शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

बालपणी गोदातार्इंमुळे साहित्याची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:22 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात साहित्यिक सुषमा जयंत पाटील यांनी, आपल्याला बालपणी शाळेतील शिक्षिका गोदाताई पाटील यांच्यामुळे लिखाणाची, वाचनाची गोडी कशी लागली यासंबंधी सांगितलेल्या आठवणी.

खरं तर प्रेरणा हा अंतस्त स्त्रोतच असतो. आपल्याही नकळत आपल्या आत खोलवर भिनलेला आणि पाझरत राहतो. कधी जगण्यातून, कधी वागण्यातून, कलेतून, सुरातून, गीतातून, लेखणीतून, तर कधी व्यक्तिमत्वाचा आणि जीवनशैलीचा एक लक्षणीय पैलू बनून. याच प्रेरणेला जेव्हा आपण प्रारूप देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मन:चक्षूवर उभा रहातो एक विविध अंगी कोलाज. घटना, व्यक्ती आणि संस्काराच्या विविध रंगछटा असलेला; जे आपल्या आत्मशोधाच्या वाटेवर आपली पाळंमुळं संबंधिताशी जोडलेली असल्याची वारंवार ग्वाही देतात.अशीच एक व्यक्ती वर्गशिक्षिकेच्या रूपाने माझ्या बालमनावर काव्याचा चिरंतन ठसा उमटवून गेली. बुलढाणा जिल्ह्यातील सावरगाव नावाचं एक आदर्श गाव. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत माझ्या वर्गशिक्षिका असलेल्या गोदाताई पाटील. जिल्ह्यातल्या नामवंत कवयित्री. एक पाय पोलिओग्रस्त, अधू, पती जन्मताच मूकं, पदरात चार मुलं, जीवणाचा संघर्ष आणि खदखदणारी संवेदना बाईंनी कवितेत स्वाहा केलेली. एक नाटक व तीनचार काव्यसंग्रह प्रसिद्ध, ३५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील स्त्रिसाठी हे एक मोठं दिव्यकर्मच, वाणीवर साक्षात सरस्वती आणि काळजात धगधगती उर्मी घेऊन बाई लिहित्या व्हायच्या शाळेतल्या मोकळ्या तासाला. त्यांच्या सृजनाचा पहिला श्रोता आणि साक्षीदार मी असायची. माझं वय आणि समज पाहता बाई माझ्याशी एक दहा ते अकरा वर्षाच्या मुलीशी कुठल्या जाणिवेतून संवाद साधायच्या माहीत नाही. कदाचित माझ्या घरची राजकीय, वैचारिक पार्श्वभूमी, वडील व्यासंगी राजकारणी, उत्तम वक्ते, घरात पुस्तकं आणली जायची, वाचली जायची या अनुषंगाने वर्गात प्रथम क्रमांक मिळविणारी मुलगी सूज्ञ आहे, असा बाईंचा विश्वास असावा.गोदाताईंची प्रेरणा आणि घरातील वातावरणामुळे बालवयातच वाचनाची गोडी लागली. साने गुरुजी, बाबा भांड, ना.स.इनामदार, समग्र पु.ल. व अनेक आत्मचरित्र, चरित्र वाचून झाली. कवितेचं बिजारोपण तर झालेलं होतंच. लग्नानंतर चाळीसगावी ‘स्वांतसुखाय’ हा लेखन प्रांत मानून लिहीत राहिले. रोटरी क्लबशी जोडलेले असल्या कारणाने रोटरी बुलेटीनमध्ये कविता लिहित गेले.‘लोकमत’ दिवाळी अंकासहीत इतरही मासिकांमध्ये कविता प्रकाशित झाल्या. चाळीसगाव म.सा.प.चे संस्थापक अध्यक्ष तानसेन जगताप यांच्या प्रेरणेने लवकरच काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा मानस आहे. आपल्यातील अंतस्थप्रेरणा जागृत ठेवून स्वत:ला व्यक्त होण्याच्या भावनेतून सतत प्रवाही असणं हा भाग साहित्यिक मूल्य जपण्याच्या हेतूने महत्वाचा मानते.

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगाव