शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात: अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 10:16 IST

राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

दिगंबर महाले, अमळनेर (जि.जळगाव): राज्यात दोन ते तीन महिन्यात दंगलीच्या दहा ते बारा घटना घडल्या आहेत.  जातीय तणाव निर्माण होत आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी अमळनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार यांनी सांगितलेले मुद्दे 

शासन आपल्या दारी कार्यक्रमांवर प्रचंड खर्च होत आहे. या कार्यक्रमांचा लोकांना खरंच फायदा होतोय का ?आज निव्वळ राजकारण चाललं आहे

राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही. विरोधकांना साईडट्रॅक केलं जात आहे. शिंदे -फडणवीस सरकार असल्यापासून हे घडत आहे,

अनेक विरोधी आमदार कोर्टात गेले, कोर्टाने सरकारला सुनावलं आहे.

महागाई, शेती मालाला भाव नाही यावरून लक्ष विचलित करण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे चाललंय का?सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे.

सरकार 20 जणांचं आहे, कमी मंत्र्यांमध्ये काम सुरू आहे. एकाच मंत्र्यांकडे अनेक खात्यांचा कारभार आहे. त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे

शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे.  शेजारच्या राज्यांमध्ये शेती मालाला चांगला भाव मिळत आहे. आपल्याकडे भाव मात्र कमी आहे. सरकार मात्र शेती मालाकडे बघायला तयार नाही.

खतांच्या किंमती वाढत आहे.  साठेबाजी सुरू आहे, बोगस बियाणे विक्री सुरू आहे. कृषी विभाग कारवाईचा आव आणतो, मंत्र्यांचे पीए अडकले आहेत. 

बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, आमच्या सरकारमध्ये असं कधीही घडलं नाही. सरकार टिकवण्यासाठी आमदार सांगतील ती गोष्ट, मग ती नियमात असेल किंवा नाही काही बघितलं जात नाही. मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणारा माणूस नाही. जे दिसतंय ते अत्यंत चिंताजनक आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAmalnerअमळनेर