शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

हरवलेलं पत्र, सावित्रीच्या लेकींना गवसलेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:18 IST

गुरुंमुळे जडला भडगावातील कन्याशाळेच्या विद्यार्थिनींना लेखनाचा छंद

संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव : माझ्या मामाचं पत्र हरवलं.. म्हणत पहिली-दुसरीत असतांना खेळला जाणारा हा एक आबा-धोबी चा खेळ. खेळातील हे पत्र प्रत्यक्ष जीवनातुन देखील हरवत चाललेय, दोन टोकास जोडणारे संवादाचे हे प्रभावी माध्यम आजच्या इंटरनेटच्या जमान्यातही टिकवून ठेवण्यासाठी भडगावातील कन्या विद्यालयाचे एक शिक्षक सुरेश रोकडे हे आपल्या विद्याथीर्नींना पत्रलेखनाची गोडी लावत हा अमुल्य ठेवा भावी पिढीला सोपवत आहेत.पत्रलेखन हा एकेकाळी सुख,दु:खे वाटुन घेणारा वाट पहावयास लावणारा सर्वसामांन्याचा जिव्हाळ्याचा विषय.अब्राहम लिंकनचे शाळेच्या मुख्याध्यापकास पत्र असो की राष्ट्रपिता महात्मा गांधी, सानेगुरुजी, सावरकर आदी महापुरुषांनी कारागृहातुन लिहलेली पत्रे आजही मन चेतवतात, आज व्हॉट्सअ‍ॅप आदी समाजमाध्यमांमुळे पत्रव्यवहारच दुर्मीळ होत चाललाय. अशा स्थितीत भावना मांडताना विचार अभिव्यक्तीला चालना मिळावी, अक्षर सुधारावे, एखाद्या विषयावर आपण बोलु शकत नाही पण लिहु शकतो, हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची तळमळ शिक्षक सुरेश रोकडे यांची यामागे आहे.मागील काही वर्षापासून कन्या शाळेतील या मुलींनी रोकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली शालेय पाठ्यपुस्तकातील कविता, पाठ लेखन करणाऱ्या लेखकांना पत्र लिहून त्या-त्या कार्यक्षेत्रात त्यांचे कामाविषयी गौरवोद्गार व शुभेच्छा दिल्यात. मान्यवरांनी दिलेल्या उत्तरादाखलच्या पत्रांमुळे या मुलींचा आनंद गगनात मावेनासा होतो.‘लोकमत’ च्या वृत्ताला सलाम... :वेदनांच्या अंथाग आर्णवात सरस्वतीचा खळखळाट. या लोकमत मधील हद्यस्पर्शी वृत्ताने भारावुन जात शिक्षक सुरेश रोकडे यांच्यासह या कन्या शाळेतील मुलींनी आर्णव व त्याची आई शितल यांच्या जिद्दीला अभिवादन व लोकमत च्या लेखणीला सलाम करणारी भावना मांडत वृत्तासमच हद्यस्पर्शी पत्रे लिहून शुभेच्छा दिल्यात.

टॅग्स :Jalgaonजळगाव