शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

खान्देशात पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:13 IST

शेतकºयांना दिलासा : जळगाव तालुक्यात एक तर धुळे जिल्ह्यात नेरसह तीन ठिकाणी अतिवृष्टी, चाळीसगावला सर्वाधिक पाऊस

ठळक मुद्देनंदुरबार कोरडेचशिरपूर तालुक्यात अतिवृष्टीफवारणीचा खर्च वाचला

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव/धुळे/नंदुरबार : खान्देशात जळगाव व धुळे जिल्ह्याच्या काही भागात रविवारी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. म्हसावद (ता. जळगाव) येथे ७० तर नेर (ता. धुळे) येथे १०९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या उशिरा आलेल्या पावसामुळे कपाशी, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन आदी पिकांच्या उत्पन्नात घट होणार आहेच़कडधान्य पिकांना मात्र याचा मोठा फटका बसत आहे़ एकतर गरज होती तेव्हा पाऊस न आल्याने उडीद, मूग ही पिके करपली व त्यातही जी आली त्यांना आता झिमझिम पावसामुळे बुरशी लागून वाया जाण्याची वेळ आली आहे़ जळगाव जिल्ह्यात रविवार २० रोजी सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. या एकाच दिवसात जिल्ह्यात एकूण ५४३ मिली मीटर पाऊस झाला.गेल्या वर्षी ६३ तर यंदा ४८.५ टक्के पाऊसजळगाव जिल्ह्याची पावसाची सरासरी ६६३.३ मि.मी.इतकी आहे. मागच्या वर्षी १ जून ते २१ आॅगस्ट २०१६ दरम्यान जिल्ह्यात या सरासरीच्या ६३ टक्के पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा २१ आॅगस्ट २०१७ पर्यंत ४८.५ टक्के पाऊस झाला आहे.बोदवड तालुक्यात सर्वात कमी पाऊसरविवार, २० रोजी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यात चाळीसगाव तालुक्या पाठोपाठ एरंडोल तालुक्यात ४९ मि.मी., जळगाव तालुक्यात ४७.८ मि.मी., रावेर तालुक्यात ४४.९ , भडगाव तालुक्यात ३९.५, अमळनेर तालुक्यात ३६.८, धरणगाव तालुक्यात ३६.९, यावल तालुक्यात ३४.८,भुसावळ तालुक्यात ३०.८, चोपडा तालुक्यात ३०.३ ,जामनेर तालुक्यात २९.९, मुक्ताईनगर तालुक्यात २२.८, बोदवड तालुक्यात १८.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.टक्केवारीत पारोळा, एरंडोल आघाडीवरजिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाच्या टक्केवारीत पारोळा तालुका ६८.५ टक्क्यांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ एरंडोल तालुक्यात आतापर्यांत ६७.४ टक्के तर जळगाव तालुक्यात ५८.३ पाऊस झाला आहे. जामनेर ४१ टक्के, धरणगाव ६०.६ टक्के, भुसावळ ४२.९ टक्के, यावल ४५.२ टक्के, रावेर ५४ टक्के, मुक्ताईनगर ३४.९ टक्के, बोदवड ४०.२ टक्के, पाचोरा ४१.८ टक्के, चाळीसगाव ४८.७ टक्के, भडगाव ४०.२ टक्के, अमळनेर ३४.६ टक्के, चोपडा तालुक्यात ४९.५ टक्के इतका पाऊस झाला आहे.गिरणा व हतनूरच्या साठ्यात वाढजिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ४८.५ टक्के पाऊस झालेला असताना जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ५२.६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरणात आजअखेरीस ४३.३७ टक्के पाणीसाठा झाला असून गिरणा धरणात ५२.४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर आजच्या स्थितीला वाघूर धरणात ६२.६६ टक्के पाणीसाठा झाला आहे.६ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठापावसाने रविवारी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली असली तरीही अद्यापही १३ मध्यम प्रकल्पांपैकी ६ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यात अग्नावती, हिवरा, बहुळा, भोकरबारी, बोरी व मन्याड धरणाचा समावेश आहे. तर अंजनी धरणातही केवळ २.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. सर्व १३ मध्यम प्रकल्पांपैकी ७ प्रकल्पांमध्ये एकूण २१.४० टक्के पाणीसाठा आहे. तर ९५ लघुप्रकल्पांमध्ये १०.४८ टक्के पाणीसाठा आहे.