शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:11 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील कौस्तुभ परांजपे...

वाद हा प्रत्येकाच्या आयुष्यात आलाच असेल. यात प्रामुख्याने दोन प्रकारच्या व्यक्ती असतात असे वाटते. एकाचा वाद टाळण्याकडे व सामोपचाराने घेण्याचा कल असतो, तर एकाचा वाद घालण्याकडे.जेव्हा वाद टाळणाऱ्या व्यक्ती समोरासमोर येतात तेव्हा वाद वाढत नाहीत. जेव्हा एकाचा कल टाळण्याकडे व दुसºयाचा घालण्याकडे असतो तेव्हा वाद टाळणारा समजुतीने घेऊन लवकर थांबवितो. पण वाद घालणाºयाला मात्र त्याचा जय झाल्यासारखे वाटते. पण जेव्हा वाद घालण्याच्या विचाराच्याच व्यक्ती समोरासमोर येतात तेव्हा मात्र वाद विकोपाला जातो व त्यात संबंध कायमस्वरूपी बिघडण्याचा धोका असतो.परवा अशाच प्रकारचा वाद दोन व्यक्तींमध्ये चुकीच्या पध्दतीने दुचाकी लावण्यावरुन झाला. त्यावर ज्याचा वाद टाळायचा कल होता तो शांतपणे समोरच्या व्यक्तीला म्हणाला, मला फक्त येवढेच सांगा की तुम्ही सुशिक्षित आहात का? आणि आहे असे वाटत असेल तर तुम्ही योग्य पध्दतीने दुचाकी लावली आहे का? याचा विचार केला तर वाद होणारच नाही.फक्त तुम्ही सुशिक्षित आहात का? हे एकच वाक्य माझ्या मनाला खूप आवडले. खरंच आपण सुशिक्षित आहोत का? आणि असल्यास काय करायला पाहिजे? याचा विचार केला तर कितीतरी वादाच्या गोष्टी सहज टळतील व सामंजस्य वाढेल हे पटल. हे एकच वाक्य मला खूप काही शिकवून किंवा सांगून गेले. अर्थात आपणही माणूस आणि त्यातही सर्वसामान्य आहोत, प्रत्येक वेळी तेवढा संयम आपल्याला असेलच असेही नाही. आणि काही वेळा माझं चुकलंच नाही तर का ऐकून घ्यावं ही (बाणेदार) वृत्ती आड येते. आपण जसं लिहीतो तसंच वागत नाही हे खरंय. पण तसं वागण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे.वाद असावे असेही वाटते पण त्यातून चांगलेच घेण्याचा प्रयत्न असावा. ते विकोपाला जाता कामा नये. मागच्या वादाचा विषय पुढल्या विषयात आणू नये. परत नव्याने संवादाला सुरुवात करावी.बिघडवण्यापेक्षा घडवणे कठीण असते हे ध्यानात असू द्यावे. घडवणाºयाच नावं लोक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर बिघडवणाºयाचं नाव विसरण्याचा प्रयत्न असतो. आपण लक्षात रहायचं का आपल्याला इतरांनी विसरायचा प्रयत्न करायचा हे आपण ठरवायचे आहे. पण फक्त शिक्षण घेतले म्हणून आपण सुशिक्षित आहोत असा अर्थ सुशिक्षित असण्याचा नाही.-कौस्तुभ परांजपे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव