शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अशुद्ध अन्न, पाणी व हवा आजाराचे मूळ कारण - वैद्य सी.व्ही. त्रिपाठी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 11:57 IST

धन्वंतरी जयंतीनिमित्त वैद्य जे.जे. पाटील व पराग जहागिरदार यांचा सत्कार

ठळक मुद्देआयुव्रेदामुळे आजाराचे समूळ उच्चाटनवैद्यकशास्त्रात आयुर्वेदाचे योगदान व परिणामात्मक उपचार पद्धती याविषयी माहिती

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18 - अशुद्ध पाणी, अन्न आणि हवा हे आजाराचे मूळ असून त्यावर  पुरातनकाळापासून सुरु असलेल्या आयुर्वेद उपचार पद्धतीतून उपचार करणे शक्य आहे, असे प्रतिपादन वैद्य सी.व्ही. त्रिपाठी यांनी केले. या वेळी वैद्य जे.जे.पाटील, वैद्य पराग जहागिरदार यांचा सन्मान करण्यात आला. आयुव्रेदीक डॉक्टरांच्यावतीने मंगळवारी आयएमए सभागृहात  धन्वंतरी पूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सी.व्ही. त्रिपाठी यांच्यासह डॉ. प्रताप जाधव, वैद्य किशोर मोरे, वैद्य पी.एस. चौधरी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले.   डॉ. प्रताप जाधव यांनी वैद्यकशास्त्रात आयुर्वेदाचे योगदान व परिणामात्मक उपचार पद्धती याविषयी माहिती दिली. वैदय पी.एस.चौधरी यांनी धन्वंतरींच्या कार्याचा आढावा घेतला. किशोर मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वैद्य नरेंद्र गुजराथी यांनी केले.आयुर्वेदातील प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे. पृथ्वी, मानवाच्या जन्मापासून आयुर्वेदाचा उपयोग केला जात आहे. यामुळे आजार होवू नये, याचबरोबर झाल्यानंतरही त्यांचे समुळ उच्चाटन करण्याची क्षमता आयुर्वेदात असल्याचे  वैद्य जे.जे.पाटील यांनी सांगितले. विविध कटीबंधात औषध निर्मिती होत आहे. पाश्चात्य देशात निर्माण होणारी औषधी भारताला तारु शकत नाही असे जे.जे. पाटील यांनी सांगून जगात काही रोगांनी डोकेवर काढले आहे. यामुळे 75 टक्के लोक कायम आजारी असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे  काम आता आयुर्वेद करीत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.