शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : भाजप जिल्हाध्यक्षांच्या अमळनेर तालुक्यातच संघटन झालय खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:53 IST

नगरपालिकेत भाजपकडून निवडून आलेला मूळ सदस्य एकच

जळगाव : भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे मूळ गाव असलेल्या अमळनेर तालुक्यात पक्ष संघटना तर खिळखिळी झालीच असून विधानसभेसह अन्य निवडणुकांमध्ये या पक्षाला अपयशच पदरी पडल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यात या पक्षापासून मतदार दूर जात असल्याचेच लक्षात येते. या तालुक्यात ‘कार्यकर्ते, पदाधिकारी फुललेले मात्र कमळ कोमेजलेले’ अशी परिस्थिती असल्याचे जिल्हा स्तरावर बोलले जात असते.भाजपाने जिल्हाध्यक्ष म्हणून उदय वाघ यांना २०१३ मध्ये संधी दिली. पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे विरोधी पक्षनेते असताना उदय वाघ हे त्यांचे कट्टर समर्थक होते. खडसे यांनी वाघ यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली. तिच पुनरावृत्ती नंतरच्या टर्मला म्हणजे २०१६ मध्ये झाली.उदय वाघ यांना पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली. एवढेच नव्हे तर २०१४ मधील निवडणुकीत यश मिळाल्यानंतर उदय वाघ यांना अमळनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदही खडसे यांनी आमदार शिरीष चौधरी यांची समजूत घालून देऊ केले. त्यांच्या राजकीय वाटचालीचा हा वाढता आलेखच. मात्र त्या दृष्टीने तालुक्यात पक्षाचा विस्तार होऊ शकला नाही.अनेक पातळ्यांवर अपयशअमळनेर तालुक्यात जि.प.च्या पाच गटांपैकी भाजपचे २ सदस्य आहेत. नगरपालिकेत सध्या पक्षाची सत्ता आहे. मात्र जेव्हा निवडणूक झाली तेव्हा पक्षाचा केवळ एकच सदस्य निवडून आला होता. नगराध्यक्षांसह नगरसेवकांना प्रवेश देऊन भाजपची सत्ता आली आहे. विधानसभेत २००९ त्यानंतर २०१४ असे सलग दोन टर्म म्हणजे दहा वर्षात पक्षाला अपयश आले. पक्षापासून मतदार दूर जात असल्याचे चित्र आहे.गटबाजी जणू पाचवीला पूजलेलीतालुक्यातील भाजपच्या वाटचालीचा आढावा घेता गेल्या काही वर्षात ‘यश कणभर पण गटबाजी मनभर’ अशीच परिस्थिती येते. माजी नगराध्यक्ष, कापूस फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष चौधरी हे यामुळे दूर गेले. माजी आमदार डॉ. बी.एस. चौधरी, अनिल भाईदास पाटील, उदय वाघ, राष्टÑवादीतून भाजपात आलेले माजी आमदार साहेबराव पाटील व पक्षाचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी आदी नेत्यांचे एक ना अनेक गट येथे आहेत.नेते बदलले की प्यादेही बदलतातपक्षात पूर्वी केवळ माजी मंत्री एकनाथराव खडसे हे सांगतील ती पूर्व दिशा होती. त्यानंतर आता गिरीश महाजन हे सांगतील ती पूर्व असते. त्या बरोबरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही एक गट कार्यरत आहेच. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडूनच जणू डोंबाऱ्याचा खेळ सुरू असून नेते बदलले की प्यादेही बदलत गेल्याचे लक्षात येते. विद्यार्थी परिषदेतून उदयास येऊन मोठे झालेले राजेश पांडे, उदय वाघ व आता आमदार स्मिता वाघ यांचा हा तालुका म्हणून परिचित पण संघटन पातळीवर काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांनाही पडतो.अनेकांचे मोठे योगदान... संत सखाराम महाराज, सानेगुरूजी यांच्या कर्मभूमीत जनसंघ ते भाजप या वाटचालीत संघटन वाढविण्यात काही जणांचे पूर्वी मोठे योगदान होते. प्र.स.पंडीत, माजी नगराध्यक्ष स्व.देसराज अग्रवाल, शुभदा करमरकर, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, शाम लुल्ला, हिरामण खानझोडकर, कमलाबाई पाटील, बजरंग अग्रवाल यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हा पक्ष वाढविला, फुलविला. पण आजची स्थिती पाहता राज्यात सत्ता असली तरी विविध पातळ्यांवर येणारे अपयश लक्षात घेता जिल्हाध्यक्षांच्या तालुक्यात भाजप संघटन हे खिळखिळे होत असल्याचेच लक्षात येत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव