शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जिल्हा बँकेच्या शाखेला संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 02:02 IST

पीक विम्याच्या पैशांबाबत वारंवार विचारणा करूनही नकार ऐकायला मिळत असल्याने येथील संतप्त शेतकºयांनी जिल्हा बँक शाखेला कुलूप ठोकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.

ठळक मुद्देसहा महिने उलटूनही पिक विम्याचे पैसे नाहीतपिक विम्याच्या पैशांबाबत विचारणा करूनही नकारघंटा

मोठे वाघोदा, ता. रावेर : पीक विम्याच्या पैशांबाबत वारंवार विचारणा करूनही नकार ऐकायला मिळत असल्याने येथील संतप्त शेतकºयांनी जिल्हा बँक शाखेला कुलूप ठोकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.तालुक्यातील मोठे वाघोदा येथील शेतकºयांनी मंगळवारीही दुपारी बँकेत जाऊन पीक विम्याचे पैसे आलेत का अशी विचारणा केली, पण नेहमीप्रमाणे नाही उत्तर मिळाल्यामुळे संतप्त सर्व शेतकºयांनी जमा होऊन बँकेचे कामकाज बंद करून बँकेला कुलूप ठोकून आपला रोष व्यक्त केला. मागील काही दिवसांपूर्वी पीक विम्याची मंजूर झालेली यादी बँकमध्ये आली होती पण त्या याद्यांमध्ये क्षेत्रफळ, नाव, गावाची नावे यात भरपूर चुका आढळून आल्या होत्या. त्यामुळे या याद्या तपासणीसाठी व चुका दुरुस्त करण्यासाठी परत पाठवण्यात आल्या. ३ महिन्यांनंतर त्या परत आल्या, पण सहा ते सात महिने उलटूनही शेतकºयांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही. दररोज शेतकरी बँकेमध्ये जाऊन विचारपूस करत आहे. मंगळवारी देखील शेतकºयांनी शाखा व्यवस्थापक व तेथील कर्मचाºयांना विचारणा केली पण अजूनही पैसे न आल्याचे उत्तर मिळाले. त्यावेळी किशोर पाटील यांनी यासंदर्भात वरिष्ठांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी उद्या मुंबईला यासंदर्भात बैठक आहे, त्यावेळी हा विषय घेऊन तुमचे पैसे दोन ते तीन दिवसात देतो असे आश्वासन दिले. पण असे आश्वासने देणे हे कधीपासूनच सुरू आहे, असे संबंधीतांना किशोर पाटील यांनी सांगून वाघोदा येथील बँकेच्या शाखेला कुलूप लावून आपला रोष व्यक्त केला.यावेळी त्यांच्यासोबत नितीन सुपे, प्रतीक पाटील, कुलदीप पाटील, अजय महाजन, स्वप्निल प्रकाश महाजन, राजू महाजन, गोविंदा चौधरी, सुनिल चौधरी यांच्यासह बरेच शेतकरी उपस्थित होते.दरम्यान, याबाबत शेतकरी किशोर पाटील यांनी सांगितले की, जिल्हा बँकेच्या शाखेत पैसे आलेले आहेत पण बँकेतून शेतकºयांना पैसे देण्यास टाळाटाळ होत आहे.शेतकºयांचा सर्व पैसा मोठ्या बँकेला टाकून त्याचा वापर व व्याज खाण्याचा प्रकार अधिकारी वर्ग करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

टॅग्स :bankबँक