शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

आणि बिबटय़ा दिसल्याच्या अफवांना बसला लगाम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 18:54 IST

अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सोशल मीडियावर बिबटय़ा दिसल्याच्या अफवा आणि चर्चेला ऊत आला होता, त्यामुळे शेतमजुर व शेतक:यांनी शेतात जाणे बंद केले होते, बिबटय़ाच्या चर्चेने ग्रामीण जीवन अक्षरश: होरपळून निघाले होते, परंतु नुकतेच चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा:या या बिबटय़ाला कंठस्नान घातल्याने जनता आणि वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियामधून अफवांना आला होता ऊतअफवांनी ग्रामीण जनजीवन होरपळून निघत असतांना वनविभागाचीही झाली दमछाकबिबटय़ाला ठार केल्याच्या वार्तेने अमळनेर तालुक्याला मिळाला दिलासा

ऑनलाईन लोकमत अमळनेर, दि.11 : चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालत महिला आणि बालकांचे बळी घेणा:या बिबटय़ाला वरखेडे येथे ठार करण्यात आल्याचे कळताच सर्वाधिक दिलासा मिळाला तो अमळनेर तालुक्याला. दररोज तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून बिबटय़ा दिसल्याची वार्ता सोशल मीडियातून पसरवली जात होती. त्यामुळे जनतेमध्ये नेहमी भिती असायची, दिवसागणिक बिबटय़ांच्या अफवांनी लोकांचे जगणे मुष्कील करून टाकले होते, परंतु बिबटय़ाला यमसदनी पाठविण्यात आल्यामुळे आपोआप या अफवा आणि चर्चेला लगाम लागला आहे. यामुळे वन विभागानेदेखील सुटकेचा श्वास सोडला आहे. बिबटय़ाने चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर तो अमळनेर तालुक्यातही शिरल्याची दहा - बारा दिवसांपूर्वीपासून चर्चा होती. दररोज यासंदर्भात येणा:या बातम्यांनी मनोरंजन कमी आणि भीतीच जास्त वाटत होती. अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या भागात बिबटय़ा दिसल्याच्या अफवाना अक्षरश: ऊत आला होता. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या अफवाना खतपाणी घातले जात होते, तालुक्यातील पिंपळे बु, मंगरूळ, जवखेडा, खेडी- खवशी आणि अमळनेर , पळासदडे शिवारात बिबटय़ा दिसल्याच्या अफवा सारख्या येत होत्या, त्यामुळे वन विभागाचे कर्मचारीही वेळी अवेळी ठिकठिकाणी जाऊन शोध घेत होते. आणि अमळनेर परिसरात बिबटय़ा नाही, तडस, लांडगे, कोल्हे यासारखे प्राणी आहेत असे सांगत होते, माहिती पत्रकदेखील वाटत होते. मात्र तरीही रोज वेगवेगळ्या भागातून बिबटय़ा दिसल्याची अफवा येतच होत्या. त्यामुळे भीतीपोटी मजूर शेतात येत नव्हते, परिणामी ग्रामीण भागातील जनजीवन होरपळून निघाले होते. तालुक्यात बिबटय़ा नसतांनाही मात्र नागरिकांच्या मनातून भीती काही जात नव्हती, त्यामुळे वन विभागही मेटाकुटीला आला होता. भयाने व्यापलेल्या अशा स्थितीत बिबटय़ाला कंठस्नान घातल्याची वार्ता शनिवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरताच तालुक्यातील जनता आणि प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर मात्र तालुक्यातून एकाही गावातून बिबटय़ा दिसल्याची बातमी आली नाही अथवा अफवा देखील पसरवली गेली नाही. परंतु पुन्हा एकदा सोशल मीडिया लोकांसाठी कसा त्रासदायक ठरू पाहत आहे, त्याचे प्रत्यंत्तर मात्र चांगलेच घडले.