शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

लॉकडाउन सोबतच चिंताही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:59 IST

आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याचा सूर : शहरवासीयांनो घरातच रहा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाउनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याने उद्योग, व्यापारासमोर चिंताही वाढली आहे. असे असले तरी सध्या सर्वांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याने सर्वांनी घरातच राहणे योग्य असल्याचा सूरही उमटत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारने आणखी २१ दिवस देशभर लॉकडाउन जाहीर केले. यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व उद्योग, व्यापार बंद असल्याने सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. याचा जळगावातील प्रसिद्ध सुवर्ण व्यवसाय,  चटई उद्योग यांना फटका बसण्यासह इतरही सर्वच व्यवसाय व उद्योगांना मोठा फटका बसला आहे. शिवाय जीवनावश्यक वस्तू म्हणून जे उद्योग सुरू आहे त्यांच्यापुढेही मजूर, वाहतुकदारांचा प्रश्न असल्याने त्यांच्याही उत्पादनावर परिणाम झाला आहे. या सर्वांमुळे आधीच संकाटत असलेल्या जळगावच्या उद्योगांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. तसेच दिवाळीच्या काळात अधिक पावसामुळे सुवर्ण व्यवसाय, कापड व इतर व्यवसायांना मोठा फटका बसल्याने  ऐन लग्नसराईच्या काळात पुन्हा कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरातील व्यापारपेठ संकटातून बाहेर पडते की नाही, असे चिन्हे निर्माण झाले असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. त्यात आता १४ एप्रिल रोजी लॉकडाउनचा कालावधी संपून व्यवहार सुरू होतील, त्यामुळे त्या तयारीत असतानाच आता पुन्हा लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने उद्योजक, व्यापाºयांची चिंंता वाढली आहे.  कोरोनाने पान टपरी, चहा विक्रेत्यांपासून मोठे उद्योग, व्यापारास वेढीस धरल्याचे चित्र असून सर्वच जण चिंतीत झाले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाउनचे पालन करून कोरोनाला नियंत्रणात आणू व सर्व व्यवहार लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी सर्वांचा हातभार महत्त्वाचे असल्याचा सूर उमटत आहे.

सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आज सर्वच उद्योग, व्यापारासमोर चिंतेचे ढग असले तरी सध्या नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता मोठा आर्थिक फटका सर्वांना सहन करावा लागत असला तरी सर्वांनी एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात येत आहे.