शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

40 उद्योजकांना शेवटची नोटीस

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

धुळे : गेल्या काही वर्षापासून भूखंड ताब्यात असूनही उद्योग न थाटणा:या उद्योजकांना अखेरची संधी

धुळे : गेल्या काही वर्षापासून भूखंड ताब्यात असूनही उद्योग न थाटणा:या उद्योजकांना अखेरची संधी म्हणून आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी प्रशासनाने घेतला आह़े या मुदतीनंतर आहे त्या स्थितीत भूखंड परत घेतले जाणार आह़े यामध्ये धुळे विभागातील नरडाण्यातील 30 आणि नवापूरमधील 10 उद्योजकांचा समावेश आह़े

धुळ्यासह नंदुरबार आणि जळगाव जिल्हाभरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपले औद्योगिक झोन निश्चित केले आह़े उद्योजकांच्या मागणीनुसार त्याठिकाणी उद्योगांसाठी भूखंड मंजूर केले गेल़े त्या भागात वीज, पाणी, रस्ते, सुरक्षा आदी सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या़ मात्र, त्यानंतरही उद्योग थाटले जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला़ या आनुषंगाने अलीकडेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालकांची बैठक अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, उपाध्यक्ष तथा राज्यमंत्री प्रवीण पोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पार पडली़ राज्यातील रिक्त आणि उद्योगाशिवाय पडून असलेल्या भूखंडांचा आढावा या बैठकीत घेतला गेला़ जुन्या एमआयडीसीमधील 98 टक्के भूखंडांचे वाटप झाल़े मात्र नव्याने थाटण्यात आलेल्या एमआयडीसीमध्ये सोयीसुविधांच्या अभावामुळे भूखंडांचा विकास थांबलेला आह़े

सोयीसुविधा असलेल्या एमआयडीसीत भूखंड देऊनही संबंधितांनी अद्याप उद्योग सुरू केले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आह़े उद्योग सुरू करावे, अथवा भूखंड परत करावा, अशा आशयाची नोटीस दोन ते तीन वेळा ताबेदारांना पाठविण्यात आली आह़े परंतु त्यांनी प्रत्येक वेळी कर्ज नाही, मंजुरी नाही, एनओसी नाही, अशी कारणे पुढे करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला़ एकीकडे उद्योगाच्या नावाखाली वर्षानुवर्षापासून एमआयडीसीतील भूखंड प्रतिष्ठितांनी अडकवून ठेवले आहेत, तर दुसरीकडे नव्याने उद्योग थाटू इच्छिणा:या तरुणांना भूखंड मिळेनासे झाले आहेत़ पाच वर्ष होऊनही उद्योग न थाटणा:या भूखंड मालकांना अखेरची संधी म्हणून एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े मात्र, वर्षभरात उद्योग थाटण्याबाबत जो हमी देईल, एमआयडीसीशी करार करेल, त्यालाच ही मुदतवाढ दिली जाणार आह़े वर्षभरात उद्योग थाटण्याची चिन्हे नसलेल्यांना भूखंड परत करण्याचा पर्याय सुचविला जाणार आह़े त्याचप्रमाणे करार करूनही वर्षभरात उद्योग सुरू न झाल्यास कोणतीही कारणे न ऐकता त्या अवस्थेत भूखंड परत घेण्याचा निर्णय राज्याच्या बैठकीतून घेण्यात आला आह़े त्याची अंमलबजावणी धुळे विभागात होणार आह़े दरम्यान, संबंधित उद्योजकांना प्रशासनाने तंबी दिली आह़े त्यामुळे आता उद्योग उभारावा नाहीतर बाहेर निघून जाणे हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत़