शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात: अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 10:16 IST

राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

दिगंबर महाले, अमळनेर (जि.जळगाव): राज्यात दोन ते तीन महिन्यात दंगलीच्या दहा ते बारा घटना घडल्या आहेत.  जातीय तणाव निर्माण होत आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी अमळनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार यांनी सांगितलेले मुद्दे 

शासन आपल्या दारी कार्यक्रमांवर प्रचंड खर्च होत आहे. या कार्यक्रमांचा लोकांना खरंच फायदा होतोय का ?आज निव्वळ राजकारण चाललं आहे

राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही. विरोधकांना साईडट्रॅक केलं जात आहे. शिंदे -फडणवीस सरकार असल्यापासून हे घडत आहे,

अनेक विरोधी आमदार कोर्टात गेले, कोर्टाने सरकारला सुनावलं आहे.

महागाई, शेती मालाला भाव नाही यावरून लक्ष विचलित करण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे चाललंय का?सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे.

सरकार 20 जणांचं आहे, कमी मंत्र्यांमध्ये काम सुरू आहे. एकाच मंत्र्यांकडे अनेक खात्यांचा कारभार आहे. त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे

शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे.  शेजारच्या राज्यांमध्ये शेती मालाला चांगला भाव मिळत आहे. आपल्याकडे भाव मात्र कमी आहे. सरकार मात्र शेती मालाकडे बघायला तयार नाही.

खतांच्या किंमती वाढत आहे.  साठेबाजी सुरू आहे, बोगस बियाणे विक्री सुरू आहे. कृषी विभाग कारवाईचा आव आणतो, मंत्र्यांचे पीए अडकले आहेत. 

बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, आमच्या सरकारमध्ये असं कधीही घडलं नाही. सरकार टिकवण्यासाठी आमदार सांगतील ती गोष्ट, मग ती नियमात असेल किंवा नाही काही बघितलं जात नाही. मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणारा माणूस नाही. जे दिसतंय ते अत्यंत चिंताजनक आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAmalnerअमळनेर