या खरेदीला जिल्ह्यात सुरुवात झाली असून जिल्ह्यातील १४ केंद्रांवर आतापर्यंत ४० हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एन. मगर यांनी दिली आहे. दरम्यान, हरभरा खरेदीसाठी राज्य शासनाकडून २५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता शासनाने हरभरा खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ दिली असून आता २५ मे पर्यंत जिल्ह्यात हरभऱ्याची खरेदी सुरू राहणार असल्याची ही माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडूनच होते मालाची विक्री

दरवर्षी शासनाकडून रब्बी पिकांचा खरेदीला उशीर केला जात असतो, त्यातच यावर्षी कोरोनामुळे राज्य शासनाकडून लॉकडाऊन जाहीर केले जाणार असल्याचे गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. यामुळे शेतकऱ्यांना माल विक्री करता येणार नाही. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी रब्बीचे पीक निघाल्यानंतर काही दिवसाचा आतच मिळेल त्या भावाने व्यापाऱ्यांना आपला माल विक्री करून दिला. रब्बी हंगामाच्या काढणीला सुरुवात झाल्यानंतर जर शासनाने खरेदीला सुरुवात केली तर शेतकरी आपला माल थेट शासकीय खरेदी केंद्रावर आणू शकले असते. दरवर्षी हा प्रकार सुरू असून याबाबत शासन किंवा प्रशासन देखील कोणतेही लक्ष घालायला तयार नाही. जर रब्बी हंगाम काढायला सुरुवात झाली तेव्हाच शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले तर अशा प्रकारांना आळा बसू शकतो. आतादेखील जिल्ह्यातील ५० टक्के शेतकऱ्यांनी आपल्याकडील गहू, दादर हे पिके व्यापाऱ्यांना विक्री करून दिली आहेत. ठरावीक शेतकऱ्यांकडे आता माल शिल्लक आहे. शासकीय खरेदी सुरुवात झाल्यानंतर अनेक व्यापारी शेतकऱ्यांचा सातबारा घेऊन नोंदणी करतात व शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कमी भावाच्या मालाला शासकीय खरेदी केंद्रावर जास्त भावात विक्री करतात. ही साखळी अनेक वर्षांपासून सुरू असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

मका खरेदीचे एकदा उद्दिष्ट स्पष्ट नाही

१. मका खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र शासनाकडून अद्यापही मका खरेदीबाबत कोणतेही उद्दिष्ट जाहीर झालेले नाही. शासनाकडून उद्दिष्ट जाहीर झाल्यानंतर तेवढी खरेदी होऊन शासकीय खरेदी केंद्र बंद केले जातात.

२. गेल्या वर्षी देखील २० हजार शेतकऱ्यांची नोंदणी झालेले असताना केवळ चार हजार शेतकऱ्यांकडून माल घेण्यात आला होता.यामुळे तब्बल १६ हजार शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांकडे कमी भावात विक्री करावा लागला होता. या वर्षी तरी ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शासनाने सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून माल खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

३. सध्या दादरला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३१०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव निश्चित केला आहे. मात्र हा भाव निश्चित केला असला तरी बाजार समितीमध्ये दादरला केवळ २२०० ते २३०० रुपये इतका दर मिळत असून, त्यातही कट्टी कापून घेतली जात आहे.