शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

शिवसेनेला काहीही बोलू द्या, मुख्यमंत्री भाजपचाच होणार - गिरीश महाजन यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:26 IST

सत्ता स्थापनेचा तिढा ९ नोव्हेंबरपर्यंत सुटणार

जळगाव : सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेचे नेते काहीही बोलत असले तरी मुख्यमंत्री भाजपाच होणार आहे. विधानसभेची मुदत अजून ९ नोव्हेंबरपर्यंत असून तोपर्यंत सत्ता स्थापनेचाही तिढा सुटेल, असा दावा जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात केला.जिल्ह्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची शनिवारी पाहणी केल्यानंतर जळगावात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा दावा केला.सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत व इतर मंडळी भाष्य करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र एकाकी पडले असल्याच्या मुद्यावर बोलताना महाजन म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे त्यांच्या परिसरात व मी जळगावात पाहणी दौऱ्यात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकाकी आहे, असे कोणी म्हणू नये. शिवसेनेचे नेते काहीही बोलत असले तरी आम्ही काही न बोलण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च सध्या महत्त्वाचे असून मुख्यमंत्री भाजपाच होणार आहे. विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरपर्यंत आहे, तो पर्यंत सर्व तिढा सुटेल असा दावाही त्यांनी केला. शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता स्थापनेविषयी सुरू असलेल्या चर्चेविषयी बोलणे मात्र महाजन यांनी टाळले.पराभवाची जबाबदारी माझीचविधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या जागा कमी झाल्याच्या मुद्यावर बोलताना महाजन म्हणाले की, या पराभवाची जबाबदारी माझीच आहे. नाशिक, नंदुरबारमध्ये जागा कायम ठेवू शकलो, मात्र धुळ््यात एक जागा तर जळगावात दोन जागा कमी झाल्या, हे मान्य करतो. राज्यातही १४० ते १४५ जागा येण्याची अपेक्षा असताना त्या घटल्या. तेही मान्य असून शेवटी जनमत असते असे सांगत त्याची कारणे वेगवेगळी असल्याचे ते म्हणाले.बंडखोरीचा दोन्ही पक्षांना फटका व विरोधकांना फायदाभाजपच्या बंडखोरीच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, राज्यात सर्वत्र बंडखोरी झाल्याने त्याचा फटका भाजप व शिवसेना दोन्ही पक्षांना बसला आहे. मात्र त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला होऊन त्यांच्या जागा वाढण्यास मदत झाल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव