शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आॅन द व्हील्स : रस्ते, पाणी, घरकुल सुविधांवर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:14 IST

बसस्थानक ते ममुराबाद 10 कि.मी.

जळगाव : ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरात सुध्दा आता पाणी टंचाईची समस्या उद्भवण्यास सुरूवात झाली आहे़ अनेकांना घरे सुध्द नाहीत, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते, मात्र तेही गुणवत्ता पुर्ण नाही़ त्यामुळे रस्ते, पाणी, घरकुल आणि शैक्षणिक सुविधांवर जादा भर देणे महत्वाचे आहे आणि या सुविधा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत जळगाव परिसरातील प्रवाशांनी व्यक्त केले.शहरातील नवीन बसस्थानक ते ममुराबाद या दहा कि़मी़ अंतराच्या रिक्षा प्रवासातून प्रवाश्यांचे मत जाणून घेण्यात आले़ यावेळी शाहुनगरातील इम्रान शेख यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत कुठलाही पक्ष निवडून येवो, मात्र त्यांनी शहराचा खरोखर विकास केला पाहिजे़ आजही शहरामधील तरूणांना नोकरीसाठी बाहेरी गावी जावे लागते़ तर ममुराबाद येथील दिलीप पाटील यांनी सांगितले की, पक्ष पाहूनच मतदान करणार आहे. मात्र, निवडून आलेल्या उमेदवाराने नागरिकांसाठी पाण्याची सुविधा, घरकुलाची सुविधा तसेच सार्वजनिक शौचालय, शैक्षणिक सुविधांवर अधिक भर देऊन ती कामे केली पाहिजे़ पाणी टंचाईची समस्या नेहमीच गावात उद्भवते, यासाठी खरोखर प्रयत्न व्हायला हवे़ अन्यथा आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या पक्षाला मतदान न करण्याचेही त्यांनी सांगितले़ योगेश बारी याने रोजगाराची समस्या मांडली. एमआयडीसी आहे मात्र मोठे उद्योग नाहीत, त्यामुळे हातमजुरी करावी लागते, असे सांगितले.आश्वासने नको़़़शहरातील बहुतांश भागात तसेच ममुराबाद भागात पाणी टंचाईची समस्या आहे़ सध्या रस्त्यांचीही दैनावस्था झाली असून पायी चालणे देखील मुश्किल झालेले आहे़ एकप्रकारे शहराचे विद्रुपीकरण केले आहे़ त्यामुळे शहरातील रस्तेआधी होणे गरजेचे आहे़ निवडणुकीपुरतेच आश्वासन देणे बंद करावे, निवडून दिल्यावर सुविधा जनतेपर्यंत पोहचवाव्या असेही मत प्रवाश्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव