शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

लॉकडाउन सोबतच चिंताही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:59 IST

आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याचा सूर : शहरवासीयांनो घरातच रहा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाउनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याने उद्योग, व्यापारासमोर चिंताही वाढली आहे. असे असले तरी सध्या सर्वांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याने सर्वांनी घरातच राहणे योग्य असल्याचा सूरही उमटत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारने आणखी २१ दिवस देशभर लॉकडाउन जाहीर केले. यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व उद्योग, व्यापार बंद असल्याने सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. याचा जळगावातील प्रसिद्ध सुवर्ण व्यवसाय,  चटई उद्योग यांना फटका बसण्यासह इतरही सर्वच व्यवसाय व उद्योगांना मोठा फटका बसला आहे. शिवाय जीवनावश्यक वस्तू म्हणून जे उद्योग सुरू आहे त्यांच्यापुढेही मजूर, वाहतुकदारांचा प्रश्न असल्याने त्यांच्याही उत्पादनावर परिणाम झाला आहे. या सर्वांमुळे आधीच संकाटत असलेल्या जळगावच्या उद्योगांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. तसेच दिवाळीच्या काळात अधिक पावसामुळे सुवर्ण व्यवसाय, कापड व इतर व्यवसायांना मोठा फटका बसल्याने  ऐन लग्नसराईच्या काळात पुन्हा कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरातील व्यापारपेठ संकटातून बाहेर पडते की नाही, असे चिन्हे निर्माण झाले असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. त्यात आता १४ एप्रिल रोजी लॉकडाउनचा कालावधी संपून व्यवहार सुरू होतील, त्यामुळे त्या तयारीत असतानाच आता पुन्हा लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने उद्योजक, व्यापाºयांची चिंंता वाढली आहे.  कोरोनाने पान टपरी, चहा विक्रेत्यांपासून मोठे उद्योग, व्यापारास वेढीस धरल्याचे चित्र असून सर्वच जण चिंतीत झाले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाउनचे पालन करून कोरोनाला नियंत्रणात आणू व सर्व व्यवहार लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी सर्वांचा हातभार महत्त्वाचे असल्याचा सूर उमटत आहे.

सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आज सर्वच उद्योग, व्यापारासमोर चिंतेचे ढग असले तरी सध्या नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता मोठा आर्थिक फटका सर्वांना सहन करावा लागत असला तरी सर्वांनी एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात येत आहे.