शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

लोकमत आॅन द व्हील्स : शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:12 IST

जळगाव ते चाळीसगाव ९८ किमी

सचिन देवजळगाव : दर पंचवर्षिक निवडणुकीला सर्वच पक्षांचे उमेदवार, तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देऊ, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाऊ देऊ, गावातील पाण्याचा प्रश्न सोडवु, अशा मोठ-मोठ्या घोषणा देऊन निवडुन येत असतात. मात्र, निवडुन आल्यानंतर तोंडही दाखवित नाहीत. त्यामुळे यंदा लोकसभेच्या निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांनी नुसत्या घोषणा नको करायला.. तर निवडुन आल्यानंतर रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांचे समस्या व गावातील अनेक वर्षांपासुन असलेले पाणी टंचाईचे प्रश्न सोडवावेत. अशी अपेक्षा एस. टी. महामंडळाच्या बसमधुन जळगाव-चाळीसगाव प्रवास करणाºया प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधीने जळगाव-चाळीसगाव बसमधुन प्रवास करतांना, प्रवाशांची मते जाणुन घेतली. यावेळी पाचोरा येथील संतोष भटकर यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यामध्ये एक-दोन उद्योग वगळता, एकही मोठा उद्योग नाही. त्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर येथील मुलांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते. पाच वर्षांत या ठिकाणी एकही उद्योग उभा राहिला नाही. त्यामुळे आता निवडुन येणाºया कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराने युवकांसाठी रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे. जिल्ह्यात नवीन उद्योग आणला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भडगाव येथील सुरेश बोराडे या विद्यार्थ्याने देखील जिल्ह्यात हजारो तरुणांना नोकरी मिळेल, असा मोठा उद्योग आला पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली. पिंपरखेड येथील विठ्ठल गोराणे यांनी नोकरदार वर्गाला दर महिन्याला वेतन मिळत असते. मात्र, शेतकºयाचे तसे नाही. शेतात पिकले तर वर्षभर गुजारा होतो. त्यामुळे सरकारने शेतकºयांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. तालुकास्तरावर फळ प्रक्रिया उद्योग उभारण्याची अपेक्षाही व्यक्त केली.युवकांचा रोजगारावर भरया बस प्रवासात अनेक युवकांनी रोजगारवरच भर दिलेला दिसुन आला. जिल्हास्तरावरच नोकरी मिळावी,अशी यंत्रणा उभारण्याची मागणी केली.तर काही प्रवाशांनी जिल्ह्यात दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी, रुग्णालये उभारण्याची मागणी केली. तसेच वयोवृद्धांसाठी विशेष योजना राबविण्याची मागणी केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव