शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वकिलीच्या सल्ल्यातून खुलली प्रेमविवाहाची फाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:15 IST

जळगाव : वकिलीचा सल्ला देता..देता..त्यातूनच नजरानजर झाली..आणि मग त्यातून ओळख व मैत्री...या मैत्रीचे रुपांतर प्रेमात अन‌् पुढे थेट प्रेमविवाहतच ...

जळगाव : वकिलीचा सल्ला देता..देता..त्यातूनच नजरानजर झाली..आणि मग त्यातून ओळख व मैत्री...या मैत्रीचे रुपांतर प्रेमात अन‌् पुढे थेट प्रेमविवाहतच झाले. ही प्रेम कहाणी आहे ॲड सूरज जहांगिर चौधरी आणि नेहा सतीश साळी यांची. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने प्रेमविवाह केलेले सूरज व नेहा यांनी तरुणाईला प्रेम करा, पण ते निस्सीम असले पाहिजे व दोघांना जबाबदारी, करियर व संसार याचेही भान ठेवावे, असे आवाहन ‘लोकमत’ च्या माध्यमातून केले आहे.

ॲड.सूरज चौधरी यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, आई वडिलांचाही प्रेमविवाह झालेला असल्याने प्रेमविवाहाविषयी घरात वादाचे कारणच नव्हते. न्यायालयीन प्रकरणाच्या निमित्ताने पत्रकार सिताराम साळी यांच्या कुटुंबाशी संबंध आला. त्यामुळे त्यांच्या घरी येणंजाणं वाढले. त्यांची न्यायालयीन केस हाताळत असताना सिताराम साळी यांची नात व सतीश साळी यांची मुलगी नेहा हिच्याशी ओळख झाली. या ओळखीतून नजरानजर होऊन दोघांना प्रेमाची चाहूल लागली. त्यातून प्रेम अधिक बहरले. वर्षभरातच आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याला नेहाच्या घरातून विरोध झाला. लग्न करणार तर सूरजशीच असा ठाम निर्धार करतानाच सूरज उच्च शिक्षित आहे, देखणा आहे. वकिली व्यवसायही चांगला आहे, कुटुंबात पोषक वातावरण देखील आहे. त्याचे आई, वडील स्विकारायला तयार आहेत या बाबी स्वत:च्या कुटुंबात पटवून दिल्या. दोघं परिवाराने पुढाकार घेत, जातीपातीच्या भींती, मर्यादा न ठेवता दोघांच्या सुखाचा विचार केला अन‌् प्रेमविवाहाला संमती दिली. त्यानुसार दोघं परिवाराच्या साक्षीने २६ डिसेंबर २०१२ रोजी थाटात विवाह पार पाडला.

आठ वर्षापासून सुखाने संसार

आजच्या तरुण पीढीतील अनेक जण ‘व्हॅलेंटाईन डे’ व प्रेम याकडे क्षणिक पाहतात, मात्र हे नाते पवित्र ठेवताना स्वत:चे करिअर, संसार याकडे जबाबदारीने पाहिले पाहिजे. मुलगी आई, वडिलांना सोडून आपल्याशी एकरुप होते हे देखील बघितले पाहिजे, या नात्याला तडा न जावू देता एकोप्याने संसार करुन दोघं कुटुंब आपल्यामुळे तणावात येणार नाही याची काळजी घ्यावी. आमच्या सुखी संसाराला आठ वर्ष झाली, या दिवसात कुठेही मतभेद झाले नाहीत. दोघांनीही स्वत:सह दोघांच्या आई, वडिलांचा मान, सन्मान ठेवत काळजी घेतली. एक आदर्श असे आमचे कुटुंब ठरल्याचे ॲड.सूरज चौधरी म्हणाले.