जळगाव : लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिलीच बैठक बुधवारी पक्षाच्या आकाशवाणी चौकानजीकच्या कार्यालयात घेण्यात आली. पण या बैठकीला पक्षाचा एकही आमदार उपस्थित राहिला नाही. अनेक पदाधिकारीदेखील अनुपस्थित होते.
सुरुवातीला केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक अध्यक्षस्थानी होते. अत्यल्प उपस्थिती असल्याने ही बैठक अध्यक्षांच्या दालनामध्ये घ्यावी लागली. अँड.रवींद्र पाटील, विनोद तराळ, गोपाळ फकीरचंद पाटील, सलीम इनामदार, रत्नाकर साळुंखे, राजेंद्र पाटील, तिलोत्तमा पाटील, मंगला पाटील, विनोद देशमुख, राजेंद्र पाटील, विजय चौधरी, डॉ.शांताराम पाटील, कुणाल पवार, योगेश देसले, विकास पाटील, अशोक पाटील, शेख निमन, मीर नजीम अली, मुबीन शेख, रणजित गव्हाळे आदी उपस्थित होते.
फक्त निष्ठावंतांनीच पक्षात राहावे
ज्यांना निष्ठेने काम करायचे आहे त्यांनीच पक्षात राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांनी या बैठकीत केले. भारनियमनाबाबत बैठकीत तक्रारी करण्यात आल्या. तसेच आगामी विधानसभेची निवडणूक ही शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये लढावी, अशी मागणी करण्यात आली.