शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

लोकमत आॅन द व्हील्स : शेतकरी स्वावलंबी झाले तर प्रश्न सुटतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:59 IST

धुळे ते तरवाडे 28 किमी

वसंत कुलकर्णीधुळे : शेतकरी घाम गाळून शेतात अन्न धान्य पिकवतो. मात्र त्याला कवडीमोल भाव मिळतो. हमी भाव दिला तर सर्व अडचणी सुटतील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी व वीज व हमी भाव दिला तर कुठल्याच अनुदानाची त्याला गरज पडणार नाही, शेतकरी स्वावलंबी होईल. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे त्यांना अनुदानाची रक्कम लवकर मिळते. मात्र जो शेतकरी मुळात गरीब आहे, ज्यांना अनुदानाची गरज आहे त्यांनाच ते मिळत नाही. यावर विचार होण्याची गरज असल्याची अपेक्षा शेतकरी संदीप पोतदार यांनी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदारांशी धुळे-तरवाडे या बसप्रवासात संवाद साधला.गरीब-श्रीमंतातील दरी वाढत असून गरीब जास्त गरीब तर श्रीमंत जास्त श्रीमंत होत असल्याचे दिपाली साळवे यांनी सांगितले. तर सवलती मिळाव्यात म्हणून आज अनेक नागरिक खोटे दाखले देऊन फायदे लाटतात़मात्र ज्यांना खरी गरज आहे व पात्रही आहेत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, अशी व्यथा बसच्या वाहक विजया लोकरे यांनी व्यक्त केली.आतापर्यंत केवळ आश्वासनांचा दिलासा दिला गेला. आता मात्र अपेक्षांची पूर्तता व्हावी, ही मागणी यावेळी प्रवासी मतदारांकडून करण्यात आली.स्थानिक मुद्याला महत्वनागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. स्वच्छतागृहे, गावात रस्ते नाही. हेच पूर्वापार चालत आलेले प्रश्न आहेत. आठ आठ दिवस पाणी मिळत नाही हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे.भूगर्भातून पाण्याचा उपसा होतो. मात्र जलपुनर्भरणाचा विचारच कोणी करत नाही. तरुणांना रोजगार नाही. बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत असल्याची कैफीयत भिकनराव भदाणेंनी मांडली.

टॅग्स :Jalgaonजळगाव