शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

आणि बिबटय़ा दिसल्याच्या अफवांना बसला लगाम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 18:54 IST

अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सोशल मीडियावर बिबटय़ा दिसल्याच्या अफवा आणि चर्चेला ऊत आला होता, त्यामुळे शेतमजुर व शेतक:यांनी शेतात जाणे बंद केले होते, बिबटय़ाच्या चर्चेने ग्रामीण जीवन अक्षरश: होरपळून निघाले होते, परंतु नुकतेच चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा:या या बिबटय़ाला कंठस्नान घातल्याने जनता आणि वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियामधून अफवांना आला होता ऊतअफवांनी ग्रामीण जनजीवन होरपळून निघत असतांना वनविभागाचीही झाली दमछाकबिबटय़ाला ठार केल्याच्या वार्तेने अमळनेर तालुक्याला मिळाला दिलासा

ऑनलाईन लोकमत अमळनेर, दि.11 : चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालत महिला आणि बालकांचे बळी घेणा:या बिबटय़ाला वरखेडे येथे ठार करण्यात आल्याचे कळताच सर्वाधिक दिलासा मिळाला तो अमळनेर तालुक्याला. दररोज तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून बिबटय़ा दिसल्याची वार्ता सोशल मीडियातून पसरवली जात होती. त्यामुळे जनतेमध्ये नेहमी भिती असायची, दिवसागणिक बिबटय़ांच्या अफवांनी लोकांचे जगणे मुष्कील करून टाकले होते, परंतु बिबटय़ाला यमसदनी पाठविण्यात आल्यामुळे आपोआप या अफवा आणि चर्चेला लगाम लागला आहे. यामुळे वन विभागानेदेखील सुटकेचा श्वास सोडला आहे. बिबटय़ाने चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर तो अमळनेर तालुक्यातही शिरल्याची दहा - बारा दिवसांपूर्वीपासून चर्चा होती. दररोज यासंदर्भात येणा:या बातम्यांनी मनोरंजन कमी आणि भीतीच जास्त वाटत होती. अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या भागात बिबटय़ा दिसल्याच्या अफवाना अक्षरश: ऊत आला होता. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या अफवाना खतपाणी घातले जात होते, तालुक्यातील पिंपळे बु, मंगरूळ, जवखेडा, खेडी- खवशी आणि अमळनेर , पळासदडे शिवारात बिबटय़ा दिसल्याच्या अफवा सारख्या येत होत्या, त्यामुळे वन विभागाचे कर्मचारीही वेळी अवेळी ठिकठिकाणी जाऊन शोध घेत होते. आणि अमळनेर परिसरात बिबटय़ा नाही, तडस, लांडगे, कोल्हे यासारखे प्राणी आहेत असे सांगत होते, माहिती पत्रकदेखील वाटत होते. मात्र तरीही रोज वेगवेगळ्या भागातून बिबटय़ा दिसल्याची अफवा येतच होत्या. त्यामुळे भीतीपोटी मजूर शेतात येत नव्हते, परिणामी ग्रामीण भागातील जनजीवन होरपळून निघाले होते. तालुक्यात बिबटय़ा नसतांनाही मात्र नागरिकांच्या मनातून भीती काही जात नव्हती, त्यामुळे वन विभागही मेटाकुटीला आला होता. भयाने व्यापलेल्या अशा स्थितीत बिबटय़ाला कंठस्नान घातल्याची वार्ता शनिवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरताच तालुक्यातील जनता आणि प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर मात्र तालुक्यातून एकाही गावातून बिबटय़ा दिसल्याची बातमी आली नाही अथवा अफवा देखील पसरवली गेली नाही. परंतु पुन्हा एकदा सोशल मीडिया लोकांसाठी कसा त्रासदायक ठरू पाहत आहे, त्याचे प्रत्यंत्तर मात्र चांगलेच घडले.