शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

चाळीसगाव पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:14 IST

चाळीसगाव शहराला गिरणा धरणावरून पाणी पुरवठा होत असलेल्या नगरपरिषदेच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या पाईपलाईनच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गळतीला दुरूस्त करण्यासाठी ३६ तास लागतील असे सूत्रांनी कळविले आहे.

ठळक मुद्देदुरूस्तीला लागणार ३६ तासपाईपलाईनच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

चाळीसगाव : शहराला गिरणा धरणावरून पाणी पुरवठा होत असलेल्या नगरपरिषदेच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या पाईपलाईनच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शुक्रवारी सकाळी ही बाब पालिका प्रशासनाच्या लक्षात आली. त्यामुळे तातडीने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, विश्वास चव्हाण, पालिका पाणी पुरवठा अभियंता संजय आहिरे, कैलास आगोने, दिपक देशमुख यांच्यासह कर्मचारी यांनी गळती होत असलेल्या ठिकाणी भेट दिली.दरम्यान, पाईपलाईनच्या दुरुस्तीला ३६ तास लागणार असल्याचे नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी सांगितले.धुळे बायपास चौकातून मालेगाव चौफुलीकडे जाताना जगदीश अग्रवाल यांच्या नियोजित मंगल कार्यालया समोर ही पाईपलाईन फुटली आहे.दरम्यान, तिच्या दुरुस्तीसाठी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सर्व यंत्र सामुग्री व तज्ञांची व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे शहराचा नियमित पाणी पुरवठा खंडित होणार नाही, असे सांगण्यात आले असले तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले आहे.शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जल वाहिनीला सकाळी गळती लागल्याचे समजले. ही गळती नगर पालिकेच्या जलवाहिनीला झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी गळती आहे. त्यामुळे सर्व पाणीपुरवठा विभाग या दुरुस्तीसाठी कामाला लागला आहे, तरीही या दुरुस्तीसाठी ३६ तास लागू शकतात. नागरिकांनी घरातील पाणी जपून वापरावे. 

टॅग्स :Waterपाणी