शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुºहा-हरदो जि.प.शाळेला अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:41 IST

बोदवड तालुक्यातील कुºहा- हरदो जि.प.शाळेची जीर्ण अवस्थेमुळे दूरवस्था झाली असून भर पावसाळ्यात विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारतीचे संपूर्ण छत नेस्तनाबूत झाले असून तीन वर्ग खोल्यांची भग्नावस्था झाल्याने आणि याबाबत वारंवार पाठपुरावा आणि तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे१९१८ मध्ये ब्रिटिश काळात बांधकाम झालेली शाळाशाळेच्या दूरवस्थेमुळे १९० विद्यार्थीच पटावर राहिले आहेत.

बोदवड जि. जळगाव : तालुक्यातील कुºहा - हरदो येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची अत्यंत दूरवस्था झाल्याने ती अखेरची घटका मोजत आहे. शाळेचे संपूर्ण छत मोडकळीस आल्याने वर्ग खोल्या उघड्या पडल्या आहेत. पावसाचे पाणी थेट वर्गांमध्ये येत असल्याने त्यांची भग्नावस्था झाली आहे. परिणामी शाळेच्या विद्यार्थ्याना भर पावसाळ्यात उघड्यावर शिकवण्याची पाळी शिक्षकांवर आली आहे.दरम्यान, वारंवार पत्र व्यवहार आणि पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधींचे या समस्येकडे दुर्लक्ष झाले असून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी साडे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असतांना यात बोदवड तालुक्याला ठेंगा दाखविण्यात आल्याची संतप्त भावना जनतेकडून व्यक्त होत आहे.जिल्ह्यात एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकून डिजीटल शाळेकडे वाटचाल करीत आहेत तर दुसरीकडे बोदवड तालुक्यातील शाळांची अवस्था बिकट होत चालली आहे.तालुक्यातील कुºहा हरदो येथे जिल्हा परिषेदेची पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण देणारी व सन १९१८ मध्ये ब्रिटिश कालीन बांधकाम झालेली शाळा असून या शाळेत गतवर्षी सुमारे दोनशे पाच विद्यार्थी पटावर होते. मात्र यंदा दूरवस्थेमुळे १९० विद्यार्थीच राहिले असून त्यांना बसण्यासाठी एकूण सात वर्ग खोल्या आहेत. तथापि त्यातील तीन वर्ग खोल्या पूर्ण पडक्या झाल्या आहेत, त्यांचे छप्पर पूर्ण उडालेले आहे, सदर तीन वर्ग खोल्यांचे कौलारू छत गेल्या वर्षांपासून गळके झाले आहे. त्यातून नेहमीच पावसाळ्यात पाणी टपकत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे मुष्कील होते.या शाळेच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांनी गेल्या वर्षापासून या भागातील लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा ही केला. नंतर गटविकास अधिकारी यांनीही पाहणी केली. काहीच उपाययोजना होत नसल्याने एक दिवस शाळेला कुलूप ही ठोकून पाहिले पण आश्वासनांशिवाय पदरात काहीच मिळाले नाही.दरम्यानच्या काळात या शाळेच्या वर्ग खोल्यांची स्थिती आणखी बिकट बनली असून दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे या शाळेचे पूर्ण कौलारू छत पडले आहे. परिणामी ही शाळा भग्नावस्थेत उभी आहे. वर्गात बसायला जागा नसल्याने धोका नको म्हणून विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक त्यांना पटांगणात जमिनीवर बसवून शिकवत आहेत. तर वर्ग खोल्यात कौले आणि ताट्यांचे ुतुकडे पावसामुळे थेट बाकड्यांवर येऊन पडले असून खोल्यांची दुर्दशा झाली आहे. शाळेची ही दूरवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Schoolशाळा