शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

जिल्ह्यातील बुकींची नजर मॅन्चेस्टरच्या हवामानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 11:11 IST

भारत-पाकच्या सामन्यासह पावसावरही कोट्यवधीचा सट्टा : संघाच्या विजयासह खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष

ठळक मुद्देपावसाच्या शक्यतेवर ५० पैसे तर पाऊस येणार नसल्याच्या शक्यतेवर २५ पैसे भाव

अजय पाटील जळगाव : वर्ल्ड कपमध्ये १६ जून रोजी पारंपरिक प्रतीस्पर्धी भारत-पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यावर जिल्ह्यात कोट्यवधीचा सट्टा लावण्यात आला आहे. त्यातच जिल्ह्यातील बुकींच्या नजरा थेट मॅन्चेस्टरच्या हवामानावर खिळल्या आहेत. सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, सामन्यादरम्यान पाऊस होईल की नाही ? यावर देखील लाखोंचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती सट्टाबाजारातील सूत्रांनी दिली आहे.भारत-पाकिस्तानच्या सामन्याबाबत जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्यातच गेल्या काही महिन्यांमध्ये भारत-पाकदरम्यान निर्माण झालेल्या अशांततेमुळे हा सामना अंत्यंत प्रतीष्ठेचा झाला असून, त्यातच दोन्ही संघ वर्ल्डकप सारख्या स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकल्याने चाहत्यांचा नजरा १६ जून रोजी होणा-या सामन्यावर खिळून बसल्या आहेत.चाहत्यांसह सट्टा बाजारातील बुकींच्या नजरा देखील या सामन्यावर आहेत. वर्ल्डकपमधील इतर सामन्यांचा तुलनेत या सामन्यावर वर्ल्डकप सुरु होण्याआधीपासून सट्टा लावला जात असल्याची माहिती सट्टा बाजारातील सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी झालेल्या भारत विरुध्द न्युझीलंड सामना देखील पावसामुळे रद्द झाला आहे. यावर सट्टा लावल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. या सामन्यावर देखील मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आला होता. तसेच आता किती सामने पावसामुुळे रद्द होतील व किती सामने होतील यावर देखील सट्टा लावला जात आहे.सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी१६ जून रोजी मॅन्चेस्टर येथे सामना होणाºया दरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सामन्यादरम्यान पाऊस होईल की नाही ? यावर सट्टा लावण्यात आला आहे. पावसाच्या शक्यतेवर ५० पैसे तर पाऊस येणार नसल्याच्या शक्यतेवर २५ पैसे भाव देण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज जरी पावसाचा असला तरी सट्टा बाजाराच्या मते मॅन्चेस्टरयेथे सामन्यादरम्यान पाऊस होणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाचा अंदाजासाठी बुकी काही आॅनलाईन हवामान संकेतस्थळाचा वापर करत आहेत. तर काही बुकी थेट अंदाजेच पावसाचा अंदाज लावत आहेत. दरम्यान, हा सामना डकवर्थ-लुईसच्या नियमानुसार होईल अशीही शक्यता बुकींकडून वर्तविली जात आहे.सट्टा बाजाराची पसंती भारतालाच-सट्टा बाजारात बुकींची पसंती ही भारतालाच आहे. सध्या भारतावर २५ पैसे ७५ पैसे असा भाव लावला जात आहे. तर पाकिस्तान १ ते दीड रुपयांपर्यंतचा भाव निश्चित करण्यात आला आहे.-प्राथकिम स्वरुपावर सट्टा बाजाराची भारताला पसंती असली तरी हे चित्र सामन्यानंतर बदलत जाणार असून, सामन्याचा प्रत्येक ओव्हर, विकेट व रन्सवर देखील सट्टा लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.-जय-पराजयासह खेळाडुंच्या वैयक्तिक कामगिरीवर देखील सट्टा लावण्यात आलेला आहे. मोहम्मद आमीर किती विकेट घेतो ? यासह विराट कोहली, रोहीत शर्मा यांच्या शतक व अर्धशतकांवर देखील लाखोंचा सट्टा लावण्यात आला आहे.-नाणेफेकीवर देखील सट्टा लावला जात असून भारत नाणेफेक जिंकल्यावर ५० पैसे व पाकिस्तान नाणेफेक ंिजंकल्यावर ७५ पैसे भाव निश्चित करण्यात आला आहे.

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीJalgaonजळगाव