शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आॅन द व्हील्सलोकमत आॅन द व्हील्स : बॅरेजचे श्रेय घेणाऱ्यांना मत देऊ नका....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:58 IST

नंदुरबार ते शहादा ४0 किमी

रमाकांत पाटीलनंदुरबार : तापी नदीवरील बॅरेजेस बांधून १० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला; पण त्याचे पाणी शेतापर्यंत पोहोचले नाही. प्रत्येक निवडणूक आली का सर्वच पक्षवाले आम्ही बॅरेज बांधले, आम्ही बॅरेज बांधले करून गाजावाजा करतात, पण त्याचा कुठलाही फायदा नाही. या निवडणुकीत जर राजकीय पक्षांनी त्याचा ढिंडोरा पिटला तर अशांना मतच देणार नाहीत... अशी संतप्त प्रतिक्रिया नंदुरबार-शहादा दरम्यान प्रवास करणाऱ्या शेतकरी प्रवाशांनी व्यक्त केली.नंदुरबार ते शहादा हे ४० किलोमीटरचे अंतर.... प्रवाशांच्या निवडणुकीसंदर्भातील प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता विविध प्रश्नांवर अतिशय संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. या बसमध्ये विशेषत: अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी व शेतकरी असेच प्रवासी होते. प्रवास जसजसा पुढे सरकू लागला तसतसे प्रश्न समोर येत गेले आणि स्वाभाविकच त्याबाबतची चिड प्रवाशांमध्ये व्यक्त होत गेली. समशेरपूर गावाजवळ पूर्वीचा पुष्पदंतेश्वर कारखाना येताच हिरूभाई पाटील व काशिनाथ पाटील यांनी उसाचा प्रश्न मांडून यंदा उसाला भाव मिळाला नसल्याचे सांगितले. त्याला सरकारी धोरण जबाबदार असल्याचे ते सांगत होते. त्यांचा हा विषय पूर्ण होत नाही तोच तापी नदीवरून बस पुढे सरकत असताना काही शेतकरी प्रवाशांनी प्रकाशा बॅरेजकडे बोट दाखवित सांगितले, तो पहा तो प्रकल्प अनेक वर्षांपासून पूर्ण झाला आहे. पण उपसा योजना करण्याबाबत केवळ आश्वासन दिले जाते. गेल्या १० वर्षात जेवढ्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार त्याचे श्रेय घेतात. पण उपसा योजना कोणी केल्या नाहीत. ज्यांचे सरकार येते ते आश्वासन देतात. पण अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. केवळ आश्वासने ऐकून आता चिड यायला लागली आहे. त्यामुळे यावेळी जर कोणी बॅरेजचे श्रेय घेतले तर त्याला मतेच देणार नाही, असा सूर या प्रवाशांनी व्यक्त केला.प्रवास झाला अर्धा तास लांबडामरखेडा ते शहादा दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रवास खडतर व संथ झाला. त्यावर विद्यार्थ्यांनी प्रश्न करीत आमचा प्रवास या रस्त्यामुळे अर्ध्या तासाने वाढला. त्यामुळे कॉलेजला आम्हाला एरवीपेक्षा एक तास आधी जावे लागते.

टॅग्स :Jalgaonजळगाव