शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

खान्देशात पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:13 IST

शेतकºयांना दिलासा : जळगाव तालुक्यात एक तर धुळे जिल्ह्यात नेरसह तीन ठिकाणी अतिवृष्टी, चाळीसगावला सर्वाधिक पाऊस

ठळक मुद्देनंदुरबार कोरडेचशिरपूर तालुक्यात अतिवृष्टीफवारणीचा खर्च वाचला

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव/धुळे/नंदुरबार : खान्देशात जळगाव व धुळे जिल्ह्याच्या काही भागात रविवारी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. म्हसावद (ता. जळगाव) येथे ७० तर नेर (ता. धुळे) येथे १०९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या उशिरा आलेल्या पावसामुळे कपाशी, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन आदी पिकांच्या उत्पन्नात घट होणार आहेच़कडधान्य पिकांना मात्र याचा मोठा फटका बसत आहे़ एकतर गरज होती तेव्हा पाऊस न आल्याने उडीद, मूग ही पिके करपली व त्यातही जी आली त्यांना आता झिमझिम पावसामुळे बुरशी लागून वाया जाण्याची वेळ आली आहे़ जळगाव जिल्ह्यात रविवार २० रोजी सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. या एकाच दिवसात जिल्ह्यात एकूण ५४३ मिली मीटर पाऊस झाला.गेल्या वर्षी ६३ तर यंदा ४८.५ टक्के पाऊसजळगाव जिल्ह्याची पावसाची सरासरी ६६३.३ मि.मी.इतकी आहे. मागच्या वर्षी १ जून ते २१ आॅगस्ट २०१६ दरम्यान जिल्ह्यात या सरासरीच्या ६३ टक्के पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा २१ आॅगस्ट २०१७ पर्यंत ४८.५ टक्के पाऊस झाला आहे.बोदवड तालुक्यात सर्वात कमी पाऊसरविवार, २० रोजी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यात चाळीसगाव तालुक्या पाठोपाठ एरंडोल तालुक्यात ४९ मि.मी., जळगाव तालुक्यात ४७.८ मि.मी., रावेर तालुक्यात ४४.९ , भडगाव तालुक्यात ३९.५, अमळनेर तालुक्यात ३६.८, धरणगाव तालुक्यात ३६.९, यावल तालुक्यात ३४.८,भुसावळ तालुक्यात ३०.८, चोपडा तालुक्यात ३०.३ ,जामनेर तालुक्यात २९.९, मुक्ताईनगर तालुक्यात २२.८, बोदवड तालुक्यात १८.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.टक्केवारीत पारोळा, एरंडोल आघाडीवरजिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाच्या टक्केवारीत पारोळा तालुका ६८.५ टक्क्यांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ एरंडोल तालुक्यात आतापर्यांत ६७.४ टक्के तर जळगाव तालुक्यात ५८.३ पाऊस झाला आहे. जामनेर ४१ टक्के, धरणगाव ६०.६ टक्के, भुसावळ ४२.९ टक्के, यावल ४५.२ टक्के, रावेर ५४ टक्के, मुक्ताईनगर ३४.९ टक्के, बोदवड ४०.२ टक्के, पाचोरा ४१.८ टक्के, चाळीसगाव ४८.७ टक्के, भडगाव ४०.२ टक्के, अमळनेर ३४.६ टक्के, चोपडा तालुक्यात ४९.५ टक्के इतका पाऊस झाला आहे.गिरणा व हतनूरच्या साठ्यात वाढजिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ४८.५ टक्के पाऊस झालेला असताना जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ५२.६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरणात आजअखेरीस ४३.३७ टक्के पाणीसाठा झाला असून गिरणा धरणात ५२.४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर आजच्या स्थितीला वाघूर धरणात ६२.६६ टक्के पाणीसाठा झाला आहे.६ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठापावसाने रविवारी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली असली तरीही अद्यापही १३ मध्यम प्रकल्पांपैकी ६ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यात अग्नावती, हिवरा, बहुळा, भोकरबारी, बोरी व मन्याड धरणाचा समावेश आहे. तर अंजनी धरणातही केवळ २.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. सर्व १३ मध्यम प्रकल्पांपैकी ७ प्रकल्पांमध्ये एकूण २१.४० टक्के पाणीसाठा आहे. तर ९५ लघुप्रकल्पांमध्ये १०.४८ टक्के पाणीसाठा आहे.