शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

चाळीसगावातील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मार्गी लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 21:11 IST

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली माहिती

चाळीसगाव : तालुक्यातील आठशेहून अधिक प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदला मिळावा, यासाठी लढा देत असून, शुक्रवारी त्यांनी मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कैफियत मांडली. येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावू, असे जयंत पाटील यांनी आश्वासित केले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.मुंदखेडे, चितेगाव, कोदगाव, ओढरे येथे मध्यम जलप्रकल्प झाले असून, यात आठशेहून अधिक शेतकऱ्यांची जमीन संपादित केली गेली आहे. मुंदखेडे - पातोंडा प्रकल्प दीर्घकालीन असून, अगोदर ह्या प्रकल्पाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी प्रमोद पाटील यांनी केली. प्रकल्प पूर्ण होऊन २३ वर्षे झाली असून, याबाबतचा निकाल दोन वर्षांपूर्वी झाला आहे. ही वस्तुस्थितीही प्रमोद पाटील यांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.मात्र, २३ वर्ष उलटूनही या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. जयंत पाटील यांची शुक्रवारी मुंबईत भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडण्यात आला. त्यावर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये प्रश्न मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळवून दिला जाईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.गिरीष महाजन, मंगेश चव्हाण, प्रमोद पाटील यांची उपस्थितीगेल्या २३ वर्षांपासून मोबदला मिळावा, यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर मांडण्यात आला. यावेळी माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पंचायत समितीतील भाजप गटनेते संजय भास्कर पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य शेनपडू निंबा पाटील, डॉ. बी. ओ. पाटील, बापू माळी, अशोकराव वाबळे, दिलीप पाटील, जितेंद्र येवले आदी उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीChalisgaonचाळीसगाव