शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

40 उद्योजकांना शेवटची नोटीस

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

धुळे : गेल्या काही वर्षापासून भूखंड ताब्यात असूनही उद्योग न थाटणा:या उद्योजकांना अखेरची संधी

धुळे : गेल्या काही वर्षापासून भूखंड ताब्यात असूनही उद्योग न थाटणा:या उद्योजकांना अखेरची संधी म्हणून आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी प्रशासनाने घेतला आह़े या मुदतीनंतर आहे त्या स्थितीत भूखंड परत घेतले जाणार आह़े यामध्ये धुळे विभागातील नरडाण्यातील 30 आणि नवापूरमधील 10 उद्योजकांचा समावेश आह़े

धुळ्यासह नंदुरबार आणि जळगाव जिल्हाभरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपले औद्योगिक झोन निश्चित केले आह़े उद्योजकांच्या मागणीनुसार त्याठिकाणी उद्योगांसाठी भूखंड मंजूर केले गेल़े त्या भागात वीज, पाणी, रस्ते, सुरक्षा आदी सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या़ मात्र, त्यानंतरही उद्योग थाटले जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला़ या आनुषंगाने अलीकडेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालकांची बैठक अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, उपाध्यक्ष तथा राज्यमंत्री प्रवीण पोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पार पडली़ राज्यातील रिक्त आणि उद्योगाशिवाय पडून असलेल्या भूखंडांचा आढावा या बैठकीत घेतला गेला़ जुन्या एमआयडीसीमधील 98 टक्के भूखंडांचे वाटप झाल़े मात्र नव्याने थाटण्यात आलेल्या एमआयडीसीमध्ये सोयीसुविधांच्या अभावामुळे भूखंडांचा विकास थांबलेला आह़े

सोयीसुविधा असलेल्या एमआयडीसीत भूखंड देऊनही संबंधितांनी अद्याप उद्योग सुरू केले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आह़े उद्योग सुरू करावे, अथवा भूखंड परत करावा, अशा आशयाची नोटीस दोन ते तीन वेळा ताबेदारांना पाठविण्यात आली आह़े परंतु त्यांनी प्रत्येक वेळी कर्ज नाही, मंजुरी नाही, एनओसी नाही, अशी कारणे पुढे करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला़ एकीकडे उद्योगाच्या नावाखाली वर्षानुवर्षापासून एमआयडीसीतील भूखंड प्रतिष्ठितांनी अडकवून ठेवले आहेत, तर दुसरीकडे नव्याने उद्योग थाटू इच्छिणा:या तरुणांना भूखंड मिळेनासे झाले आहेत़ पाच वर्ष होऊनही उद्योग न थाटणा:या भूखंड मालकांना अखेरची संधी म्हणून एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े मात्र, वर्षभरात उद्योग थाटण्याबाबत जो हमी देईल, एमआयडीसीशी करार करेल, त्यालाच ही मुदतवाढ दिली जाणार आह़े वर्षभरात उद्योग थाटण्याची चिन्हे नसलेल्यांना भूखंड परत करण्याचा पर्याय सुचविला जाणार आह़े त्याचप्रमाणे करार करूनही वर्षभरात उद्योग सुरू न झाल्यास कोणतीही कारणे न ऐकता त्या अवस्थेत भूखंड परत घेण्याचा निर्णय राज्याच्या बैठकीतून घेण्यात आला आह़े त्याची अंमलबजावणी धुळे विभागात होणार आह़े दरम्यान, संबंधित उद्योजकांना प्रशासनाने तंबी दिली आह़े त्यामुळे आता उद्योग उभारावा नाहीतर बाहेर निघून जाणे हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत़