शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

२८ व २९ रोजी होणार सरपंचपदाची आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांनंतर आता सरपंचपदाची आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारीला निघणार आहे. त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांनंतर आता सरपंचपदाची आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारीला निघणार आहे. त्यात जिल्ह्यातील नव्याने निवडणुका झालेल्या ७८३ ग्रामपंचायतींचे सरपंच कोण, हे ठरणार आहे. यासाठी सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकारी हे दिलेल्या वेळेत दुपारी २ आणि ४ वाजता आरक्षण सोडत काढतील. एरंडोल आणि भुसावळ या तालुक्यांच्या आरक्षण सोडती या २९ जानेवारीला सकाळी ११ वाजता निघणार आहे. तर, उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये आरक्षण सोडत २८ जानेवारीला निघेल.

यात तहसीलदार यांना आरक्षण सोडत काढण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग असे आरक्षण असेल. त्यानंतर प्रांताधिकारी हे यातून महिलांसाठीचे आरक्षण सोडत काढणार आहेत. त्यात उपविभागीय कार्यालयांनुसार या सोडती काढल्या जाणार आहेत.

जामनेर आरक्षण सोडत दुपारी २, जळगावला दुपारी ४ वाजता. एरंडोल विभागात पारोळला दुपारी २ चाळीसगावला दुपारी ४ वाजता, भुसावळ उपविभागात मुक्ताईनगर दुपारी २, बोदवड दुपारी ४, अमळनेरला दुपारी ४ वाजता, चोपड्यात दुपारी २ वाजता, पाचोरा येथे दुपारी २ वाजता, तर भडगावला दुपारी ४ वाजता आरक्षण सोडत निघणार आहे.

फैजपूर येथे यावलला दुपारी २ तर रावेरला दुपारी ४ वाजता आणि चाळीसगावला दुपारी २ वाजता आरक्षण सोडत निघणार आहे.

अशी निघेल सोडत...

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरिता सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करताना सन २०११ च्या जनगणनेनुसार तहसीलदार यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येशी असलेली टक्केवारी काढून ज्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येशी टक्केवारी सर्वाधिक असेल, अशा पंचायतीपासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने पंचायतींची अनुसूचित जातीसाठी व अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी सरपंचपदे राखून ठेवण्यात आली असतील, अशा ग्रामपंचायती वगळल्या जातील. त्यानंतर, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चिठ्ठ्या टाकून सोडतीद्वारे ग्रामपंचायती निश्चित केल्या जाणार आहेत.

कसे असेल आरक्षण...

जिल्ह्यात ११२५ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे आता ५६३ ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी १०२, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी २१२, मागास प्रवर्गातील महिलांसाठी ३०४ पदे आरक्षित आहेत. तर, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०२ पदे आरक्षित आहेत. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ५४, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी १०६, मागास प्रवर्गातील महिलांसाठी १५२ पदे आरक्षित आहेत. तर, सर्वसाधारण प्रवर्गासाठी २५१ पदे आरक्षित आहेत. यातून ७८३ ग्रामपंचायतींचे आरक्षण काढले जाईल. तेथे नव्याने सरपंच निवडणूक होणार आहे.