शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे आयोजित लेवा पाटीदार समाज महामेळाव्याला समाजबांधवांचा प्रचंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 15:29 IST

मुलींचे घटते प्रमाण, वाढते घटस्फोट समाजासाठी चिंताजनक -एकनाथराव खडसे

ठळक मुद्दे‘२६/११’मुळे सत्काराला फाटा समाजबांधवांची प्रचंड गर्दीसामुहीक विवाह सुरू करण्याचे आवाहन

जळगाव : लेवा नवयुवक संघातर्फे २६ रोजी शिवतीर्थ मैदानावर आयोजित लेवा पाटीदार समाजाच्या विश्वस्तरीय वधू-वर परिचय महामेळाव्यास समाजबांधवांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. यावेळी मार्गदर्शन करताना मेळाव्याचे उद्घाटक माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी समाजातील मुलींची घटती संख्या तसेच घटस्फोटांचे वाढलेले प्रमाण ही समाजासाठी चिंतेची बाब असल्याचे सांगत समाजाने बदल स्विकारून यात सुधारणा करण्याचे आवाहन केले.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील, महापौर ललित कोल्हे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, आमदार सुरेश भोळे, जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.केतन ढाके, डॉ.ए.जी. भंगाळे, सुनील बढे,  नवयुवक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंबनायक रमेश पाटील म्हणाले की लेवापाटीदार समाजाने शिक्षण, उद्योग क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. अगदी चंद्रापर्यंत पोहोचण्याइतकी प्रगती केली आहे. मात्र त्याचबरोबर सामाजिक विषयात मात्र अधोगती सुरू आहे. फक्त मुलगीच अपत्य असेल तर अशा घरातील मुलगी सून म्हणून चालत नाही, असे प्रकार निदर्शनास येतात. सामाजिक परिस्थितीत बदल झाला आहे. समाज सुशिक्षीत झाला आहे. त्यामुळे विचारही सुशिक्षीत, पुढारलेले व्हायला हवेत. लेवा समाजातील पोटजातीतील भेद १९५६ ला नष्ट केले. त्यानंतर पुन्हा १९६५-६६ ला हे मतभेद मिटविले. १९८४ ला पुन्हा सर्व पोटजातींना एकत्र आणले. आता फेब्रुवारीत होणाºया कार्यक्रमात सर्वांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न असेल.लेवा नवयुवक संघाच्या कार्याचा गौरवमाजी मंत्री खडसे म्हणाले की, लेवा नवयुवक संघाने राबविलेल्या या उपक्रमाचे हे ३१वे वर्ष आहे. समाजातील उपवर युवक-युवतींची माहिती गोळा करणे, त्याची सूची करणे, मेळाव्यांचे आयोजन करणे हे वर्षभर चालणारे काम लेवा नवयुवक संघाने अतिशय कौतुकास्पदरित्या सुरू ठेवले आहे.‘२६/११’मुळे सत्काराला फाटा२६ नोव्हेंबर रोजीच मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी देशासाठी शहीद झाले होते. त्या शहीदांना या वधू-वर परिचय महामेळाव्याच्या प्रारंभीच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यामुळे सत्कार कार्यक्रमांनाही फाटा देण्यात आला. आयोजकांनी उपस्थित मान्यवरांचे केवळ शब्दसुमनांनी स्वागत केले.समाजबांधवांची प्रचंड गर्दीमेळाव्यासाठी ३२०० मुले व २२०० मुलींची नोंदणी झालेली होती. त्यामुळे त्यांच्या सोबत आई-वडील, भाऊ किंवा बहिण असे तीन-चार जणही आलेले होते. त्यामुळे किमान ८ ते १० हजार समाजबांधव या मेळाव्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे शिवतीर्थ मैदान परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र आयोजकांनी चोख व्यवस्था केलेली असल्याने तसेच समाजबांधवही शिस्तीचे पालन करीत सूचना मिळेल, त्यानुसार वाहने लावत रांग लावून मंडपात प्रवेश करीत असल्याने कार्यक्रम अत्यंत शांतपणे पार पडला.मुलींचे घटते प्रमाण, घटस्फोटांचे वाढते प्रमाण घातकखडसे म्हणाले की, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने जगभरात विस्तारलेल्या, प्रगतीकडे वाटचाल करणाºया लेवा समाज संवादात कमी पडतोय का? असे वाटते. परिचय पुस्तिकेतील मुला-मुलींची संख्या पाहिली तर दिसते की, ३२०० मुलांची तर २२०० मुलींची नोंद आहे. म्हणजे मुले व मुलींमध्ये १००० ची तफावत आहे. नुकताच पुण्यातील मेळाव्यालाही गेलो होतो. तेथेही असेच चित्र बघायला मिळाले. हे व्यस्त प्रमाण समाजास घातक ठरू शकते. तसेच मुली देखील मुलांच्या बरोबरीने कमावत्या झाल्या आहेत. मात्र त्यामुळे मुला-मुलींमधील ‘ईगो’ही वाढले आहेत. त्याचा परिणाम घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. अगदी लग्न होऊन महिना, सहा महिनेच झालेल्यांचे देखील घटस्फोटासाठीची प्रकरणे भोरगाव लेवा पंचायतकडे, माझ्याकडे येतात. लग्न आनंदाचा क्षण आहे. लग्न वेळेतच लागले पाहिजे. वेळेवर लग्न लावायचेच नसेल तर मुहूर्त काढायचाच कशाला? अशी विचारणाही त्यांनी केली.सामुहीक विवाह सुरू कराआमदार खडसे म्हणाले की, लेवा समाजात सामूहिक विवाह होताना दिसत नाहीत. प्रत्येकजण लग्नात बडेजाव करताना दिसतो. मात्र तोच पैसा समाजाच्या कामासाठी उपयोगात येऊ शकतो. त्यामुळे यापुढे सामूहिक विवाह व्हावेत, यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.आवारात सूची, प्रवेश पास साठी स्टॉलशिवतीर्थ मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर एक स्टॉल लावून समाजबांधवांना मार्गदर्शन केले जात होते. या वधू-वर परिचय मेळाव्याला शिस्त असावी, अनावश्यक गर्दी टाळावी यासाठी प्रवेशासाठी पास सक्तीचा करण्यात आलेला होता. त्यासाठी शिवतीर्थ मैदानावरच मुख्य मंडपाबाहेर पास साठी स्टॉल लावण्यात आलेला होता. तेथे पास घेण्यासाठी समाजबांधवांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच वधू-वर परिचय सूचीसाठी वेगळा स्टॉल होता. पास घेतल्यावर समाजबांधव परिचय सूची घेत होेते. तसेच वधू किंवा वराला मेळाव्यात बसल्यावर पसंत पडलेल्या स्थळाची नोंदणी करता यासाठी काही व्यावसायिकांनी स्टॉल लावून फॉर्म उपलब्ध करून दिलेले होते.