शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बालपणी गोदातार्इंमुळे साहित्याची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:22 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात साहित्यिक सुषमा जयंत पाटील यांनी, आपल्याला बालपणी शाळेतील शिक्षिका गोदाताई पाटील यांच्यामुळे लिखाणाची, वाचनाची गोडी कशी लागली यासंबंधी सांगितलेल्या आठवणी.

खरं तर प्रेरणा हा अंतस्त स्त्रोतच असतो. आपल्याही नकळत आपल्या आत खोलवर भिनलेला आणि पाझरत राहतो. कधी जगण्यातून, कधी वागण्यातून, कलेतून, सुरातून, गीतातून, लेखणीतून, तर कधी व्यक्तिमत्वाचा आणि जीवनशैलीचा एक लक्षणीय पैलू बनून. याच प्रेरणेला जेव्हा आपण प्रारूप देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मन:चक्षूवर उभा रहातो एक विविध अंगी कोलाज. घटना, व्यक्ती आणि संस्काराच्या विविध रंगछटा असलेला; जे आपल्या आत्मशोधाच्या वाटेवर आपली पाळंमुळं संबंधिताशी जोडलेली असल्याची वारंवार ग्वाही देतात.अशीच एक व्यक्ती वर्गशिक्षिकेच्या रूपाने माझ्या बालमनावर काव्याचा चिरंतन ठसा उमटवून गेली. बुलढाणा जिल्ह्यातील सावरगाव नावाचं एक आदर्श गाव. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत माझ्या वर्गशिक्षिका असलेल्या गोदाताई पाटील. जिल्ह्यातल्या नामवंत कवयित्री. एक पाय पोलिओग्रस्त, अधू, पती जन्मताच मूकं, पदरात चार मुलं, जीवणाचा संघर्ष आणि खदखदणारी संवेदना बाईंनी कवितेत स्वाहा केलेली. एक नाटक व तीनचार काव्यसंग्रह प्रसिद्ध, ३५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील स्त्रिसाठी हे एक मोठं दिव्यकर्मच, वाणीवर साक्षात सरस्वती आणि काळजात धगधगती उर्मी घेऊन बाई लिहित्या व्हायच्या शाळेतल्या मोकळ्या तासाला. त्यांच्या सृजनाचा पहिला श्रोता आणि साक्षीदार मी असायची. माझं वय आणि समज पाहता बाई माझ्याशी एक दहा ते अकरा वर्षाच्या मुलीशी कुठल्या जाणिवेतून संवाद साधायच्या माहीत नाही. कदाचित माझ्या घरची राजकीय, वैचारिक पार्श्वभूमी, वडील व्यासंगी राजकारणी, उत्तम वक्ते, घरात पुस्तकं आणली जायची, वाचली जायची या अनुषंगाने वर्गात प्रथम क्रमांक मिळविणारी मुलगी सूज्ञ आहे, असा बाईंचा विश्वास असावा.गोदाताईंची प्रेरणा आणि घरातील वातावरणामुळे बालवयातच वाचनाची गोडी लागली. साने गुरुजी, बाबा भांड, ना.स.इनामदार, समग्र पु.ल. व अनेक आत्मचरित्र, चरित्र वाचून झाली. कवितेचं बिजारोपण तर झालेलं होतंच. लग्नानंतर चाळीसगावी ‘स्वांतसुखाय’ हा लेखन प्रांत मानून लिहीत राहिले. रोटरी क्लबशी जोडलेले असल्या कारणाने रोटरी बुलेटीनमध्ये कविता लिहित गेले.‘लोकमत’ दिवाळी अंकासहीत इतरही मासिकांमध्ये कविता प्रकाशित झाल्या. चाळीसगाव म.सा.प.चे संस्थापक अध्यक्ष तानसेन जगताप यांच्या प्रेरणेने लवकरच काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा मानस आहे. आपल्यातील अंतस्थप्रेरणा जागृत ठेवून स्वत:ला व्यक्त होण्याच्या भावनेतून सतत प्रवाही असणं हा भाग साहित्यिक मूल्य जपण्याच्या हेतूने महत्वाचा मानते.

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगाव