शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

तरल, वास्तववादी कवी मनाने घडवली माझ्यातील ‘मी’ची अनोखी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 02:24 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत कवयित्री तथा जळगाव मू.जे. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा.संध्या महाजन...

बालपणापासून भजन, कीर्तनाची ओढ असणारे, कितीतरी अभंग तोंडपाठ असणारे आजोबा, निरक्षर असून प्रत्येक प्रसंगावर चार ओळी जुळवून गुणगुणत आयाबायांमध्ये आनंद पेरणारी लक्ष्मी आजी यांचा सहवास लाभलेला. त्यातच माध्यमिक शाळेत असतानाच कविता वाचन आणि गायनाची बीजं आमच्या खिर्डी हायस्कूलच्या जया इंगळे आणि उषा पाटील बाईंनी मनात रूजवलेली होती. ‘मुलगी झाली हो’सारख्या नाटकातील सहभाग, कथाकथनात येणारा प्रथम क्रमांक अशा गोष्टी साहित्याकडे मनाला खेचत गेल्या. भरपूर कविता वाचल्या, चालीत गायल्या, शाबासकी मिळवली. स्वत:साठी आणि मैत्रिणींसाठी भाषण तयार करणं ही त्या बालवयातील माझी खरी लेखनाची सुरवात.अध्यापन क्षेत्रात आल्यानंतर विविध मासिकं, अंकांमधून माझं वेगवेगळ्या विषयांवर लेखन, संशोधनात्मक लेखन, संपादित ग्रंथात लेख, दिवाळी अंकात लेख लिहिणं सुरू होतं, परंतु माझ्यातील ‘मी’ची खरी ओळख दिली ती माझ्या कवितेने.निखळ बाल्यावस्थेतील प्रत्येक खळखळती आठवण, तारूण्याच्या उंबरठ्यावरील मैत्रिणींचे ते रूसवे-फुगवे, ते मैत्रीचे ते आनंदोत्सव या साऱ्या गोष्टी मनात रूंजी घालत होत्या.जीवनातील सुख-दु:ख, चढ-उतार, समाजजीवनाचे धगधगते वास्तव, दुर्लक्षित घटकांचे असहाय्य जगणे, माणसांचे खरेखोटे व्यवहार पाहून मन विषण्ण होत होते. सृष्टीतील अनाकलनीय घटना, घडामोडी, सृजनाचे आविष्कार, सृष्टीसौंदर्य, निसर्गाचे चमत्कार या साºया गोष्टींनी मन प्रफुल्लित होत होतं. एकाच वेळी मनाचे शब्दांभोवती रूंजी घालणे, अस्वस्थ होणे, प्रफुल्लित होणे या साºया संमिश्र भावनांनी बालपणात पेरले गेलेले ते काव्यप्रतिभेचे बीज अंकुरत गेले आणि एकेका वेगळ्या आशयाच्या कवितेचा जन्म होत गेला. प्रत्येक काव्य आविष्कारानंतर आत्मविश्वास दुपटीने वाढत गेला. जगणे तेच रोजचे होते, पण आता ते नवनवीन, आनंददायी वाटू लागले. प्रत्येक घटनेत एक विषय दिसू लागला आणि जे जे मनाला भावले, ज्याने मन उद्विग्न केले, आनंदले ते ते सारे कवितेत उतरत गेले. त्यात मायेची माणसे होती, प्रेमाचा पाझर होता.भावनांची उत्कटता होती, भक्तीभाव होता, सुख-दु:खाचे घुमारे होते. बालमनाचे रंजक खेळ होते. नानाविषयांनी माझी कविता बहरत गेली. वाचकांच्या, रसिकांच्या मनाला आनंद देणारी कविता नाना प्रतिक्रिया घेऊन येत गेली आणि माझ्यातील ‘मी’ मला हळूहळू हळूहळू गवसत गेले. माझ्या कवितेचे पहिले वाचक आणि श्रोते होते माझे वडील आणि वहिनी.एम.ए.च्या वर्गाला लोकसाहित्य विषय शिकवताना कविता आणि लोकगीतांचा विविध अंगाने अभ्यास सुरू असताना ग्रामीण बाज, देशी शब्दचापल्य, लय, ताल या साºया गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण माझ्या कवितेची उंची वाढवत गेले. विविध जनसंपर्क साधनांद्वारे लवकर वाचकवर्गापर्यंत, काव्यप्रेमींपर्यंत कविता पोचली आणि माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचे ‘काव्यसंध्या’चे पदार्पण साहित्य क्षेत्रात झाले.मनाचे विविध खेळ मांडणारी साहित्य कृती आकाराला येत असताना होणाºया सुखद काव्यप्रसव वेदना अनुभवताना होणारा आनंद खरंच शब्दातीत असतो आणि हे निर्विवाद सत्य आपल्यातील आपलीच खरी ओळख घडवून देत असतो, असे माझ्या कवीमनाने मान्य केले आहे.-प्रा.संध्या महाजन, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव