शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

वकिलीच्या सल्ल्यातून खुलली प्रेमविवाहाची फाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:15 IST

जळगाव : वकिलीचा सल्ला देता..देता..त्यातूनच नजरानजर झाली..आणि मग त्यातून ओळख व मैत्री...या मैत्रीचे रुपांतर प्रेमात अन‌् पुढे थेट प्रेमविवाहतच ...

जळगाव : वकिलीचा सल्ला देता..देता..त्यातूनच नजरानजर झाली..आणि मग त्यातून ओळख व मैत्री...या मैत्रीचे रुपांतर प्रेमात अन‌् पुढे थेट प्रेमविवाहतच झाले. ही प्रेम कहाणी आहे ॲड सूरज जहांगिर चौधरी आणि नेहा सतीश साळी यांची. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने प्रेमविवाह केलेले सूरज व नेहा यांनी तरुणाईला प्रेम करा, पण ते निस्सीम असले पाहिजे व दोघांना जबाबदारी, करियर व संसार याचेही भान ठेवावे, असे आवाहन ‘लोकमत’ च्या माध्यमातून केले आहे.

ॲड.सूरज चौधरी यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, आई वडिलांचाही प्रेमविवाह झालेला असल्याने प्रेमविवाहाविषयी घरात वादाचे कारणच नव्हते. न्यायालयीन प्रकरणाच्या निमित्ताने पत्रकार सिताराम साळी यांच्या कुटुंबाशी संबंध आला. त्यामुळे त्यांच्या घरी येणंजाणं वाढले. त्यांची न्यायालयीन केस हाताळत असताना सिताराम साळी यांची नात व सतीश साळी यांची मुलगी नेहा हिच्याशी ओळख झाली. या ओळखीतून नजरानजर होऊन दोघांना प्रेमाची चाहूल लागली. त्यातून प्रेम अधिक बहरले. वर्षभरातच आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याला नेहाच्या घरातून विरोध झाला. लग्न करणार तर सूरजशीच असा ठाम निर्धार करतानाच सूरज उच्च शिक्षित आहे, देखणा आहे. वकिली व्यवसायही चांगला आहे, कुटुंबात पोषक वातावरण देखील आहे. त्याचे आई, वडील स्विकारायला तयार आहेत या बाबी स्वत:च्या कुटुंबात पटवून दिल्या. दोघं परिवाराने पुढाकार घेत, जातीपातीच्या भींती, मर्यादा न ठेवता दोघांच्या सुखाचा विचार केला अन‌् प्रेमविवाहाला संमती दिली. त्यानुसार दोघं परिवाराच्या साक्षीने २६ डिसेंबर २०१२ रोजी थाटात विवाह पार पाडला.

आठ वर्षापासून सुखाने संसार

आजच्या तरुण पीढीतील अनेक जण ‘व्हॅलेंटाईन डे’ व प्रेम याकडे क्षणिक पाहतात, मात्र हे नाते पवित्र ठेवताना स्वत:चे करिअर, संसार याकडे जबाबदारीने पाहिले पाहिजे. मुलगी आई, वडिलांना सोडून आपल्याशी एकरुप होते हे देखील बघितले पाहिजे, या नात्याला तडा न जावू देता एकोप्याने संसार करुन दोघं कुटुंब आपल्यामुळे तणावात येणार नाही याची काळजी घ्यावी. आमच्या सुखी संसाराला आठ वर्ष झाली, या दिवसात कुठेही मतभेद झाले नाहीत. दोघांनीही स्वत:सह दोघांच्या आई, वडिलांचा मान, सन्मान ठेवत काळजी घेतली. एक आदर्श असे आमचे कुटुंब ठरल्याचे ॲड.सूरज चौधरी म्हणाले.