शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

उमेदवारीविषयी पराकोटीची उत्कंठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 12:02 IST

निवडणूक म्हटली की, इच्छुकांची भाऊगर्दी ही ठरलेली असते. पण इच्छुकांची वर्गवारी करायची म्हटली तर सत्तासुंदरीचे स्वप्न पडणारे भावूक, नेत्यांनी पाठीवर हात ठेवताच बाहुबळ विस्तारलेले उत्साही, डावपेच आखून बाजी पलटविणारे धुरंधर हमखास असतात.

ठळक मुद्देखान्देशातील चार जागांपैकी सर्व चार खासदार सध्या भाजपाकडे आहेत. युती झाली तरी शिवसेनेकडे एकही जागा येणार नाही. तरी जळगावच्या जागेसाठी सेना आग्रही आहे, एवढेच काय तर आर.ओ.पाटील यांनी संपर्क अभियानदेखील सुरु केले आहे. आघाडीमध्ये काँग्रेसकडे दोन तर राष्टÑवादीक

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीची घोषणा महिन्यानंतर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची लगीनघाई सुरु आहे. राजकीय पक्षांनी सर्वेक्षणाद्वारे मतदारसंघातील स्थितीचा अंदाज कधीच घेतलेला आहे, आता इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला जात आहे. प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने पराकोटीची उत्कंठा निर्माण झाली आहे.खान्देशातील चार मतदारसंघांपैकी धुळ्याचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. दोन दिग्गज तेथे झुंजणार आहेत. अमरीशभाई पटेल यांनी काँग्रेसतर्फे दोनदा याठिकाणी भाग्य अजमावले, परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे यंदा ते स्वत: बाजूला झाले आणि रोहिदास पाटील यांना वाट करुन दिली. काँग्रेसमधील बेकीने अनेकदा घात केल्याचा इतिहास असताना यंदा एकीवर जोर दिला जात आहे. तीन राज्यातील निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याने अशा सकारात्मक बाबींची त्यात भर पडत आहे. एकमेकांशी झुंजणारे ‘जवाहर’ आणि ‘अँकर’ गट एकत्र आले तर काँग्रेसची स्थिती मजबूत होऊ शकते. अमरीशभाई स्पर्धेतून बाहेर पडल्याने रोहिदास पाटील हे एकमेव प्रबळ दावेदार उरले. प्रदेश समितीने त्यांचे एकट्याचे नाव केंद्रीय समितीकडे पाठविले आहे.भाजपातर्फे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हेच उमेदवार असतील, असे चित्र आहे. कारण इच्छुक म्हणूनदेखील कुणाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मुळात लोकसभेसाठी भाजपाकडे नेहमी उमेदवाराची वानवा राहिलेली आहे. नाशिकचे विधान परिषद सदस्य प्रतापराव सोनवणे यांना मालेगावचा विचार करीत संधी दिली गेली. त्यानंतर सेनेतील डॉ.भामरे यांना उमेदवारी देण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्रिपद असल्याने भामरे आणि भाजपा अशा दोघांच्यादृष्टीने ही जागा प्रतिष्ठेची झाली आहे.भाजपापुढे दोन अडचणी आता तरी दिसत आहे. मालेगावमध्ये भाजपाला समर्थन वाढवावे लागेल तर दुसरीकडे असंतुष्ट आमदार अनिल गोटे यांच्या उपद्रवाला कसे सामोरे जायचे याची रणनीती ठरवावी लागणार आहे. धुळे महापालिकेतील सत्ता आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भक्कम साथ ही भामरे यांची जमेची बाजू राहणार आहे.नंदुरबार आणि जळगावात चुरस निर्माण झालेली आहे. नंदुरबारात भाजपाची उमेदवारी डॉ.हिना गावीत यांना निश्चित मानली जात आहे. राष्टÑवादी वा कॉंग्रेस प्रवेशाच्या वावड्या उठल्या असल्या तरी डॉ.विजयकुमार गावीत आणि डॉ.हीना गावीत यांनी ठामपणे त्या फेटाळल्या आहेत.काँग्रेसमध्ये परिवर्तनाचे वारे वाहत आहे. माणिकराव गावीत आणि सुरुपसिंग नाईक या काँग्रेसच्या अग्रेसर शिलेदारांनी सक्रीय राजकारणातून बाहेर व्हायचे ठरविलेले दिसते आहे. त्यामुळे लोकसभेसाठी माणिकरावांचे पूत्र भरत आणि धडगावचे आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी या दोघांच्या नावाची शिफारस केंद्रीय समितीकडे करण्यात आली आहे. माणिकरावांच्या नावाचा करिष्मा भरत गावीत यांना उपयोगी ठरतो की, आमदारकीचा दीर्घ अनुभव पाडवी यांना कामी येतो, हे बघायचे. नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी हे प्रकृतीच्या कारणास्तव बाहेरगावी असल्याने अमरीशभाई पटेल यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी सोपविली असल्याची माहिती समोर आली आहे. सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांना कार्याध्यक्ष नेमून पटेल यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतल्याचे दिसते.जळगावात भाजपा आणि राष्टÑवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षात उमेदवारीविषयी चुरस आहे. भाजपामध्ये स्वत: ए.टी.पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ, आमदार उन्मेष पाटील, प्रकाश पाटील तर राष्टÑवादी काँग्रेसमध्ये अनिल भाईदास पाटील, प्रमोद पाटील यांची नावे चर्चेत आहेत.रावेरविषयी उत्कंठा कायम असली तरी खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट कापण्याची शक्यता अतीशय कमी आहे. एकेक जागा महत्त्वाची असताना भाजपाचे श्रेष्ठी जोखीम घेणार नाहीत, असे म्हटले जाते. राष्टÑवादीतर्फे अ‍ॅड.रवींद्र पाटील, संतोष चौधरी स्पर्धेत आहेत. डॉ.उल्हास पाटील यांच्यासाठी काँग्रेस ही जागा घेण्यास उत्सुक आहे.धुळ्याची लढाई दोन दिग्गजांमध्ये होईल, हे निश्चित झाले आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांना भाजपाची उमेदवारी मिळेल, अशी खात्री समर्थकांना आहे. कारण पर्यायी उमेदवार पक्षाकडे नाही. त्यांच्या विरोधात काँग्रेस दिग्गज नेते रोहिदास पाटील यांना उतरविणार आहे. प्रदेश समितीने त्यांच्या एकट्याचे नाव केंद्रीय समितीकडे पाठविले आहे. नंदुरबारात अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत यांचेही नाव केंद्रीय समितीकडे पाठविले गेले आहे.चर्चेतील छायाचित्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. जळगाव व रावेरचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळची दोन छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारीत झाली आणि गहजब उडाला. एकात फडणवीस, दानवे हे खुर्चीत बसलेले तर खडसे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल हे उभे आहेत. मात्र दुसºयात सगळे बसलेले आहेत..