शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

वर्डी येथे दीडशे पोती गव्हापासून बनविला बट्टीचा महाप्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 20:12 IST

चोपडा तालुक्यातील वर्डी येथे शुक्रवारी सद्गुरू सुकनाथ बाबा यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत महाप्रसादात तब्बल दीडशे पोती गव्हापासून बट्टी बनविण्यात आल्या होत्या. त्यांना भाजण्यासाठी शेकडो हात पुढे आले होते. सोबत ३५ क्विंटल तूरदाळीपासून बनविलेले स्वादिष्ट वरण आणि ६० क्विंटल वांग्याच्या भाजीचा सुमारे पाच लाखावर भाविकांनी लाभ घेतला.

ठळक मुद्देदीडशे क्विंटल गव्हापासून बनविलेल्या बट्टींना सामूहिकरितीने आगीवर भाजलेभाविकांच्या स्वागतासाठी गावकरी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली धावपळबस आगारातर्फे भाविकांसाठी जादा बसगाड्या

लोकमत आॅनलाईनवर्डी ता. चोपडा, दि.३ : येथील ग्रामदैवत समजल्या जाणाºया श्री सद्गुरू सुकनाथ बाबा यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजीत महाभंडारा कार्यक्रमात पंचक्रोशीतील भाविकांनी दिलेल्या देणगीतून तब्बल दीडशे पोती गव्हापासून बट्ट्या बनविण्यात आल्या. राज्य आणि परराज्यातील भाविकांनी महाप्रसादरुपाने त्याचा लाभ घेतला. बट्ट्या भाजण्यासाठी शेकडो हातांची यावेळी मदत झाली.सुकनाथ बाबा हे वर्डीत वास्तव्यास होते. त्यांनी गावकºयांसाठी शाळेसह अनेक सेवाभावी उपक्रम सुरू केले होते. ते वर्डी गावाला स्वत:ची कर्मभूमी समजत. १९३५ मध्ये त्यांनी समाधी घेवून त्यांच्या गादीचे वारस म्हणून रघुनाथ बाबा यांच्याकडे धुरा सोपवली. तेव्हा सातपुड्यातील आदिवासींकडून अगदी अल्प स्वरुपात घेतलेल्या धान्यापासून बनविलेल्या बट्टीने भंडाºयाची सुरूवात करण्यात आली. सलग ८२ वर्षांपासून भंडाºयाची परंपरा आजही वर्डीकरांनी जोपासली आहे. सुकनाथ बाबा यांच्या दरवर्षी येणाºया पुण्यतिथीला महाभंडारा केला जातो. यावेळी वरण- बट्टीचा महाप्रसाद केला जातो. आजच्या घडीला तब्बल १५० पोती गव्हापासून बट्ट्या बनविण्याचा लोकप्रिय प्रवास या सोहळ्याने गाठला आहे.यंदा दोन दिवसापासून अहोरात्र परिश्रम घेत गावकºयांनी राज्यासह परराज्यातून आलेल्या सुमारे पाच सहा लाख भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या निमित्त परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. गावातील तसेच पंचक्रोषीतील विविध मान्यवरांनी जागोजागी भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. प्रत्येक जण आपापल्या परिने भाविकांसाठी मदत करीत होते. दीडशे पोती गव्हापासून बनविलेल्या बट्ट्या, ३५ ते ४० क्विंटल तुरदाळपासून वरण आणि सुमारे ६० क्विंटल वांग्याची भाजी बनविण्यात आली होती. दरम्यान, वर्डी गावातील वंदे मातरम् क्लबतर्फे संपूर्ण गावाची साफसफाई करण्यात आली. क्लबच्या सदस्यांनी गावातील तसेच मुख्य रस्त्यावरील केरकचरा वेचून जाळून टाकला. तसेच गावात घरांसमोर रांगोळ्या काढून सुशोभिकरण केले होते. रांगोळ्यांमध्ये जनजागृतीपर घोषवाक्ये, पर्यावरण संरक्षण घोषवाक्ये लिहून येणाºया भाविकांचे लक्ष वेधण्याचे कार्यर् देखील क्लबच्या सदस्यांतर्फे केले जात होते. रा.प.मंडळातर्फे जळगाव, यावल, चोपडा या आगारामार्फत जादा बसेसची व्यवस्था केली होती. तसेच उपआगाराची निर्मितीदेखील केली होती. त्याचप्रमाणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :Chopdaचोपडा