शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कुºहा-हरदो जि.प.शाळेला अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:41 IST

बोदवड तालुक्यातील कुºहा- हरदो जि.प.शाळेची जीर्ण अवस्थेमुळे दूरवस्था झाली असून भर पावसाळ्यात विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारतीचे संपूर्ण छत नेस्तनाबूत झाले असून तीन वर्ग खोल्यांची भग्नावस्था झाल्याने आणि याबाबत वारंवार पाठपुरावा आणि तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे१९१८ मध्ये ब्रिटिश काळात बांधकाम झालेली शाळाशाळेच्या दूरवस्थेमुळे १९० विद्यार्थीच पटावर राहिले आहेत.

बोदवड जि. जळगाव : तालुक्यातील कुºहा - हरदो येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची अत्यंत दूरवस्था झाल्याने ती अखेरची घटका मोजत आहे. शाळेचे संपूर्ण छत मोडकळीस आल्याने वर्ग खोल्या उघड्या पडल्या आहेत. पावसाचे पाणी थेट वर्गांमध्ये येत असल्याने त्यांची भग्नावस्था झाली आहे. परिणामी शाळेच्या विद्यार्थ्याना भर पावसाळ्यात उघड्यावर शिकवण्याची पाळी शिक्षकांवर आली आहे.दरम्यान, वारंवार पत्र व्यवहार आणि पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधींचे या समस्येकडे दुर्लक्ष झाले असून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी साडे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असतांना यात बोदवड तालुक्याला ठेंगा दाखविण्यात आल्याची संतप्त भावना जनतेकडून व्यक्त होत आहे.जिल्ह्यात एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकून डिजीटल शाळेकडे वाटचाल करीत आहेत तर दुसरीकडे बोदवड तालुक्यातील शाळांची अवस्था बिकट होत चालली आहे.तालुक्यातील कुºहा हरदो येथे जिल्हा परिषेदेची पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण देणारी व सन १९१८ मध्ये ब्रिटिश कालीन बांधकाम झालेली शाळा असून या शाळेत गतवर्षी सुमारे दोनशे पाच विद्यार्थी पटावर होते. मात्र यंदा दूरवस्थेमुळे १९० विद्यार्थीच राहिले असून त्यांना बसण्यासाठी एकूण सात वर्ग खोल्या आहेत. तथापि त्यातील तीन वर्ग खोल्या पूर्ण पडक्या झाल्या आहेत, त्यांचे छप्पर पूर्ण उडालेले आहे, सदर तीन वर्ग खोल्यांचे कौलारू छत गेल्या वर्षांपासून गळके झाले आहे. त्यातून नेहमीच पावसाळ्यात पाणी टपकत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे मुष्कील होते.या शाळेच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांनी गेल्या वर्षापासून या भागातील लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा ही केला. नंतर गटविकास अधिकारी यांनीही पाहणी केली. काहीच उपाययोजना होत नसल्याने एक दिवस शाळेला कुलूप ही ठोकून पाहिले पण आश्वासनांशिवाय पदरात काहीच मिळाले नाही.दरम्यानच्या काळात या शाळेच्या वर्ग खोल्यांची स्थिती आणखी बिकट बनली असून दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे या शाळेचे पूर्ण कौलारू छत पडले आहे. परिणामी ही शाळा भग्नावस्थेत उभी आहे. वर्गात बसायला जागा नसल्याने धोका नको म्हणून विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक त्यांना पटांगणात जमिनीवर बसवून शिकवत आहेत. तर वर्ग खोल्यात कौले आणि ताट्यांचे ुतुकडे पावसामुळे थेट बाकड्यांवर येऊन पडले असून खोल्यांची दुर्दशा झाली आहे. शाळेची ही दूरवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Schoolशाळा