शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

लोकमत आॅन द व्हील्स : शेतकरी स्वावलंबी झाले तर प्रश्न सुटतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:59 IST

धुळे ते तरवाडे 28 किमी

वसंत कुलकर्णीधुळे : शेतकरी घाम गाळून शेतात अन्न धान्य पिकवतो. मात्र त्याला कवडीमोल भाव मिळतो. हमी भाव दिला तर सर्व अडचणी सुटतील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी व वीज व हमी भाव दिला तर कुठल्याच अनुदानाची त्याला गरज पडणार नाही, शेतकरी स्वावलंबी होईल. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे त्यांना अनुदानाची रक्कम लवकर मिळते. मात्र जो शेतकरी मुळात गरीब आहे, ज्यांना अनुदानाची गरज आहे त्यांनाच ते मिळत नाही. यावर विचार होण्याची गरज असल्याची अपेक्षा शेतकरी संदीप पोतदार यांनी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदारांशी धुळे-तरवाडे या बसप्रवासात संवाद साधला.गरीब-श्रीमंतातील दरी वाढत असून गरीब जास्त गरीब तर श्रीमंत जास्त श्रीमंत होत असल्याचे दिपाली साळवे यांनी सांगितले. तर सवलती मिळाव्यात म्हणून आज अनेक नागरिक खोटे दाखले देऊन फायदे लाटतात़मात्र ज्यांना खरी गरज आहे व पात्रही आहेत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, अशी व्यथा बसच्या वाहक विजया लोकरे यांनी व्यक्त केली.आतापर्यंत केवळ आश्वासनांचा दिलासा दिला गेला. आता मात्र अपेक्षांची पूर्तता व्हावी, ही मागणी यावेळी प्रवासी मतदारांकडून करण्यात आली.स्थानिक मुद्याला महत्वनागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. स्वच्छतागृहे, गावात रस्ते नाही. हेच पूर्वापार चालत आलेले प्रश्न आहेत. आठ आठ दिवस पाणी मिळत नाही हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे.भूगर्भातून पाण्याचा उपसा होतो. मात्र जलपुनर्भरणाचा विचारच कोणी करत नाही. तरुणांना रोजगार नाही. बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत असल्याची कैफीयत भिकनराव भदाणेंनी मांडली.

टॅग्स :Jalgaonजळगाव