शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:11 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील कौस्तुभ परांजपे...

वाद हा प्रत्येकाच्या आयुष्यात आलाच असेल. यात प्रामुख्याने दोन प्रकारच्या व्यक्ती असतात असे वाटते. एकाचा वाद टाळण्याकडे व सामोपचाराने घेण्याचा कल असतो, तर एकाचा वाद घालण्याकडे.जेव्हा वाद टाळणाऱ्या व्यक्ती समोरासमोर येतात तेव्हा वाद वाढत नाहीत. जेव्हा एकाचा कल टाळण्याकडे व दुसºयाचा घालण्याकडे असतो तेव्हा वाद टाळणारा समजुतीने घेऊन लवकर थांबवितो. पण वाद घालणाºयाला मात्र त्याचा जय झाल्यासारखे वाटते. पण जेव्हा वाद घालण्याच्या विचाराच्याच व्यक्ती समोरासमोर येतात तेव्हा मात्र वाद विकोपाला जातो व त्यात संबंध कायमस्वरूपी बिघडण्याचा धोका असतो.परवा अशाच प्रकारचा वाद दोन व्यक्तींमध्ये चुकीच्या पध्दतीने दुचाकी लावण्यावरुन झाला. त्यावर ज्याचा वाद टाळायचा कल होता तो शांतपणे समोरच्या व्यक्तीला म्हणाला, मला फक्त येवढेच सांगा की तुम्ही सुशिक्षित आहात का? आणि आहे असे वाटत असेल तर तुम्ही योग्य पध्दतीने दुचाकी लावली आहे का? याचा विचार केला तर वाद होणारच नाही.फक्त तुम्ही सुशिक्षित आहात का? हे एकच वाक्य माझ्या मनाला खूप आवडले. खरंच आपण सुशिक्षित आहोत का? आणि असल्यास काय करायला पाहिजे? याचा विचार केला तर कितीतरी वादाच्या गोष्टी सहज टळतील व सामंजस्य वाढेल हे पटल. हे एकच वाक्य मला खूप काही शिकवून किंवा सांगून गेले. अर्थात आपणही माणूस आणि त्यातही सर्वसामान्य आहोत, प्रत्येक वेळी तेवढा संयम आपल्याला असेलच असेही नाही. आणि काही वेळा माझं चुकलंच नाही तर का ऐकून घ्यावं ही (बाणेदार) वृत्ती आड येते. आपण जसं लिहीतो तसंच वागत नाही हे खरंय. पण तसं वागण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे.वाद असावे असेही वाटते पण त्यातून चांगलेच घेण्याचा प्रयत्न असावा. ते विकोपाला जाता कामा नये. मागच्या वादाचा विषय पुढल्या विषयात आणू नये. परत नव्याने संवादाला सुरुवात करावी.बिघडवण्यापेक्षा घडवणे कठीण असते हे ध्यानात असू द्यावे. घडवणाºयाच नावं लोक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर बिघडवणाºयाचं नाव विसरण्याचा प्रयत्न असतो. आपण लक्षात रहायचं का आपल्याला इतरांनी विसरायचा प्रयत्न करायचा हे आपण ठरवायचे आहे. पण फक्त शिक्षण घेतले म्हणून आपण सुशिक्षित आहोत असा अर्थ सुशिक्षित असण्याचा नाही.-कौस्तुभ परांजपे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव