शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

तत्वनिष्ठ गुरुसाठी एकनिष्ठपणा आवश्यक - दादा महाराज जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 13:00 IST

जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ डॉक्टरांच्या सत्कार

जळगाव : जो पर्यंत मातृ-पितृ सेवा होत नाही तोपर्यंत गुरु तत्व संभाळता येत नाही आणि तत्वनिष्ठ गुरु हा एकनिष्ठ असल्याशिवाय मिळत नाही, असा सल्ला चिमुकले श्रीराम मंदिराचे गादीपती ह.भ.प.दादा महाराज जोशी यांनी दिला.गुरुपौर्णिमेनिमित्त कै. वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी दुपारी आयएमए सभागृहात ज्येष्ठ डॉक्टरांच्या कृतज्ञता पूर्वक गौरव सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी दादा महाराज जोशी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते. व्यासपीठावर दादा महाराज जोशी यांच्यासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य जयंत जहागिरदार, सत्कारार्थी ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.उल्हास पाटील व बालरोगतज्ज्ञ डॉ.राजेंद्र पाटील उपस्थित होते.प्रारंभी दीपप्रज्वलन, धन्वंतरी पुजन झाले. वैद्य योगेंद्र कासट यांनी धन्वंतरी स्तवन सादर केले. परिचय वैद्य अमित चौधरी यांनी करुन दिला.सत्कारमूर्ती डॉ.उल्हास पाटील व डॉ.राजेंद्र पाटील यांना दादा महाराज जोशी यांना ह.भ.प.दादा महाराज जोशी यांच्याहस्ते पुष्पहार, शाल, श्रीफळ, भेटवस्तू व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल वैद्य नरेंद्र गुजराथी, वैद्य हेमंत बाविस्कर आणि एन.डी.पाटील, आरती पाटील, प्रीती गुजराथी आदींचा सत्कार करण्यात आला.गुरुशिष्य परंपरा माणसाला निर्भय करणारीभारतीय संस्कृती मातृशक्तीवर आधारीत असून गुरुशिष्य परंपरा माणसाला निर्भय करते असे ह.भ.प.दादा महाराज जोशी यांनी नमूद केले. प्रतिष्ठानतर्फे डॉक्टरांविषयी कृतज्ञता म्हणजे वंदन करण्याचे कार्य आहे. कारण सत्कारमूर्ती म्हणजे मूर्तीत देवत्व असते आणि डॉक्टर म्हणजे धन्वंतरी अर्थात विष्णूचे रुपच आहे. स्वकर्तृत्व सर्वश्रेष्ठ असते. अशा कर्तृत्ववान डॉक्टरांचा गुरुपौणिमेला सत्कार करणे ही आदर्श गुरु परंपरा असून ती माणसाला निर्भय बनविते असेही ते म्हणाले.राजकारणापेक्षा वैद्यकीय सेवा कायम चांगलीसत्काराला उत्तर देताना डॉ.उल्हास पाटील यांनी शिक्षणापासून वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना असा प्रवास सांगितला. पुरुष डॉक्टरांनी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्य करण्यास डॉ.अविनाश आचार्य यांच्या कार्यपद्धतीमुळे शक्य झाले असे सांगून ही परंपरा येथील दिग्गज डॉक्टरांनी पुढे नेल्याचेही त्यांनी नमीद केले. बरे झाले ते राजकारणार नव्हते, असाही उल्लेख त्यांनी करताच हशा पिकला. राजकारणापेक्षा वैद्यकीय सेवा कायम चांगली आहे, असेही ते म्हणाले.यशात गुरुंचा मोठा वाटाडॉ.राजेंद्र पाटील यांनी वडीलच शिक्षक असल्यामुळे घरी आणि शाळेत तेच गुरु तसेच घर म्हणजेच गुरुकुल झाल्याने चांगले संस्कार झाले. जे चांगले झाले, यश मिळाले त्यात गुरुंचा मोठा वाटा असतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.सूत्रसंचालन वैद्य आनंद दशपूत्रे यांनी केले तर वैद्य जयंत जहागिरदार यांनी आभार मानले. माधुरी जहागिरदार व मधुरा जहागिरदार यांनी स्वागत केले. कार्यक्रमास वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव