शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

लॉकडाउन सोबतच चिंताही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:59 IST

आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याचा सूर : शहरवासीयांनो घरातच रहा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाउनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याने उद्योग, व्यापारासमोर चिंताही वाढली आहे. असे असले तरी सध्या सर्वांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याने सर्वांनी घरातच राहणे योग्य असल्याचा सूरही उमटत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारने आणखी २१ दिवस देशभर लॉकडाउन जाहीर केले. यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व उद्योग, व्यापार बंद असल्याने सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. याचा जळगावातील प्रसिद्ध सुवर्ण व्यवसाय,  चटई उद्योग यांना फटका बसण्यासह इतरही सर्वच व्यवसाय व उद्योगांना मोठा फटका बसला आहे. शिवाय जीवनावश्यक वस्तू म्हणून जे उद्योग सुरू आहे त्यांच्यापुढेही मजूर, वाहतुकदारांचा प्रश्न असल्याने त्यांच्याही उत्पादनावर परिणाम झाला आहे. या सर्वांमुळे आधीच संकाटत असलेल्या जळगावच्या उद्योगांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. तसेच दिवाळीच्या काळात अधिक पावसामुळे सुवर्ण व्यवसाय, कापड व इतर व्यवसायांना मोठा फटका बसल्याने  ऐन लग्नसराईच्या काळात पुन्हा कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरातील व्यापारपेठ संकटातून बाहेर पडते की नाही, असे चिन्हे निर्माण झाले असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. त्यात आता १४ एप्रिल रोजी लॉकडाउनचा कालावधी संपून व्यवहार सुरू होतील, त्यामुळे त्या तयारीत असतानाच आता पुन्हा लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने उद्योजक, व्यापाºयांची चिंंता वाढली आहे.  कोरोनाने पान टपरी, चहा विक्रेत्यांपासून मोठे उद्योग, व्यापारास वेढीस धरल्याचे चित्र असून सर्वच जण चिंतीत झाले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाउनचे पालन करून कोरोनाला नियंत्रणात आणू व सर्व व्यवहार लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी सर्वांचा हातभार महत्त्वाचे असल्याचा सूर उमटत आहे.

सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आज सर्वच उद्योग, व्यापारासमोर चिंतेचे ढग असले तरी सध्या नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता मोठा आर्थिक फटका सर्वांना सहन करावा लागत असला तरी सर्वांनी एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात येत आहे.