शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात: अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 10:16 IST

राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

दिगंबर महाले, अमळनेर (जि.जळगाव): राज्यात दोन ते तीन महिन्यात दंगलीच्या दहा ते बारा घटना घडल्या आहेत.  जातीय तणाव निर्माण होत आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी अमळनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार यांनी सांगितलेले मुद्दे 

शासन आपल्या दारी कार्यक्रमांवर प्रचंड खर्च होत आहे. या कार्यक्रमांचा लोकांना खरंच फायदा होतोय का ?आज निव्वळ राजकारण चाललं आहे

राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही. विरोधकांना साईडट्रॅक केलं जात आहे. शिंदे -फडणवीस सरकार असल्यापासून हे घडत आहे,

अनेक विरोधी आमदार कोर्टात गेले, कोर्टाने सरकारला सुनावलं आहे.

महागाई, शेती मालाला भाव नाही यावरून लक्ष विचलित करण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे चाललंय का?सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे.

सरकार 20 जणांचं आहे, कमी मंत्र्यांमध्ये काम सुरू आहे. एकाच मंत्र्यांकडे अनेक खात्यांचा कारभार आहे. त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे

शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे.  शेजारच्या राज्यांमध्ये शेती मालाला चांगला भाव मिळत आहे. आपल्याकडे भाव मात्र कमी आहे. सरकार मात्र शेती मालाकडे बघायला तयार नाही.

खतांच्या किंमती वाढत आहे.  साठेबाजी सुरू आहे, बोगस बियाणे विक्री सुरू आहे. कृषी विभाग कारवाईचा आव आणतो, मंत्र्यांचे पीए अडकले आहेत. 

बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, आमच्या सरकारमध्ये असं कधीही घडलं नाही. सरकार टिकवण्यासाठी आमदार सांगतील ती गोष्ट, मग ती नियमात असेल किंवा नाही काही बघितलं जात नाही. मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणारा माणूस नाही. जे दिसतंय ते अत्यंत चिंताजनक आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAmalnerअमळनेर