शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आॅन द व्हील्स : शेतकरी स्वावलंबी झाले तर प्रश्न सुटतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:59 IST

धुळे ते तरवाडे 28 किमी

वसंत कुलकर्णीधुळे : शेतकरी घाम गाळून शेतात अन्न धान्य पिकवतो. मात्र त्याला कवडीमोल भाव मिळतो. हमी भाव दिला तर सर्व अडचणी सुटतील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी व वीज व हमी भाव दिला तर कुठल्याच अनुदानाची त्याला गरज पडणार नाही, शेतकरी स्वावलंबी होईल. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे त्यांना अनुदानाची रक्कम लवकर मिळते. मात्र जो शेतकरी मुळात गरीब आहे, ज्यांना अनुदानाची गरज आहे त्यांनाच ते मिळत नाही. यावर विचार होण्याची गरज असल्याची अपेक्षा शेतकरी संदीप पोतदार यांनी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदारांशी धुळे-तरवाडे या बसप्रवासात संवाद साधला.गरीब-श्रीमंतातील दरी वाढत असून गरीब जास्त गरीब तर श्रीमंत जास्त श्रीमंत होत असल्याचे दिपाली साळवे यांनी सांगितले. तर सवलती मिळाव्यात म्हणून आज अनेक नागरिक खोटे दाखले देऊन फायदे लाटतात़मात्र ज्यांना खरी गरज आहे व पात्रही आहेत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, अशी व्यथा बसच्या वाहक विजया लोकरे यांनी व्यक्त केली.आतापर्यंत केवळ आश्वासनांचा दिलासा दिला गेला. आता मात्र अपेक्षांची पूर्तता व्हावी, ही मागणी यावेळी प्रवासी मतदारांकडून करण्यात आली.स्थानिक मुद्याला महत्वनागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. स्वच्छतागृहे, गावात रस्ते नाही. हेच पूर्वापार चालत आलेले प्रश्न आहेत. आठ आठ दिवस पाणी मिळत नाही हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे.भूगर्भातून पाण्याचा उपसा होतो. मात्र जलपुनर्भरणाचा विचारच कोणी करत नाही. तरुणांना रोजगार नाही. बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत असल्याची कैफीयत भिकनराव भदाणेंनी मांडली.

टॅग्स :Jalgaonजळगाव