अमळनेर : तालुक्यातील आदिवासी लाभार्थींना सोमवारी दहिवद गावात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आमदार अनिल भाईदास पाटील, लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभा शिंदे, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या हस्ते ९० लाभार्थींना खावटी किट वितरण करण्यात आले.
मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी पं.स. सदस्य विनोद जाधव, प्रवीण पाटील, लोकसंघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे, बाजार समितीचे प्रशासक एल. टी. पाटील, संदीप घोरपडे, नगरसेविका राधाबाई पवार, भाईदास भिल, नगाव सरपंच महेश पाटील, आदिवासी पारधी विकास परिषदेचे संजय पवार, विजय पारधी, समाधान पारधी, बालिक पवार, ढेकूचे रावसाहेब पवार, अमळगावचे मिलिंद पाटील, बन्सीलाल पारधी, दापोरीचे हिरालाल महाराज, एकलव्य सेनेचे राज साळवी, टाकरखेडाचे ज्ञानेश्वर पाटील, दहिवदच्या माजी सरपंच नंदाबाई मावळे, ग्रा.पं. सदस्या हिराबाई भिल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सीमा पारधी, मुकेश पारधी, ज्ञानेश्वर देसले, प्रशांत सोनवणे, अजय पारधी, शिवाजी पारधी, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते .
प्रास्ताविक बारेला, सूत्रसंचालन व्ही. आर. पाटील, लाभार्थींना किट वाटपाचे नियोजन शिरसाठ, वैशाली पाटील, चारूशीला महाजन यांनी केले. आभार गणेश तांदळे यांनी मानले.